Friday, November 25, 2011

mangalacharane

वैदिक परंपरे प्रमाणे कोणत्याही कार्याच्या आरंभी" मंगल "म्हणजे परमात्म्यास नमन करावे .ग्रंथरचना हे मोठे कार्य असल्याने त्याच्या सुरवातीला नमन आहे .
हाती घेतलेले ग्रंथ रचनेचे कार्य निर्विघ्नपणे पार पडावे ,मंगलाचरण हा शिष्ट उपचार आहे ,त्या परंपरेचे पालन करावे, श्रोतृ वर्ग आस्तिक व्हावा  हे या मागचे हेतू आहेत .
मंगलाच्या मुख्य देवता गणपती आणि सरस्वती आहेत .ज्ञानेश्वरीच्या १८ अध्यायापैकी अध्याय २ ,३ ,५ ,७ ,८ ,यांना नमने नाहीत
या नमनांचे ३ प्रकार आहेत .१ वस्तुनिर्देश रूप -ब्रम्हाचे रूप कथन करणे .
                                          २ आशीर्वादरूप -इच्छित वस्तू प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थना करणे .
                                           ३ नमस्क्रिया रूप -आपला नम्रपणा आणि ईश्वराची महानता दाखवणे .
या नमनामध्ये इतरही गोष्टी लिहल्या आहेत ,जसे श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपाप्रसादाची मागणी ,गुरुकृपेचे वर्णन ,गुरूस वारंवार वंदन तसेच गुरुशिष्य संबंधातली गोडी यांची वर्णने .आपली स्वताची आत्मा आणि जीव यासंबंधीची मते ते मांडतात .महाभारत गीता आणि महाकवी व्यासांची थोरवी ,अर्जुनाचे व्यक्तिचित्र ,श्रीकृष्णाचे अर्जुनप्रेम, श्रोत्यांची विनवणी , आपली गीतार्थ सांगण्याची महत्वाकांक्षा आणि मराठी भाषेचा अभिमान आणि तिची योग्यता हेही विषय आले आहेत .
अध्यायसंगती सांगण्यासाठी नमनाचा उपयोग केला आहे .जसे नववा अध्याय संपून दहावा सुरु होताना पूर्व कांड संपले असे म्हंटले आहे पहिल्या ९ अध्यायांचे विषय सांगून मग १० व्याचा विषय  सांगितला आहे .
ज्ञानेश्वरी हि गीतेवरील टीका आहे ,पण नमने हि त्यांच्या प्रतिभेचा स्वतंत्र अविष्कार आहेत म्हणून त्यांना महत्व आहे .यातून त्यांच्या सखोल शास्त्र अभ्यासाचे आणि गुरुभाक्तीचे दर्शन होते .ब्रम्हविध्या सर्वाना कळावी हि तळमळ व्यक्त होते .त्यांची शालीनता प्रकट होते .त्यांच्या अलौकिक बुद्धीचा आणि प्रतिभेचा प्रत्यय येतो .अध्यात्म आणि काव्य या दोन्ही दृष्टीने हि नमने असामान्य आहेत . 

No comments:

Post a Comment