आधीची विवेकाची गोठी ।वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी ।
आणि भक्तराज किरीटी ।परिसत असे ।
मुळची गीता आत्मानात्म विचाराची गोष्ट ,त्यात श्रीकृष्ण प्रतिपादन करत आहे ,आणि भक्तराज अर्जुन ऐकत आहे .
विवेक म्हणजे सारासार विचार .
विविच्याते इति विवेक :म्हणजे ज्याचे पृथकरण केले जाते तो विवेक .सारासाराचे पृथकरण विवेकाने केले जाते .विवेक हे एक तपच आहे .
तैसे देहजीवाचिये मिळणी ।जो उदयजला सुये पाणी ।तो विवेक अन्तकारणी जागवी जो ।१६\११०
तप या दैवी संपत्तीचे वर्णन करताना भगवंत म्हणतात , देह आणि आत्मा या मधील फरक जाणणारा आत्मानात्म विचार हा विवेक जो अन्तकारणी सतत जागा ठेवतो तो तप या शब्दाचा अर्थ आहे .
संसारात अथवा परमार्थात कोठेही विवेकाशिवाय कोणतीही गोष्ट योग्य करता येत नाही ,आत्मानात्म विवेकानेच परमात्म्याचा लाभ होतो 'श्री ज्ञानेश्वर म्हणतात कि सदगुरू माझ्या हृदयात आहेत म्हणून मला विवेक आदरणीय आहे .
चांगले काय आणि वाईट काय हे निश्चयाने सांगता येणे म्हणजे विवेक ,हे चांगले अखंड ,नित्य, सर्वकालीन ,आणि सर्वांसाठी असले पाहिजे .जे नैतिक दृष्ट्या कायम सर्वाना कल्याणकारक आणि आनंददायी आहे ते चांगले .
असा विवेक जागा असतो तेंव्हा मनुष्य स्वार्थी असत नाही ,तोस्वतः बरोबर सर्वांचा विचार करतो .असा विवेक अखंड राहावा म्हणून गरज असते वैराग्याची ,जर आपले मन गरजेपेक्षा जास्त एखाद्या विषयात गुंतले तर लोभामुळे विवेक जातो -स्वार्थ मध्ये येतो .म्हणून वैराग्य म्हणजे कोणत्याही लोभात गुंतून न पडणे .
देखा विवेकवंतु सुविमळु ।तोची शुण्डदंडु सरळु ।जेथ परमानंदु केवळु ।महासुखाचा ।
गणपतीची सरळ सोंड निर्मल आणि विवेकवंत म्हणजे बर्यावाईटाची निवड करण्यास समर्थ आहे
महाभारतास विवेक तरुंचे उद्यान म्हटले आहे .
म्हणोनी आईके देवा ।हा भावार्थु आता न बोलवा ।मज विवेकू सांगावा ।म्हहाराजी ।३ /१७
तिसऱ्या अध्यायात कर्म कि ज्ञान या घोटाळ्यात पडलेला अर्जुन विनवणी करतो कि देवा आता गुढार्थाने उपदेश करू नका ,मला विवेक लक्षण सोपे करून सांगा .
आपल्या अवतार बरोबर विवेकलक्षण जोडताना भगवंत म्हणतात ,
ऐसेची काजालागी ।अवतरे मी युगीयुगी ।परि हेच ओळखे जो जगी । तो विवेकिया ।४ /४०७
सज्जनांच्या रक्षणाकरता ,दुर्जनांच्या नाशाकरिता ,धर्म संस्थापनेकरिता मी प्रत्येक युगात अवतार घेतो -हे तत्व जो ओळखतो तो विवेकी होय .
विवेकाचे महत्व सांगणाऱ्या गोष्टी सगळीकडेच येतात
ऐसा जंव पार्था ।विवेक नूधवी माथा ।तंव अंत नाही अश्वत्था ।भवरुपा यया ।
जोपर्यंत विवेकाने डोके वर काढले नाही तोपर्यंत या संसाररूपी अश्वत्थाला अंत नाही .
विवेक अपुले काम ।स्मरूनी ठाकी जे धाम ।निष्कर्षाचे निस्सीम ।किंबहुना कि ।४ /४०७
चौथ्या अध्यायात ब्रह्म आणि स्वतः यात भेद नाही हे सांगताना भगवंत म्हणतात ,विवेकविचाराने आपले काम पूर्ण केल्यावर जो येथे पोहोचतो ते ज्ञानेचे अंतिम स्थान मीच आहे .
