अर्जुन हा रणांगणावर पूर्ण तयारीने आला आहे .येथे कोणाबरोबर युद्ध करायचे ते नीट बघण्यासाठी त्याने रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करण्यास सांगितले .वाढ्यांचा रणघोष ऐकून तो उत्साहित झाला .
एथ आले असती अवघे |परी म्या कवनेसी झुंजावे |हे रणी लागे पाहावे | म्हणोनिया |
त्यावेळी तिथे जमलेले आपलेच बांधव आहेत हे बघून तो करुणेने व्याकूळ झाला .
मग देवा म्हणा देख ,देख |हे गोत्र गुरु अशेख |तंव कृष्ण मनी नावेक |विस्मो झाला |
इथून पुढे ज्ञानेश्वरांचे कृष्णार्जुन हे गीतेतील अर्जुनाच्या पुढे निघून जातात .त्यांच्या मनातील भावनांचे हिंदोळे आणि विचार व्यक्त करताना श्री ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेला बहार येतो .ते त्या दोघांना मानवी पातळीवर आणतात .
ऐसी पुढील से घेतु |तो सहज जाणे हृद्य्सत्तू|परी उगा असे निवांतु |तेणे वेळी |
अर्जुनाचा संभ्रम बघून श्रीकृष्णाला आश्चर्य वाटले ,तरी तो शांत राहिला .अर्जुनाच्या मनातील करुणे मुळे त्याची वीरवृत्ती .कशी अपमानित झाली ते अनेक दृष्टान्तानी सांगताना ज्ञानेश्वरीचे वेगळेपण उठून दिसते कमल कलीकेच्या आत बंदी झालेल्या भुंग्यामुळे कलिका जशी थरथर कापते तसा अर्जुन कापत होता असे ते वर्णन करतात .
गीतेच्या३२ ,३३ श्लोकावरभाष्य करताना पुन्हा एकदा अर्जुन भावनेच्या भरात म्हणतो हे माझ्या वाटेला आलेले कर्म विपरीत आहे ,अशा युद्धास सामोरे जाण्याबद्दल तो स्वतःचा धिक्कार करतो ..यांना ठार मारून त्रैलोक्याचे राज्य मिळाले तरी मला नको असे म्हणतो .तो श्रीकृष्णालाच प्रश्न विचारतो कि हे अयोग्य काम केले तर मला तुझे मुख कसे दिसेल ?
जरी आजि एथ ऐसे कीजे |तरी कवन्नांच्या मनी उरिजे |सांग मुख केवी पाहिजे | तुजवीण कृष्णा |
त्याचा सारा युक्तिवाद ऐकूनही गप्पच बसलेल्या श्रीकृष्णाला तो कळवळून म्हणतो देवा तू आपले हृदय वज्रासारखे कठोर केलेस काय ?
देवा हे विविध कानी ऐकिजे |परी अजुन्वारी त्रासु नुपजे |हृदय वज्राचे हे काय कीजे |अवधारी पा |
या पूर्ण भागात ओवी ९३ ते २७५ जो संवाद ज्ञानेश्वरांनी वर्णन केला आहे तो एकतर्फी आहे .आपल्या गुरु आणि श्रेष्ठ मित्र असलेल्या कृष्णाला आपली विकल; मनस्थिती वर्णन करून सांगणारा अर्जुन बोलतो आणि भगवान अति स्नेहाने सहृदयतेने ते ऐकतात अर्जुन त्याला पटवू पाहतो ,साद घालतो आपल्या भीतीचे वर्णन करतो ,केशवा कृष्णा ,जनार्दना अशी मैत्र भावाची संबोधने वापरतो .कृष्णार्जुन नात्याच्या मोठ्या प्रवासाचा हा पहिला टप्पा आहे .पुढे तो सखा ते बंधू ,ते गुरु करत विश्वरूप दर्शनाच्या पर्यंत पोहोचतो आणि त्याच्याबरोबर श्रोत्यानाही बोट धरून पारमार्थिक प्रवासाचे हे टप्पे पार करतो .इथून पुढे फुलणाऱ्या नात्याची ही केवळ सुरवात आहे .
संकटात सापडल्यावर अनन्य भावाने आपल्या दैवताला शरण जाणाऱ्या,कळवळून सल्ला मागणाऱ्या अर्जुनाचे हे चित्र अतिशय मानवी आहे .श्री ज्ञानेशांचा हा अर्जुन केवळ पांडवांचा सेनापती नाही ,महामानव नाही ,तो आहे भगवंताचा परमसखा ,अनन्यभक्त .त्याच्या मानसिकतेची म्हणजे तुमची माझीच कथा सांगणारा एक साधक .
