Monday, December 19, 2011
Wednesday, December 14, 2011
geeta mahatmya
ज्ञानेश्वरी हे गीतेवरील मराठीतले पहिले भाष्य आहे .
श्री महेशानव्य सम्भूते |निवृत्तीनाथ सुते|
केले ज्ञानदेवे गीते |देशीकार लेणे |
गीता हे वैदिक तत्वज्ञानाचे सर ,उप निशिदांचा अर्क समजले जाते .
सर्वोपनिशिदो गावो |दोग्धा गोपालनंदन|
पार्थो वत्स सुधीर भोक्ता |दुग्धं गीतामृतम महत |
गोपालनंदन हे उपनिशीद रुपी गाईचे गीता रुपी श्रेष्ठ दुध दोहत आहेत आणि अर्जुन रुपी वासरू ते प्रश्न करत आहे .वेदांनी ज्ञानाचा अधिकार फक्त ब्राह्मण ,क्षत्रिय आणि वैश्य पुरुषांना दिला आहे .गीतेच्या नवव्या अध्यायात भगवंत म्हणतात ,
माही पार्थ त्य्पाश्रीत्य येपिस्यू पाप्योनायहा|स्त्रियो वैश्याततथा श्रुद्रस्तोपी यान्ति परम गतीम |
गीता भगवंताच्या आश्रयाला जाऊन परमगती मिळण्याचा अधिकार स्त्रिया ,श्रुद्र ,पापी या सर्वाना देते .
अपिचेतः सुदुराचारो भाजते माम अनन्यभाव |साधुरेव स मन्तव्य सम्यक व्यवसितो ही सं |
दुष्कर्म्य करणाऱ्या माणसाला त्याची सजा भोगून झाली तरी समाज क्षमा करत नाही .त्याने अनन्यभावाने भक्ती केली तर गीता त्याला साधुपद मिळण्याचे वचन देते .
गीता ही चिरतरुण आहे ,आपल्या कर्तव्या बद्दल संभ्रमात असणाऱ्या कोणालाही केंव्हाही मार्गदर्शन करण्याचे तिचे सामर्थ्य कालातीत आहे .
गीतेमुळे चारी वर्ण आणि स्त्रिया या सर्वाना वेदिक तत्वज्ञान अभ्यासण्याची मुभा मिळाली ,त्यांचा न्यूनगंड गेला ,सर्व मानव एकसमान ,इतकेच नाही तर मानव आणि ईश्वर एकच याचा प्रत्यय आला .
येथे कुल्जातीवर्ण |हे अवघेची अकारण |
अशा या नव्यानेच धर्माची ओळख झालेल्यांनी ईश्वर कोठे शोधावा हेही गीतेने सांगितले .
ईश्वरम सर्व भूतानां हृदेशे अर्जुन तिष्ठति |भ्रम्यान सर्वभूतानि यंत्रारुधानी मामया|
परमेश्वराचे अस्तित्व सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी आहे ,तेंवा सर्वांवर प्रेम करणे ही भगवंताची भक्ती ,
कर्मणा तमान्चार्य सिद्धिं विन्दति मानवः |
आपली नित्य कर्मेच परमेश्वराला वाहण्याच्या फुलांप्रमाणे शुध्द ठेवून त्याला कर्मफळ अर्पण करायचे हे पूजा त्याला आवडते .
समाजातील वंचितांसाठी गीता द्वत असलेला आधार श्री ज्ञानेशानी त्यांच्या भाषेत त्यांच्या पर्यंत पोहोचवला आणि गीतेला खर्या अर्थाने विश्वाचा आधार बनवले .
संदर्भ -"द्वादशी " प्राचार्य राम शेवाळकर
परमेश्वराचे अस्तित्व सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी आहे ,तेंवा सर्वांवर प्रेम करणे ही भगवंताची भक्ती ,
कर्मणा तमान्चार्य सिद्धिं विन्दति मानवः |
आपली नित्य कर्मेच परमेश्वराला वाहण्याच्या फुलांप्रमाणे शुध्द ठेवून त्याला कर्मफळ अर्पण करायचे हे पूजा त्याला आवडते .
समाजातील वंचितांसाठी गीता द्वत असलेला आधार श्री ज्ञानेशानी त्यांच्या भाषेत त्यांच्या पर्यंत पोहोचवला आणि गीतेला खर्या अर्थाने विश्वाचा आधार बनवले .
