अठराव्या अध्यायात भगवंत वैरागी पुरुष ब्रम्हप्राप्तीपर्यंत कसा पोहोचतो हे सांगतात .
ते म्हणतात ,जसे सूर्य उगवताच अंधार हा प्रकाशच होतो .तसे कोणाला दैवाने गुरुनी केलेला उपदेश ऐकल्याबरोबर द्वैत नाहीसे होऊन वृत्ती आत्म स्वरूपी स्थिर होते .,परंतु दुसर्यांना महावाक्याच्या श्रवणा बरोबर ब्रम्हरूप होता येत नाही ,तर त्याला कर्ममार्गाने बुद्धीवरील दोषांचे विवरण करावे लागते .स्वधर्माचे पालन करून कर्म रुपी अग्नीमध्ये चित्तावरील रज ,तम हे मल दोष जाळावे लागतात .
एरव्ही स्वकर्माचेनी वन्हि ।काम्य निशिधाच्या इंधनी ।रजतमे कीर दोन्ही ।जाळिली आधी ।९९२अ १८
मग पुत्र द्रव्य आणि स्वर्गादी लोक या तिन्ही विषयी इच्छा वर त्याला ताबा मिळवता येतो .
त्याज्य व अत्याज्य असा सारासार विवेक न करता हव्या त्या विषयांचा उपभोग घेतल्याने विटाळलेली इंद्रिये प्रत्याहार रुपी तीर्थात स्नान घालून त्याने शुध्द केली .
स्वधर्मा चरणाचे फल ईश्वराला अर्पण करून त्याच्याकडून वैराग्याचे बल मागून घेतले .
आत्मसाक्षात्कारासाठी आवश्यक अशा ज्ञानाच्या उत्कर्षाच्या प्राप्तीची सर्व सामग्री त्याने अशा पध्दतीने मिळवली ,आणि त्याचवेळी सत्गुरू भेटले .व त्यांनी ज्ञानाचा चांगला उपदेश केला .या उपदेशामुळे ब्रम्हच सत्य व इतर सर्व मिथ्या हा अनुभव दृढ केला
शुध्द बुद्धीने युक्त ,सात्विक धैर्याने स्वतःचे मन व बुद्धी ,इंद्रिये यांचे नियमन करून ,शब्दादी विषयांचा त्याग करून ,प्रीती आणि द्वेष दोन्ही सोडून ,एकांत सेवन करणारा ,मिताहारी ,वाणी ,शरीर व मन यांचे पूर्ण नियंत्रण केलेला ,ध्यान योगपर वैराग्याचा नित्य आश्रय केलेला ,अहंकार ,बल ,दर्प ,काम ,क्रोध ,परिग्रह या सर्वांचा त्याग करून ममत्व बुद्धी विरहीत ,शांत झालेला साधक ब्रम्ह रूप होण्यास योग्य होतो .
शोक न करणारा व इच्छाही न करणारा ,सर्व भुतांच्या ठिकाणी समत्व प्राप्त झालेला पुरुष श्रेष्ठ भक्ती प्राप्त करतो .तो ब्रम्ह भावाची प्राप्ती होण्याची योग्यता धारण करतो .
ज्ञान व भक्ती या दोन्हीच्या योगाने प्रथम भगवंत कोण व कसा आहे हा आत्म बोध प्राप्त करून घेऊन मग तो त्याच्याशी पूर्ण समरस होतो ,स्वतःच ब्रम्हरूप होतो .
ते म्हणतात ,जसे सूर्य उगवताच अंधार हा प्रकाशच होतो .तसे कोणाला दैवाने गुरुनी केलेला उपदेश ऐकल्याबरोबर द्वैत नाहीसे होऊन वृत्ती आत्म स्वरूपी स्थिर होते .,परंतु दुसर्यांना महावाक्याच्या श्रवणा बरोबर ब्रम्हरूप होता येत नाही ,तर त्याला कर्ममार्गाने बुद्धीवरील दोषांचे विवरण करावे लागते .स्वधर्माचे पालन करून कर्म रुपी अग्नीमध्ये चित्तावरील रज ,तम हे मल दोष जाळावे लागतात .
एरव्ही स्वकर्माचेनी वन्हि ।काम्य निशिधाच्या इंधनी ।रजतमे कीर दोन्ही ।जाळिली आधी ।९९२अ १८
मग पुत्र द्रव्य आणि स्वर्गादी लोक या तिन्ही विषयी इच्छा वर त्याला ताबा मिळवता येतो .
त्याज्य व अत्याज्य असा सारासार विवेक न करता हव्या त्या विषयांचा उपभोग घेतल्याने विटाळलेली इंद्रिये प्रत्याहार रुपी तीर्थात स्नान घालून त्याने शुध्द केली .
स्वधर्मा चरणाचे फल ईश्वराला अर्पण करून त्याच्याकडून वैराग्याचे बल मागून घेतले .
आत्मसाक्षात्कारासाठी आवश्यक अशा ज्ञानाच्या उत्कर्षाच्या प्राप्तीची सर्व सामग्री त्याने अशा पध्दतीने मिळवली ,आणि त्याचवेळी सत्गुरू भेटले .व त्यांनी ज्ञानाचा चांगला उपदेश केला .या उपदेशामुळे ब्रम्हच सत्य व इतर सर्व मिथ्या हा अनुभव दृढ केला
शुध्द बुद्धीने युक्त ,सात्विक धैर्याने स्वतःचे मन व बुद्धी ,इंद्रिये यांचे नियमन करून ,शब्दादी विषयांचा त्याग करून ,प्रीती आणि द्वेष दोन्ही सोडून ,एकांत सेवन करणारा ,मिताहारी ,वाणी ,शरीर व मन यांचे पूर्ण नियंत्रण केलेला ,ध्यान योगपर वैराग्याचा नित्य आश्रय केलेला ,अहंकार ,बल ,दर्प ,काम ,क्रोध ,परिग्रह या सर्वांचा त्याग करून ममत्व बुद्धी विरहीत ,शांत झालेला साधक ब्रम्ह रूप होण्यास योग्य होतो .
शोक न करणारा व इच्छाही न करणारा ,सर्व भुतांच्या ठिकाणी समत्व प्राप्त झालेला पुरुष श्रेष्ठ भक्ती प्राप्त करतो .तो ब्रम्ह भावाची प्राप्ती होण्याची योग्यता धारण करतो .
ज्ञान व भक्ती या दोन्हीच्या योगाने प्रथम भगवंत कोण व कसा आहे हा आत्म बोध प्राप्त करून घेऊन मग तो त्याच्याशी पूर्ण समरस होतो ,स्वतःच ब्रम्हरूप होतो .
No comments:
Post a Comment