एथ आले असती अवघे |परी म्या कवनेसी झुंजावे |हे रणी लागे पाहावे | म्हणोनिया |
त्यावेळी तिथे जमलेले आपलेच बांधव आहेत हे बघून तो करुणेने व्याकूळ झाला .
मग देवा म्हणा देख ,देख |हे गोत्र गुरु अशेख |तंव कृष्ण मनी नावेक |विस्मो झाला |
इथून पुढे ज्ञानेश्वरांचे कृष्णार्जुन हे गीतेतील अर्जुनाच्या पुढे निघून जातात .त्यांच्या मनातील भावनांचे हिंदोळे आणि विचार व्यक्त करताना श्री ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेला बहार येतो .ते त्या दोघांना मानवी पातळीवर आणतात .
ऐसी पुढील से घेतु |तो सहज जाणे हृद्य्सत्तू|परी उगा असे निवांतु |तेणे वेळी |
अर्जुनाचा संभ्रम बघून श्रीकृष्णाला आश्चर्य वाटले ,तरी तो शांत राहिला .अर्जुनाच्या मनातील करुणे मुळे त्याची वीरवृत्ती .कशी अपमानित झाली ते अनेक दृष्टान्तानी सांगताना ज्ञानेश्वरीचे वेगळेपण उठून दिसते कमल कलीकेच्या आत बंदी झालेल्या भुंग्यामुळे कलिका जशी थरथर कापते तसा अर्जुन कापत होता असे ते वर्णन करतात .
गीतेच्या३२ ,३३ श्लोकावरभाष्य करताना पुन्हा एकदा अर्जुन भावनेच्या भरात म्हणतो हे माझ्या वाटेला आलेले कर्म विपरीत आहे ,अशा युद्धास सामोरे जाण्याबद्दल तो स्वतःचा धिक्कार करतो ..यांना ठार मारून त्रैलोक्याचे राज्य मिळाले तरी मला नको असे म्हणतो .तो श्रीकृष्णालाच प्रश्न विचारतो कि हे अयोग्य काम केले तर मला तुझे मुख कसे दिसेल ?
जरी आजि एथ ऐसे कीजे |तरी कवन्नांच्या मनी उरिजे |सांग मुख केवी पाहिजे | तुजवीण कृष्णा |
त्याचा सारा युक्तिवाद ऐकूनही गप्पच बसलेल्या श्रीकृष्णाला तो कळवळून म्हणतो देवा तू आपले हृदय वज्रासारखे कठोर केलेस काय ?
देवा हे विविध कानी ऐकिजे |परी अजुन्वारी त्रासु नुपजे |हृदय वज्राचे हे काय कीजे |अवधारी पा |
या पूर्ण भागात ओवी ९३ ते २७५ जो संवाद ज्ञानेश्वरांनी वर्णन केला आहे तो एकतर्फी आहे .आपल्या गुरु आणि श्रेष्ठ मित्र असलेल्या कृष्णाला आपली विकल; मनस्थिती वर्णन करून सांगणारा अर्जुन बोलतो आणि भगवान अति स्नेहाने सहृदयतेने ते ऐकतात अर्जुन त्याला पटवू पाहतो ,साद घालतो आपल्या भीतीचे वर्णन करतो ,केशवा कृष्णा ,जनार्दना अशी मैत्र भावाची संबोधने वापरतो .कृष्णार्जुन नात्याच्या मोठ्या प्रवासाचा हा पहिला टप्पा आहे .पुढे तो सखा ते बंधू ,ते गुरु करत विश्वरूप दर्शनाच्या पर्यंत पोहोचतो आणि त्याच्याबरोबर श्रोत्यानाही बोट धरून पारमार्थिक प्रवासाचे हे टप्पे पार करतो .इथून पुढे फुलणाऱ्या नात्याची ही केवळ सुरवात आहे .
संकटात सापडल्यावर अनन्य भावाने आपल्या दैवताला शरण जाणाऱ्या,कळवळून सल्ला मागणाऱ्या अर्जुनाचे हे चित्र अतिशय मानवी आहे .श्री ज्ञानेशांचा हा अर्जुन केवळ पांडवांचा सेनापती नाही ,महामानव नाही ,तो आहे भगवंताचा परमसखा ,अनन्यभक्त .त्याच्या मानसिकतेची म्हणजे तुमची माझीच कथा सांगणारा एक साधक .
No comments:
Post a Comment