Tuesday, March 27, 2012

yudhdhabhumi

युद्ध भूमीवर कौरव आणि  पांडव सामोरे आले असताना अर्जुनश्रीकृष्णाला आपला रथ पुढे नेण्यास सांगतो ,यानंतरचे अर्जुनाच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेचे वर्णन हा या महाकवीच्या प्रतिभेचा उत्कट अविष्कार आहे .
धृतराष्ट्र संजयला प्रश्न विचारताना म्हणतो :,धर्मक्षेत्रे ,कुरुक्षेत्रे : -कुरुक्षेत्र हे धर्माचे निवासस्थान ,या भूमीवर तुम्ही तुमचा स्वधर्म पळून जिंका व मरा -स्वर्ग तुमचाच आहे ,असे हा धर्मक्षेत्र शब्द सांगतो .
पुढे तो म्हणतो की "तेथे पांडव आणि माझे गेले असत व्याजे झुन्झाचे की " युद्ध हे निमित्त  आहे ,खरे कारण असे की कौरवांचा पापाचा घडा भरला होता .
 तेथे कृष्ण हा उभा आहे "न धरी शास्त्र मी करी "पण त्याचे चक्र म्हणजे तेज आणि शक्ती यांचे प्रतिक ,हि शक्ती दुष्टांच्या संहारासाठी ज्यांनी शस्त्र धरले त्यांच्याकडे आहेच .
अर्जुनाचा रथ  ,ते भांडार महातेजाचे ।तेथ गरुदाचीये जावळीचे ।कांतले चारही ।
 महातेजाचे भांडार असा हा रथ ,याला वेगवान आणि बलवान गरुडाचे जणू जुळे भाऊ असे पांढरेश्रुभ्र अश्व जोडले आहेत .गरुड हे विष्णूचे वाहन ,म्हणून येथे गरुडाची उपमा देऊन श्रीकृष्णाचे अस्तित्व अधोरेखित केले आहे .,जो येथे सारथी आहे .
  की पंखाचा मेरू जैसा ।मिरवितसे तैसा तेजे कोंडतलीया  दिशा ।सोन्याचा लखलखीत मेरू पर्वत ,त्याला पंख फुटावे असा हा रथ 'एकाच वेळी मेरूची स्थिरता आणि अश्वाची गतिमानता दोन्ही तेथे आहे ,असा हा रथ
"हो का निजसार विजयाचे " हा रथ म्हणजे विजयाची खात्रीच ,
 ध्वजेवारी वानरु ।तो मूर्तिमंत शंकरु ।
  त्याच्या ध्वज स्तंभावर मारुती बसलेला आहे ,मारुती हा अकरावा रुद्र ,म्हणून त्यास शंकर म्हंटले आहे .
या रथाचा   सारथी का बर बनला आहे श्रीकृष्ण ?
देखा नवल प्रभूचे ।अद्भुत प्रेम भक्ताचे ।जे सारथ्य पार्थाचे ।करीतु असे ।
भाक्तावरच्या प्रेमापोटी भगवंत सारथी झालेत .तो योद्धा हा सारथी ,दोघे बंधू आणी मित्र असे हे नाते सुरु झाले .मग त्याने शंख फुंकला आणि कृष्णार्जुन संवादाच्या रूपाने श्रीज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने नवे वळण घेतले .

No comments:

Post a Comment