Wednesday, November 23, 2011

rasmay dnyaneshwari

ज्ञानेश्वर हे थोर तत्वज्ञ असून अभिजात कवी होते उपनिशिदांचे रुक्ष निवेदन त्यांनी रसाळ काव्यरुपात मांडले .आपल्या काव्याबद्दल ते स्वतः म्हणतात
ऐका रसाळ पणाचीया लोभा |की श्रवणीची होती जीभा |
बोले इंद्रिया लागो कलाम्भा |एकमेका |अध्याय ६ओवि 16
या रसाळ पणाच्या लोभाने कानाला जीभा  उत्पन्न होतील आणि इंद्रियांमध्ये भांडण लागेल .
आपल्या ग्रंथात त्यांनी मानवी आयुष्याच्या संदर्भांनी ,गुरु -शिष्य ,वक्ता -श्रोता .अर्जुन -श्रीकृष्ण यांच्या प्रेमाच्या वर्णने माधुर्य आणले .त्यांची भक्ती भोळ्या अज्ञानाची नाही ,तर ती ज्ञानाच्या पायऱ्या चढत जाते ,आणि हे ज्ञान रुक्ष नाही तर ते समाजाभिमुख आहे .सर्व चराचर सृष्टीविषयी त्यांचे प्रेम पावलोपावली आपल्याला दिसते -या प्रेमामुळेच हे काव्य मधुर झाले आणि ज्ञानेश्वरांना "माउली "हि पदवी मिळाली
वाचे बरवे कवित्व |कवित्वी रसिकत्व |
रसिकत्वी परतत्व |स्पर्शू जैसा |अध्याय १८ श्लोक ३४७
जसे वाचेला शोभादायक कवित्व आहे ,तसे कवित्व हे रसपूर्ण असावे ,आणि रसास परतत्वाचा स्पर्श असावा ,म्हणजेच ते जीवनाचे रहस्य उलगडून दाखवणारे असावे .सुरसता आणि माधुर्य हे गुण ग्रंथाची श्रोत्यांशी नाळ जोडतात .
ज्ञानेश्वरांच्या ग्रंथरचनेचा शांतरस हा प्रमुख भाव आहे .त्यांची प्रतिज्ञा आहे कि हा शांतरस शृंगाररसाला जिंकील .ज्ञानेश्वरांची हि काव्यकन्या आत्मरुपाची पतिव्रता आहे .शांत रसाबरोबर  येथे अद्भुत ,वीर ,रौद्र ,भयानक हे सर्व रस अनुभवास येतात .दृष्टांत देण्याच्या ओघात शृंगार रसही अत्यंत मनस्वीपणे अवतरला आहे . 
शृंगार वीर करून अद्भुत हास्य भयानक |
बीभत्स रौद्रो शांतश्च काव्ये नवरसा मतः |
  भरतमुनी नाट्यशास्त्र  श्लोक
 रसशास्त्र किंवा सौन्देर्य शास्त्र हे भावनांचा अभ्यास करणारे शास्त्र .याचा संदर्भ नाट्य.संगीत ,साहित्य  या कलांशी येतो .
१ हास्य २ वीर ३ शृंगार ४ रौर्द्र ५ बीभत्स ६ करुणा ७ भयानक ८अद्भुत ९ शांत
श्री ज्ञानेश्वरांच्या साहित्यातील नवरस या विषयावर साखरे महाराजांचा एक स्वतंत्र ग्रंथ आहे

No comments:

Post a Comment