आणि भक्तराज किरीटी ।परिसत असे ।
मुळची गीता आत्मानात्म विचाराची गोष्ट ,त्यात श्रीकृष्ण प्रतिपादन करत आहे ,आणि भक्तराज अर्जुन ऐकत आहे .
विवेक म्हणजे सारासार विचार .
विविच्याते इति विवेक :म्हणजे ज्याचे पृथकरण केले जाते तो विवेक .सारासाराचे पृथकरण विवेकाने केले जाते .विवेक हे एक तपच आहे .
तैसे देहजीवाचिये मिळणी ।जो उदयजला सुये पाणी ।तो विवेक अन्तकारणी जागवी जो ।१६\११०
तप या दैवी संपत्तीचे वर्णन करताना भगवंत म्हणतात , देह आणि आत्मा या मधील फरक जाणणारा आत्मानात्म विचार हा विवेक जो अन्तकारणी सतत जागा ठेवतो तो तप या शब्दाचा अर्थ आहे .
संसारात अथवा परमार्थात कोठेही विवेकाशिवाय कोणतीही गोष्ट योग्य करता येत नाही ,आत्मानात्म विवेकानेच परमात्म्याचा लाभ होतो 'श्री ज्ञानेश्वर म्हणतात कि सदगुरू माझ्या हृदयात आहेत म्हणून मला विवेक आदरणीय आहे .
चांगले काय आणि वाईट काय हे निश्चयाने सांगता येणे म्हणजे विवेक ,हे चांगले अखंड ,नित्य, सर्वकालीन ,आणि सर्वांसाठी असले पाहिजे .जे नैतिक दृष्ट्या कायम सर्वाना कल्याणकारक आणि आनंददायी आहे ते चांगले .
असा विवेक जागा असतो तेंव्हा मनुष्य स्वार्थी असत नाही ,तोस्वतः बरोबर सर्वांचा विचार करतो .असा विवेक अखंड राहावा म्हणून गरज असते वैराग्याची ,जर आपले मन गरजेपेक्षा जास्त एखाद्या विषयात गुंतले तर लोभामुळे विवेक जातो -स्वार्थ मध्ये येतो .म्हणून वैराग्य म्हणजे कोणत्याही लोभात गुंतून न पडणे .
देखा विवेकवंतु सुविमळु ।तोची शुण्डदंडु सरळु ।जेथ परमानंदु केवळु ।महासुखाचा ।
गणपतीची सरळ सोंड निर्मल आणि विवेकवंत म्हणजे बर्यावाईटाची निवड करण्यास समर्थ आहे
महाभारतास विवेक तरुंचे उद्यान म्हटले आहे .
म्हणोनी आईके देवा ।हा भावार्थु आता न बोलवा ।मज विवेकू सांगावा ।म्हहाराजी ।३ /१७
तिसऱ्या अध्यायात कर्म कि ज्ञान या घोटाळ्यात पडलेला अर्जुन विनवणी करतो कि देवा आता गुढार्थाने उपदेश करू नका ,मला विवेक लक्षण सोपे करून सांगा .
आपल्या अवतार बरोबर विवेकलक्षण जोडताना भगवंत म्हणतात ,
ऐसेची काजालागी ।अवतरे मी युगीयुगी ।परि हेच ओळखे जो जगी । तो विवेकिया ।४ /४०७
सज्जनांच्या रक्षणाकरता ,दुर्जनांच्या नाशाकरिता ,धर्म संस्थापनेकरिता मी प्रत्येक युगात अवतार घेतो -हे तत्व जो ओळखतो तो विवेकी होय .
विवेकाचे महत्व सांगणाऱ्या गोष्टी सगळीकडेच येतात
ऐसा जंव पार्था ।विवेक नूधवी माथा ।तंव अंत नाही अश्वत्था ।भवरुपा यया ।
जोपर्यंत विवेकाने डोके वर काढले नाही तोपर्यंत या संसाररूपी अश्वत्थाला अंत नाही .
विवेक अपुले काम ।स्मरूनी ठाकी जे धाम ।निष्कर्षाचे निस्सीम ।किंबहुना कि ।४ /४०७
चौथ्या अध्यायात ब्रह्म आणि स्वतः यात भेद नाही हे सांगताना भगवंत म्हणतात ,विवेकविचाराने आपले काम पूर्ण केल्यावर जो येथे पोहोचतो ते ज्ञानेचे अंतिम स्थान मीच आहे .
No comments:
Post a Comment