Wednesday, November 23, 2011

dharma

धर्म हा आचार आणि विचार या दोन्हीचा मध्य साधतो .हिंदू धर्म हि एक कृतीशील परंपरा आहे .इथे केवळ तत्वज्ञानाची चर्चा करणारे अध्यात्म नाही तर त्याचे सर्वसामान्यांसाठी असणारे कृतीशील रूप आपण ज्ञानेश्वरीतून पाहणार आहोत .आपल्या जगण्यातील प्रत्येक कृतीला धर्माचे अधिष्ठान कसे द्यायचे हे ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते .म्हणून तिचे स्वरूप धर्मकीर्तनाचे    आहे .
काव्याच्या दृष्टीने विचार केला तर हि एक शांतीकथा आहे .काव्य आणि तत्वज्ञान येथे एकरूप झाले आहेत .
ज्ञानेश्वर अशी भूमिका घेतात कि मी संतांचा सामान्य जनासाठी निरोप घेऊन येणारा भारवाही आहे .आपल्या सगळ्याच्या मनात असलेल्या अर्जुनाचे धर्मविषयक शंकासमाधान इथे होते .जेंव्हाजेंव्हा निर्णय घेताना आपण
  अडतो तेंव्हा मार्ग दाखवणारी ज्ञानेश्वरी हे धर्माचे आचाररूप आहे .

No comments:

Post a Comment