Friday, March 30, 2012

sthitpradnyachi lakshane

कर्मयोग समजावताना शेवटी भगवंत म्हणतात की इंद्रियांच्या संगतीने पसरलेली दृष्टी जेंव्हा शुध्द आत्मसुखाच्या ठिकाणी स्थिर होईल तेंव्हा निष्काम कर्मयोग साध्य होईल
यावर अखंड सावध अर्जुनाने विचारले की असा स्थित प्रद्न्य कसा ओळखावा ?त्याला उत्तर देताना भगवंत म्हणतात
१मनात जी उत्कट  विषयासक्ती असते ,ती आत्म्सुखात अडथला  आणते   ,असा हा  काम ज्याचा पूर्ण गेला असतो ,म्हणून मन स्थिर असते तो स्थित प्रद्न्य
२दु :खे आली असता त्याचे मन उद्विग्न होत  नाही,सुखाविषयी तो निरीच्ह असतो ,प्रीती भय क्रोध यांचा त्याने पूर्ण त्याग केला असतो ,तोस्थितप्रद्न्य
३चन्द्र ज्याप्रमाणे सर्वाना सारखा प्रकाश देतो ,त्याप्रमाणे जो सदा व सर्वत्र समबुद्धीने वागतो ,शुभ अथवा अशुभ गोष्टीने ज्यास हर्ष अथवाशोक होत नाही ,तो आत्मज्ञानी स्थितप्रद्न्य होय
४कासव  ज्याप्रमाणे पाहिजे तेंवा आपले अवयव आत ओढून घेऊ शकते ,त्याप्रमाणे तो पंच ज्ञानेन्द्रीयाना विषयाच्या अनुभवापासून परावृत्त करू शकतो ,त्याची बुद्धी स्थिर होऊ शकते .विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्यांच्याविषयी आसक्ती निर्माण होते ,आसक्ती मुले  काम ,कामामुळे क्रोध ,क्रोधापासून संमोह ,संमोहातून स्मृती भ्रंश ,स्मृतीभ्रन्शातून बुद्धिनाश होतो व तो पुरुष नाश पावतो .
लाकडावर पडणार्या लहानशा ठिणगी इतकी शक्ती या विषयामध्ये आहे ,म्हणून हे विषयच मनातून काढले म्हणजे राग ,लोभ ,मत्सर नाहीसे होतील ,चित्त प्रसन्न आणि बुद्धी स्थिर होईल .मनाची चंचलता हे सर्व दुखाचे सार  आहे
या निशा सर्व भूतानां तस्यान जागर्ति संयमी ।यस्य जागृती भूतानि स निशा पश्यतो मुने ।
सर्व मनुष्ये ज्या अत्म्स्वरुपाविषयी निजलेली म्हणजे अज्ञानी असतात तेथे आत्मज्ञानी जागा असतो .प्रपंचाच्या ठिकाणी विषयसुख घेण्यास जेंव्हा  मनुष्ये जागी असतात तेथेस्थितप्रद्न्य  हा त्यापासून परावृत्त झाल्याने निजलेला असतो .अशा अवस्थेत  स्थिर होऊन जो अंत कालपर्यंत  आपली कर्तव्य निभावतो तो ब्राम्ह्पदा पर्यंत पोहोचतो

 

