Wednesday, December 14, 2011

geeta mahatmya

ज्ञानेश्वरी हे गीतेवरील मराठीतले पहिले भाष्य आहे .
श्री महेशानव्य  सम्भूते |निवृत्तीनाथ सुते|
केले ज्ञानदेवे गीते |देशीकार लेणे |
गीता हे वैदिक तत्वज्ञानाचे सर ,उप निशिदांचा  अर्क समजले जाते .
सर्वोपनिशिदो गावो |दोग्धा गोपालनंदन|
पार्थो वत्स सुधीर भोक्ता |दुग्धं गीतामृतम महत |
गोपालनंदन हे उपनिशीद  रुपी गाईचे गीता रुपी श्रेष्ठ दुध दोहत आहेत आणि अर्जुन रुपी वासरू ते प्रश्न करत आहे .वेदांनी ज्ञानाचा अधिकार फक्त ब्राह्मण ,क्षत्रिय आणि वैश्य पुरुषांना दिला आहे .गीतेच्या नवव्या अध्यायात भगवंत म्हणतात ,
माही पार्थ त्य्पाश्रीत्य येपिस्यू पाप्योनायहा|स्त्रियो वैश्याततथा श्रुद्रस्तोपी यान्ति परम गतीम |
गीता भगवंताच्या आश्रयाला जाऊन परमगती मिळण्याचा अधिकार स्त्रिया ,श्रुद्र ,पापी या सर्वाना देते .
अपिचेतः सुदुराचारो भाजते माम अनन्यभाव |साधुरेव स मन्तव्य सम्यक व्यवसितो ही सं |
दुष्कर्म्य करणाऱ्या माणसाला त्याची सजा भोगून झाली तरी समाज क्षमा करत नाही .त्याने अनन्यभावाने भक्ती केली तर गीता त्याला साधुपद मिळण्याचे  वचन देते .
गीता ही चिरतरुण आहे ,आपल्या कर्तव्या बद्दल संभ्रमात असणाऱ्या कोणालाही केंव्हाही मार्गदर्शन करण्याचे तिचे सामर्थ्य कालातीत आहे .
गीतेमुळे चारी वर्ण आणि स्त्रिया  या सर्वाना वेदिक तत्वज्ञान अभ्यासण्याची मुभा मिळाली ,त्यांचा न्यूनगंड गेला ,सर्व मानव एकसमान ,इतकेच नाही तर मानव आणि ईश्वर एकच याचा प्रत्यय आला .
येथे कुल्जातीवर्ण |हे अवघेची अकारण |
अशा  या नव्यानेच धर्माची ओळख झालेल्यांनी ईश्वर कोठे शोधावा हेही गीतेने सांगितले .
ईश्वरम सर्व भूतानां हृदेशे अर्जुन तिष्ठति |भ्रम्यान सर्वभूतानि यंत्रारुधानी मामया|
परमेश्वराचे अस्तित्व सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी आहे ,तेंवा सर्वांवर प्रेम करणे ही भगवंताची भक्ती ,
कर्मणा तमान्चार्य सिद्धिं विन्दति मानवः |
आपली नित्य कर्मेच परमेश्वराला वाहण्याच्या फुलांप्रमाणे शुध्द ठेवून त्याला कर्मफळ अर्पण करायचे हे पूजा त्याला आवडते .
समाजातील वंचितांसाठी गीता द्वत असलेला आधार श्री ज्ञानेशानी त्यांच्या भाषेत त्यांच्या पर्यंत पोहोचवला आणि गीतेला खर्या अर्थाने  विश्वाचा आधार बनवले .
संदर्भ -"द्वादशी " प्राचार्य राम शेवाळकर

No comments:

Post a Comment