Wednesday, January 9, 2013

maharshi vyas

महाभारताचे निर्माते महर्षी व्यास,ज्यांच्या प्रज्ञेने असा इतिहास निर्माण केला कि आजही जे महाभारतात नाही ते कोठेही नाही .
ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी महर्षी  व्यासांच्या कर्तृत्वाचे गुणगान केले आहे .
पहिल्या अध्यायात ओंकार रुपी परमात्म्याचे वर्णन करताना श्री ज्ञानेश्वर म्हणतात कि व्यासांची बुद्धी हीच ओंकार रुपी गणेशाच्या कमरेची मेखला आहे .याच अध्यायात पुढे गीतेचे महत्व  .सांगताना ते म्हणतात कि ही कथा प्रत्यक्ष ब्रम्ह असून सर्व शास्त्रात श्रेष्ठ ,सर्व विध्यांचे मूलस्थान आहे ,व्यासांच्या विशाल बुद्धीत स्फुरण पाऊन  ही सरस्वतीच येथे प्रकट झाली आहे .जसे सूर्याच्या प्रकाशात त्रैलोक्य उज्ज्वल दिसते ,तसे व्यासांच्या बुद्धीने उजळलेले विश्व दिसते ,त्यांच्या वाणीतील तेजाने सर्व विश्व उज्ज्वल झाले आहे .व्यसनी आपल्या बुद्धिरूपी रवीने वेद रुपी समुद्राचे मंथन करून भारत रुपी लोणी काढले .त्याला ज्ञान रुपी अग्नीच्या संसर्गाने विवेकाचा कढ दिल्यावर त्याचे गीता रुपी सुगंधी तूप बनले .अशारितीने विशाल बुद्धी व्यसनी महाभारतातील भीष्म पर्वात शांत रसाने भरलेली गीता सांगितली .
पुढे गीतेच्या अठराव्या अध्यायाचे महत्व वर्णन करताना ते म्हणतात कि व्यास मोठे बुद्धिमान कारागीर होते .त्यांनी वेद रुपी रत्नांच्या पर्वतावर असलेल्या उपनिषिद अर्थ रुपी पठारावर खणायला आरंभ केला ,तेंव्हा धर्म ,अर्थ ,काम या पुरुषार्थ रुपी जो चारा निघाला ,त्याचा महाभारत रुपी कोट त्यांनी गीता मंदिराभोवती केला .मग आत्मज्ञान रुपी अखंड दगड निघाला ,त्याचा श्रीकृष्णार्जुन संवाद रुपी चिरा तयार केला .निवृत्ती रुपी ओळंबा लावून सर्व शास्त्रार्थाची पुरणी घालून मोक्षाच्या स्वरूपाचा आकार आणला .पंधरा अध्यायात गीतारूपी मंदिर गच्चीपर्यंत पुरे झाले .सोळावा अध्याय हा गळ्यातील डेरा व सतरावा हा कळसाच्या  बैठकीचा ओटा होय .अठरावा अध्याय हा कळस व त्यावर व्यास हे ध्वजाच्या ठिकाणी लागले .
आई मुलाला भरवताना त्याला खाता येईल असे घास करते ,त्याप्रमाणे श्रीकृष्णार्जुनांची कठीण कथा व्यासांनी  वाटेल त्याला तळहातावर घेते येईल इतकी सोपी केली ,शब्दांनी जे कळत नाही  ते अनुष्टुभ छंदात बसवून सर्वांच्या समजुतीला उतरेल असे व्यासांनी केले .जगावर मोठा उपकार झाला कि त्यांनी श्रीकृष्णाच्या बोलण्याला ग्रंथाचा आकार दिला .आता बाप पुढे जात असताना मुल त्याच्या पाव्लामागोमाग जाते ,त्याप्रमाणे व्यासांचा मागोवा  घेत व भाष्यकारांना वाट  पुसत श्रीज्ञानेश्वर गीतार्थाच्या योग्य ठिकाणी जाण्याची आपल्या गुरुकृपेच्या आधारे प्रतिज्ञा करतात .  

No comments:

Post a Comment