वेद सांगतात की ब्रह्म या साध्यापर्यंत पोहोचण्याचे धर्म हे साधन आहे .वर्ण आणि आश्रम यांना अनुसरून विहित कर्म आणि आचार यांचे पालन यास धर्म असे म्हटले आहे .अर्जुन हा क्षत्रिय असल्याने चालून आलेले धर्मयुद्ध करणे हा त्याचा विहित धर्म होता ,म्हणून युद्ध नको म्हणणाऱ्या अर्जुनास श्रीकृष्ण त्याच्या स्वधर्माची आठवण करून देतात .
धर्म प्रतिपालन का करावे ?तर व्यक्ती ,समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी त्याची आवश्यकता असते .धर्माचरणाचे फल म्हणून व्यक्तीस इहलोकी अभ्युदय आणि परलोकी मोक्षाची प्राप्ती होते .जगताच्या अभ्युदयासाठी धर्माची आवश्यकता असल्याने धर्मरक्षणार्थ भगवान युगायुगाने अवतार घेत असतात .
मग स्वधर्म एकआहे। जो सर्वथा त्याज्य नोहे ।मग तरिजेल काय पाहे ।कृपाळूपणे ।
कोणत्याही परिस्थितीत युगांत आला तरी स्वधर्माचरनंच त्यातून तारून नेईल ,म्हणून ते कधीही त्याज्य नाही असे भगवंत बजावून सांगतात .
व्यक्तीसाठी काही गोष्टीचे संदर्भ काळ ,परिस्थिती यानुसार बदलत नसतात ,जसे स्वातंत्र्य आणि धर्म .
धर्म हे साक्षात परमेश्वराचे स्वरूप आहे ,म्हणून स्वशारीरापेक्षा ,प्राणापेक्षा ,आप्त जनापेक्षा स्वधर्म श्रेष्ठ आहे -व कोणतीही परीस्थीती यास अपवाद नाही
जैसे मार्गे चालीता ।अपायो न पावे सर्वथा ।का दीपाधारे वर्तता ।नाद्लीजे ।
तयापरी पार्था ।स्वधर्मे रहातता ।सकल काम पूर्तता ।सहजे होय ।
श्री भगवान सांगतात की ज्याप्रमाणे राजमार्गाने गेले असताअपाय होत नाही ,अथवा दिवा घेऊन चालले असता अडखळत नाही ,त्याप्रमाणे स्वधर्माने चालले असता सर्वमनोरथांची सफलता प्राप्त होते .
सत्यासाठी शुध्द बुद्धीने लढणे म्हणजे धर्माने सांगितलेल्या मार्गाने चालणेहोय. या युद्धात कामी आल्यास स्वर्ग प्राप्त होतो ,आणि जय मिळाल्यास कीर्ती आणि वैभव मिळते .हे युद्ध न केल्याने विहित कर्म न केल्याचे पाप तुला लागेल व तुझ्या कीर्तीला बाधा येईल म्हणून हे धर्म युद्ध करण्यातच तुझा क्षत्रिय धर्म आहे .
धर्म प्रतिपालन का करावे ?तर व्यक्ती ,समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी त्याची आवश्यकता असते .धर्माचरणाचे फल म्हणून व्यक्तीस इहलोकी अभ्युदय आणि परलोकी मोक्षाची प्राप्ती होते .जगताच्या अभ्युदयासाठी धर्माची आवश्यकता असल्याने धर्मरक्षणार्थ भगवान युगायुगाने अवतार घेत असतात .
मग स्वधर्म एकआहे। जो सर्वथा त्याज्य नोहे ।मग तरिजेल काय पाहे ।कृपाळूपणे ।
कोणत्याही परिस्थितीत युगांत आला तरी स्वधर्माचरनंच त्यातून तारून नेईल ,म्हणून ते कधीही त्याज्य नाही असे भगवंत बजावून सांगतात .
व्यक्तीसाठी काही गोष्टीचे संदर्भ काळ ,परिस्थिती यानुसार बदलत नसतात ,जसे स्वातंत्र्य आणि धर्म .
धर्म हे साक्षात परमेश्वराचे स्वरूप आहे ,म्हणून स्वशारीरापेक्षा ,प्राणापेक्षा ,आप्त जनापेक्षा स्वधर्म श्रेष्ठ आहे -व कोणतीही परीस्थीती यास अपवाद नाही
जैसे मार्गे चालीता ।अपायो न पावे सर्वथा ।का दीपाधारे वर्तता ।नाद्लीजे ।
तयापरी पार्था ।स्वधर्मे रहातता ।सकल काम पूर्तता ।सहजे होय ।
श्री भगवान सांगतात की ज्याप्रमाणे राजमार्गाने गेले असताअपाय होत नाही ,अथवा दिवा घेऊन चालले असता अडखळत नाही ,त्याप्रमाणे स्वधर्माने चालले असता सर्वमनोरथांची सफलता प्राप्त होते .
सत्यासाठी शुध्द बुद्धीने लढणे म्हणजे धर्माने सांगितलेल्या मार्गाने चालणेहोय. या युद्धात कामी आल्यास स्वर्ग प्राप्त होतो ,आणि जय मिळाल्यास कीर्ती आणि वैभव मिळते .हे युद्ध न केल्याने विहित कर्म न केल्याचे पाप तुला लागेल व तुझ्या कीर्तीला बाधा येईल म्हणून हे धर्म युद्ध करण्यातच तुझा क्षत्रिय धर्म आहे .
No comments:
Post a Comment