संदर्भ -"द्वादशी " प्राचार्य राम शेवाळकर
Tuesday, December 6, 2011
arjun-pahilya adhyayatala
अर्जुन हा रणांगणावर पूर्ण तयारीने आला आहे .येथे कोणाबरोबर युद्ध करायचे ते नीट बघण्यासाठी त्याने रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करण्यास सांगितले .वाढ्यांचा रणघोष ऐकून तो उत्साहित झाला .
एथ आले असती अवघे |परी म्या कवनेसी झुंजावे |हे रणी लागे पाहावे | म्हणोनिया |
त्यावेळी तिथे जमलेले आपलेच बांधव आहेत हे बघून तो करुणेने व्याकूळ झाला .
मग देवा म्हणा देख ,देख |हे गोत्र गुरु अशेख |तंव कृष्ण मनी नावेक |विस्मो झाला |
इथून पुढे ज्ञानेश्वरांचे कृष्णार्जुन हे गीतेतील अर्जुनाच्या पुढे निघून जातात .त्यांच्या मनातील भावनांचे हिंदोळे आणि विचार व्यक्त करताना श्री ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेला बहार येतो .ते त्या दोघांना मानवी पातळीवर आणतात .
ऐसी पुढील से घेतु |तो सहज जाणे हृद्य्सत्तू|परी उगा असे निवांतु |तेणे वेळी |
अर्जुनाचा संभ्रम बघून श्रीकृष्णाला आश्चर्य वाटले ,तरी तो शांत राहिला .अर्जुनाच्या मनातील करुणे मुळे त्याची वीरवृत्ती .कशी अपमानित झाली ते अनेक दृष्टान्तानी सांगताना ज्ञानेश्वरीचे वेगळेपण उठून दिसते कमल कलीकेच्या आत बंदी झालेल्या भुंग्यामुळे कलिका जशी थरथर कापते तसा अर्जुन कापत होता असे ते वर्णन करतात .
गीतेच्या३२ ,३३ श्लोकावरभाष्य करताना पुन्हा एकदा अर्जुन भावनेच्या भरात म्हणतो हे माझ्या वाटेला आलेले कर्म विपरीत आहे ,अशा युद्धास सामोरे जाण्याबद्दल तो स्वतःचा धिक्कार करतो ..यांना ठार मारून त्रैलोक्याचे राज्य मिळाले तरी मला नको असे म्हणतो .तो श्रीकृष्णालाच प्रश्न विचारतो कि हे अयोग्य काम केले तर मला तुझे मुख कसे दिसेल ?
जरी आजि एथ ऐसे कीजे |तरी कवन्नांच्या मनी उरिजे |सांग मुख केवी पाहिजे | तुजवीण कृष्णा |
त्याचा सारा युक्तिवाद ऐकूनही गप्पच बसलेल्या श्रीकृष्णाला तो कळवळून म्हणतो देवा तू आपले हृदय वज्रासारखे कठोर केलेस काय ?
देवा हे विविध कानी ऐकिजे |परी अजुन्वारी त्रासु नुपजे |हृदय वज्राचे हे काय कीजे |अवधारी पा |
या पूर्ण भागात ओवी ९३ ते २७५ जो संवाद ज्ञानेश्वरांनी वर्णन केला आहे तो एकतर्फी आहे .आपल्या गुरु आणि श्रेष्ठ मित्र असलेल्या कृष्णाला आपली विकल; मनस्थिती वर्णन करून सांगणारा अर्जुन बोलतो आणि भगवान अति स्नेहाने सहृदयतेने ते ऐकतात अर्जुन त्याला पटवू पाहतो ,साद घालतो आपल्या भीतीचे वर्णन करतो ,केशवा कृष्णा ,जनार्दना अशी मैत्र भावाची संबोधने वापरतो .कृष्णार्जुन नात्याच्या मोठ्या प्रवासाचा हा पहिला टप्पा आहे .पुढे तो सखा ते बंधू ,ते गुरु करत विश्वरूप दर्शनाच्या पर्यंत पोहोचतो आणि त्याच्याबरोबर श्रोत्यानाही बोट धरून पारमार्थिक प्रवासाचे हे टप्पे पार करतो .इथून पुढे फुलणाऱ्या नात्याची ही केवळ सुरवात आहे .
संकटात सापडल्यावर अनन्य भावाने आपल्या दैवताला शरण जाणाऱ्या,कळवळून सल्ला मागणाऱ्या अर्जुनाचे हे चित्र अतिशय मानवी आहे .श्री ज्ञानेशांचा हा अर्जुन केवळ पांडवांचा सेनापती नाही ,महामानव नाही ,तो आहे भगवंताचा परमसखा ,अनन्यभक्त .त्याच्या मानसिकतेची म्हणजे तुमची माझीच कथा सांगणारा एक साधक .
