कर्मयोग समजावताना शेवटी भगवंत म्हणतात की इंद्रियांच्या संगतीने पसरलेली दृष्टी जेंव्हा शुध्द आत्मसुखाच्या ठिकाणी स्थिर होईल तेंव्हा निष्काम कर्मयोग साध्य होईल
यावर अखंड सावध अर्जुनाने विचारले की असा स्थित प्रद्न्य कसा ओळखावा ?त्याला उत्तर देताना भगवंत म्हणतात
१मनात जी उत्कट विषयासक्ती असते ,ती आत्म्सुखात अडथला आणते ,असा हा काम ज्याचा पूर्ण गेला असतो ,म्हणून मन स्थिर असते तो स्थित प्रद्न्य
२दु :खे आली असता त्याचे मन उद्विग्न होत नाही,सुखाविषयी तो निरीच्ह असतो ,प्रीती भय क्रोध यांचा त्याने पूर्ण त्याग केला असतो ,तोस्थितप्रद्न्य
३चन्द्र ज्याप्रमाणे सर्वाना सारखा प्रकाश देतो ,त्याप्रमाणे जो सदा व सर्वत्र समबुद्धीने वागतो ,शुभ अथवा अशुभ गोष्टीने ज्यास हर्ष अथवाशोक होत नाही ,तो आत्मज्ञानी स्थितप्रद्न्य होय
४कासव ज्याप्रमाणे पाहिजे तेंवा आपले अवयव आत ओढून घेऊ शकते ,त्याप्रमाणे तो पंच ज्ञानेन्द्रीयाना विषयाच्या अनुभवापासून परावृत्त करू शकतो ,त्याची बुद्धी स्थिर होऊ शकते .विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्यांच्याविषयी आसक्ती निर्माण होते ,आसक्ती मुले काम ,कामामुळे क्रोध ,क्रोधापासून संमोह ,संमोहातून स्मृती भ्रंश ,स्मृतीभ्रन्शातून बुद्धिनाश होतो व तो पुरुष नाश पावतो .
लाकडावर पडणार्या लहानशा ठिणगी इतकी शक्ती या विषयामध्ये आहे ,म्हणून हे विषयच मनातून काढले म्हणजे राग ,लोभ ,मत्सर नाहीसे होतील ,चित्त प्रसन्न आणि बुद्धी स्थिर होईल .मनाची चंचलता हे सर्व दुखाचे सार आहे
या निशा सर्व भूतानां तस्यान जागर्ति संयमी ।यस्य जागृती भूतानि स निशा पश्यतो मुने ।
सर्व मनुष्ये ज्या अत्म्स्वरुपाविषयी निजलेली म्हणजे अज्ञानी असतात तेथे आत्मज्ञानी जागा असतो .प्रपंचाच्या ठिकाणी विषयसुख घेण्यास जेंव्हा मनुष्ये जागी असतात तेथेस्थितप्रद्न्य हा त्यापासून परावृत्त झाल्याने निजलेला असतो .अशा अवस्थेत स्थिर होऊन जो अंत कालपर्यंत आपली कर्तव्य निभावतो तो ब्राम्ह्पदा पर्यंत पोहोचतो
यावर अखंड सावध अर्जुनाने विचारले की असा स्थित प्रद्न्य कसा ओळखावा ?त्याला उत्तर देताना भगवंत म्हणतात
१मनात जी उत्कट विषयासक्ती असते ,ती आत्म्सुखात अडथला आणते ,असा हा काम ज्याचा पूर्ण गेला असतो ,म्हणून मन स्थिर असते तो स्थित प्रद्न्य
२दु :खे आली असता त्याचे मन उद्विग्न होत नाही,सुखाविषयी तो निरीच्ह असतो ,प्रीती भय क्रोध यांचा त्याने पूर्ण त्याग केला असतो ,तोस्थितप्रद्न्य
३चन्द्र ज्याप्रमाणे सर्वाना सारखा प्रकाश देतो ,त्याप्रमाणे जो सदा व सर्वत्र समबुद्धीने वागतो ,शुभ अथवा अशुभ गोष्टीने ज्यास हर्ष अथवाशोक होत नाही ,तो आत्मज्ञानी स्थितप्रद्न्य होय
४कासव ज्याप्रमाणे पाहिजे तेंवा आपले अवयव आत ओढून घेऊ शकते ,त्याप्रमाणे तो पंच ज्ञानेन्द्रीयाना विषयाच्या अनुभवापासून परावृत्त करू शकतो ,त्याची बुद्धी स्थिर होऊ शकते .विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्यांच्याविषयी आसक्ती निर्माण होते ,आसक्ती मुले काम ,कामामुळे क्रोध ,क्रोधापासून संमोह ,संमोहातून स्मृती भ्रंश ,स्मृतीभ्रन्शातून बुद्धिनाश होतो व तो पुरुष नाश पावतो .
लाकडावर पडणार्या लहानशा ठिणगी इतकी शक्ती या विषयामध्ये आहे ,म्हणून हे विषयच मनातून काढले म्हणजे राग ,लोभ ,मत्सर नाहीसे होतील ,चित्त प्रसन्न आणि बुद्धी स्थिर होईल .मनाची चंचलता हे सर्व दुखाचे सार आहे
या निशा सर्व भूतानां तस्यान जागर्ति संयमी ।यस्य जागृती भूतानि स निशा पश्यतो मुने ।
सर्व मनुष्ये ज्या अत्म्स्वरुपाविषयी निजलेली म्हणजे अज्ञानी असतात तेथे आत्मज्ञानी जागा असतो .प्रपंचाच्या ठिकाणी विषयसुख घेण्यास जेंव्हा मनुष्ये जागी असतात तेथेस्थितप्रद्न्य हा त्यापासून परावृत्त झाल्याने निजलेला असतो .अशा अवस्थेत स्थिर होऊन जो अंत कालपर्यंत आपली कर्तव्य निभावतो तो ब्राम्ह्पदा पर्यंत पोहोचतो
No comments:
Post a Comment