ज्ञानेश्वर महाराज हे अत्यंत विनयशील होते .आपल्या सार्या कर्तृत्वाचे श्रेय ते आपले गुरु श्री निवृत्तीनाथ यांना देतात .या त्यांच्या सांगण्यात लीनता आहे ,पण दीनता नाही याची प्रचीती ते वेळोवेळी मराठी भाषेचा आपला अभिमान व्यक्त करताना व ज्ञानेश्वरी लेखनाच्या आपल्या प्रतीद्नेबद्दल बोलताना देतात .
इये मराठीचिये नगरी ।ब्रम्ह विध्येचा सुकाळू करी ।
अशी ते गुरुना प्रार्थना करतात व त्याच वेळी
माझ्या मराठीचा बोल कौतुके ।अमृतातेही पैजा जिंके ।ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ।
अशा प्रकारे मराठी भाषेचा अभिमान व आपल्या प्रतिभेवरील विश्वास व्यक्त करतात .
अठराव्या अध्यायात व्यासांची गीता व आपली ज्ञानेश्वरी याबद्दल बोलताना ते म्हणतात
तैसा व्यासांचा मागोवा घेतु ।भाष्यकारान्ते वाट पुसुतू ।
अयोग्यही मी न पवतु ।कें जाईन ।
व्यासमुनी व भाष्यकार या आद्य गुरूना वाट विचारत मीही गीतार्थाच्या पर्यंत पोहोचू शकेन असा विश्वास ते व्यक्त करतात .
या ग्रंथ रचनेचे सारे श्रेय आपल्या गुरूना देताना ते म्हणतात कि गुरुकृपेमुळे माझे नित्य नवे श्वासो श्वासही काव्य ग्रंथ होतात .आपल्या कर्तृत्वाचे श्रेय आपल्या गुरुना देताना ते म्हणतात कि कलसुत्राचे बाहुले सूत्राने चालते त्याप्रमाणे मला पुढे करून गुरु बोलत आहेत .
सायीखेडयाचे बाहुले ।चालविल्या सुत्राचेनि चाले ।तैसा माले दावित बोले ।स्वामी तो माझा ।
याशिवाय या ग्रंथ रचनेचे श्रेय ते वारंवार श्रोत्यानाही देतात .संत श्रोत्यांच्या सहवासामुळेच आपण हे काम करू शकलो असे विनम्र पणे म्हणतात .तुमच्या कृपेने ही ग्रंथ रुपी सृष्टी मी निर्माण करू शकलो ,हा उपकार त्रैलोक्यात निरुपम आहे असे ते म्हणतात व उपसंहारात याच विश्व रुपी देवाला
जो जे वांछील तो ते लाहो
असे पसायदान मागतात .
इये मराठीचिये नगरी ।ब्रम्ह विध्येचा सुकाळू करी ।
अशी ते गुरुना प्रार्थना करतात व त्याच वेळी
माझ्या मराठीचा बोल कौतुके ।अमृतातेही पैजा जिंके ।ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ।
अशा प्रकारे मराठी भाषेचा अभिमान व आपल्या प्रतिभेवरील विश्वास व्यक्त करतात .
अठराव्या अध्यायात व्यासांची गीता व आपली ज्ञानेश्वरी याबद्दल बोलताना ते म्हणतात
तैसा व्यासांचा मागोवा घेतु ।भाष्यकारान्ते वाट पुसुतू ।
अयोग्यही मी न पवतु ।कें जाईन ।
व्यासमुनी व भाष्यकार या आद्य गुरूना वाट विचारत मीही गीतार्थाच्या पर्यंत पोहोचू शकेन असा विश्वास ते व्यक्त करतात .
या ग्रंथ रचनेचे सारे श्रेय आपल्या गुरूना देताना ते म्हणतात कि गुरुकृपेमुळे माझे नित्य नवे श्वासो श्वासही काव्य ग्रंथ होतात .आपल्या कर्तृत्वाचे श्रेय आपल्या गुरुना देताना ते म्हणतात कि कलसुत्राचे बाहुले सूत्राने चालते त्याप्रमाणे मला पुढे करून गुरु बोलत आहेत .
सायीखेडयाचे बाहुले ।चालविल्या सुत्राचेनि चाले ।तैसा माले दावित बोले ।स्वामी तो माझा ।
याशिवाय या ग्रंथ रचनेचे श्रेय ते वारंवार श्रोत्यानाही देतात .संत श्रोत्यांच्या सहवासामुळेच आपण हे काम करू शकलो असे विनम्र पणे म्हणतात .तुमच्या कृपेने ही ग्रंथ रुपी सृष्टी मी निर्माण करू शकलो ,हा उपकार त्रैलोक्यात निरुपम आहे असे ते म्हणतात व उपसंहारात याच विश्व रुपी देवाला
जो जे वांछील तो ते लाहो
असे पसायदान मागतात .
No comments:
Post a Comment