एथ आले असती अवघे |परी म्या कवनेसी झुंजावे |हे रणी लागे पाहावे | म्हणोनिया |
त्यावेळी तिथे जमलेले आपलेच बांधव आहेत हे बघून तो करुणेने व्याकूळ झाला .
मग देवा म्हणा देख ,देख |हे गोत्र गुरु अशेख |तंव कृष्ण मनी नावेक |विस्मो झाला |
इथून पुढे ज्ञानेश्वरांचे कृष्णार्जुन हे गीतेतील अर्जुनाच्या पुढे निघून जातात .त्यांच्या मनातील भावनांचे हिंदोळे आणि विचार व्यक्त करताना श्री ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेला बहार येतो .ते त्या दोघांना मानवी पातळीवर आणतात .
ऐसी पुढील से घेतु |तो सहज जाणे हृद्य्सत्तू|परी उगा असे निवांतु |तेणे वेळी |
अर्जुनाचा संभ्रम बघून श्रीकृष्णाला आश्चर्य वाटले ,तरी तो शांत राहिला .अर्जुनाच्या मनातील करुणे मुळे त्याची वीरवृत्ती .कशी अपमानित झाली ते अनेक दृष्टान्तानी सांगताना ज्ञानेश्वरीचे वेगळेपण उठून दिसते कमल कलीकेच्या आत बंदी झालेल्या भुंग्यामुळे कलिका जशी थरथर कापते तसा अर्जुन कापत होता असे ते वर्णन करतात .
गीतेच्या३२ ,३३ श्लोकावरभाष्य करताना पुन्हा एकदा अर्जुन भावनेच्या भरात म्हणतो हे माझ्या वाटेला आलेले कर्म विपरीत आहे ,अशा युद्धास सामोरे जाण्याबद्दल तो स्वतःचा धिक्कार करतो ..यांना ठार मारून त्रैलोक्याचे राज्य मिळाले तरी मला नको असे म्हणतो .तो श्रीकृष्णालाच प्रश्न विचारतो कि हे अयोग्य काम केले तर मला तुझे मुख कसे दिसेल ?
जरी आजि एथ ऐसे कीजे |तरी कवन्नांच्या मनी उरिजे |सांग मुख केवी पाहिजे | तुजवीण कृष्णा |
त्याचा सारा युक्तिवाद ऐकूनही गप्पच बसलेल्या श्रीकृष्णाला तो कळवळून म्हणतो देवा तू आपले हृदय वज्रासारखे कठोर केलेस काय ?
देवा हे विविध कानी ऐकिजे |परी अजुन्वारी त्रासु नुपजे |हृदय वज्राचे हे काय कीजे |अवधारी पा |
या पूर्ण भागात ओवी ९३ ते २७५ जो संवाद ज्ञानेश्वरांनी वर्णन केला आहे तो एकतर्फी आहे .आपल्या गुरु आणि श्रेष्ठ मित्र असलेल्या कृष्णाला आपली विकल; मनस्थिती वर्णन करून सांगणारा अर्जुन बोलतो आणि भगवान अति स्नेहाने सहृदयतेने ते ऐकतात अर्जुन त्याला पटवू पाहतो ,साद घालतो आपल्या भीतीचे वर्णन करतो ,केशवा कृष्णा ,जनार्दना अशी मैत्र भावाची संबोधने वापरतो .कृष्णार्जुन नात्याच्या मोठ्या प्रवासाचा हा पहिला टप्पा आहे .पुढे तो सखा ते बंधू ,ते गुरु करत विश्वरूप दर्शनाच्या पर्यंत पोहोचतो आणि त्याच्याबरोबर श्रोत्यानाही बोट धरून पारमार्थिक प्रवासाचे हे टप्पे पार करतो .इथून पुढे फुलणाऱ्या नात्याची ही केवळ सुरवात आहे .
संकटात सापडल्यावर अनन्य भावाने आपल्या दैवताला शरण जाणाऱ्या,कळवळून सल्ला मागणाऱ्या अर्जुनाचे हे चित्र अतिशय मानवी आहे .श्री ज्ञानेशांचा हा अर्जुन केवळ पांडवांचा सेनापती नाही ,महामानव नाही ,तो आहे भगवंताचा परमसखा ,अनन्यभक्त .त्याच्या मानसिकतेची म्हणजे तुमची माझीच कथा सांगणारा एक साधक .
Subscribe to:
Posts (Atom)