Monday, January 14, 2013

satvgun

आदिब्रम्हाच्या आधारावर मायेने निर्माण केलेली ही अवघी सृष्टी त्रिगुणात्मक आहे असे म्हटले जाते .सत्व ,रज व तम या गुणांच्या आधारावर वृत्ती ,कर्म ,कर्मफल या सार्यांची विभागणी केली जाते .यापैकी सत्वगुणाचे महत्व सांगताना भगवंत म्हणतात ,माझ्या विभूती पैकी सत्वगुणसंपन्ना मध्ये जे सत्व आहे ते मी आहे .
सोळाव्या अध्यायात दैवी संपत्तीचे वर्णन करताना सत्वगुण युक्त व्यक्तीची लक्षणे ते सांगतात ,ते म्हणतात ,-संकल्प -विकल्पाची ओढ टाकून ,रज तम वृत्तीचे ओझे टाकून ,आत्म चिंतनाचे प्रेम भोगणारी वृत्ती स्थिर बुद्धीने आत्म स्वरूपी अनन्य होते ,यास सत्वशुद्धी म्हणतात .
तैसी संकल्प विकल्पाची ओढी ।सांडूनी रज तमाची कावडी । भोगिता निजधर्माची आवडी ।बुद्धी उरे ।अ १६ओवी ७६
अठराव्या अध्यायात भगवंत सांगतात कि ज्ञाता ,ज्ञान व ज्ञेय हे तीन कर्माची प्रेरणा आहेत व करता कारण व कार्य हा कर्माचा साठा आहे .आत्मा हा कर्मापासून वेगळा आहे .सांख्य शास्त्राने सांगितले आहे कि ज्ञान ,कर्म व करता ही सत्व ,रज व तम या गुण भेदाने तीन प्रकारची आहेत ,सत्व गुणाने केलेले कर्म हे  आत्म्याला कर्माच्या बंधनातून मुक्त करते ,म्हणून प्रत्येकाने सत्वगुनाच्या पातळीवरील जीवन स्वीकारायचे आहे व रज तमाच्या पातळीचा सर्वस्वी त्याग करायचा आहे .

No comments:

Post a Comment