Wednesday, March 28, 2012

apula nijdharm tu pahi

वेद सांगतात की ब्रह्म या साध्यापर्यंत पोहोचण्याचे धर्म हे साधन आहे .वर्ण आणि  आश्रम यांना अनुसरून विहित कर्म आणि आचार यांचे पालन यास धर्म असे म्हटले आहे .अर्जुन हा क्षत्रिय असल्याने चालून आलेले धर्मयुद्ध करणे हा त्याचा विहित धर्म होता ,म्हणून युद्ध नको म्हणणाऱ्या अर्जुनास श्रीकृष्ण त्याच्या स्वधर्माची आठवण करून देतात .
धर्म प्रतिपालन का करावे ?तर व्यक्ती ,समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी त्याची आवश्यकता  असते .धर्माचरणाचे फल म्हणून व्यक्तीस इहलोकी अभ्युदय आणि परलोकी मोक्षाची प्राप्ती होते .जगताच्या अभ्युदयासाठी धर्माची आवश्यकता असल्याने धर्मरक्षणार्थ भगवान युगायुगाने अवतार घेत असतात .
 मग स्वधर्म एकआहे। जो सर्वथा त्याज्य नोहे ।मग तरिजेल काय पाहे ।कृपाळूपणे ।
कोणत्याही परिस्थितीत युगांत आला तरी स्वधर्माचरनंच त्यातून तारून नेईल ,म्हणून ते कधीही त्याज्य नाही असे भगवंत बजावून सांगतात .
व्यक्तीसाठी काही गोष्टीचे संदर्भ काळ ,परिस्थिती यानुसार बदलत नसतात ,जसे स्वातंत्र्य आणि धर्म .
धर्म हे साक्षात परमेश्वराचे स्वरूप आहे ,म्हणून स्वशारीरापेक्षा ,प्राणापेक्षा ,आप्त जनापेक्षा  स्वधर्म श्रेष्ठ आहे -व कोणतीही परीस्थीती यास अपवाद नाही
जैसे मार्गे चालीता ।अपायो न पावे सर्वथा ।का दीपाधारे वर्तता ।नाद्लीजे ।
तयापरी पार्था  ।स्वधर्मे रहातता ।सकल काम पूर्तता ।सहजे होय ।
श्री भगवान सांगतात की ज्याप्रमाणे राजमार्गाने गेले असताअपाय   होत नाही  ,अथवा दिवा घेऊन चालले असता अडखळत नाही ,त्याप्रमाणे स्वधर्माने चालले असता सर्वमनोरथांची सफलता प्राप्त होते .
सत्यासाठी शुध्द बुद्धीने लढणे म्हणजे धर्माने सांगितलेल्या मार्गाने चालणेहोय. या   युद्धात कामी  आल्यास  स्वर्ग प्राप्त होतो ,आणि जय मिळाल्यास कीर्ती आणि वैभव मिळते .हे युद्ध न केल्याने विहित कर्म न केल्याचे पाप तुला लागेल  व तुझ्या कीर्तीला बाधा येईल  म्हणून हे धर्म युद्ध करण्यातच तुझा क्षत्रिय धर्म आहे .

Tuesday, March 27, 2012

yudhdhabhumi

युद्ध भूमीवर कौरव आणि  पांडव सामोरे आले असताना अर्जुनश्रीकृष्णाला आपला रथ पुढे नेण्यास सांगतो ,यानंतरचे अर्जुनाच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेचे वर्णन हा या महाकवीच्या प्रतिभेचा उत्कट अविष्कार आहे .
धृतराष्ट्र संजयला प्रश्न विचारताना म्हणतो :,धर्मक्षेत्रे ,कुरुक्षेत्रे : -कुरुक्षेत्र हे धर्माचे निवासस्थान ,या भूमीवर तुम्ही तुमचा स्वधर्म पळून जिंका व मरा -स्वर्ग तुमचाच आहे ,असे हा धर्मक्षेत्र शब्द सांगतो .
पुढे तो म्हणतो की "तेथे पांडव आणि माझे गेले असत व्याजे झुन्झाचे की " युद्ध हे निमित्त  आहे ,खरे कारण असे की कौरवांचा पापाचा घडा भरला होता .
 तेथे कृष्ण हा उभा आहे "न धरी शास्त्र मी करी "पण त्याचे चक्र म्हणजे तेज आणि शक्ती यांचे प्रतिक ,हि शक्ती दुष्टांच्या संहारासाठी ज्यांनी शस्त्र धरले त्यांच्याकडे आहेच .
अर्जुनाचा रथ  ,ते भांडार महातेजाचे ।तेथ गरुदाचीये जावळीचे ।कांतले चारही ।
 महातेजाचे भांडार असा हा रथ ,याला वेगवान आणि बलवान गरुडाचे जणू जुळे भाऊ असे पांढरेश्रुभ्र अश्व जोडले आहेत .गरुड हे विष्णूचे वाहन ,म्हणून येथे गरुडाची उपमा देऊन श्रीकृष्णाचे अस्तित्व अधोरेखित केले आहे .,जो येथे सारथी आहे .
  की पंखाचा मेरू जैसा ।मिरवितसे तैसा तेजे कोंडतलीया  दिशा ।सोन्याचा लखलखीत मेरू पर्वत ,त्याला पंख फुटावे असा हा रथ 'एकाच वेळी मेरूची स्थिरता आणि अश्वाची गतिमानता दोन्ही तेथे आहे ,असा हा रथ
"हो का निजसार विजयाचे " हा रथ म्हणजे विजयाची खात्रीच ,
 ध्वजेवारी वानरु ।तो मूर्तिमंत शंकरु ।
  त्याच्या ध्वज स्तंभावर मारुती बसलेला आहे ,मारुती हा अकरावा रुद्र ,म्हणून त्यास शंकर म्हंटले आहे .
या रथाचा   सारथी का बर बनला आहे श्रीकृष्ण ?
देखा नवल प्रभूचे ।अद्भुत प्रेम भक्ताचे ।जे सारथ्य पार्थाचे ।करीतु असे ।
भाक्तावरच्या प्रेमापोटी भगवंत सारथी झालेत .तो योद्धा हा सारथी ,दोघे बंधू आणी मित्र असे हे नाते सुरु झाले .मग त्याने शंख फुंकला आणि कृष्णार्जुन संवादाच्या रूपाने श्रीज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने नवे वळण घेतले .