गीतेने ब्रह्म प्राप्तीचे दोन मार्ग सांगितले आहेत .१ज्ञान मार्ग २कर्म योग .हे दोन्ही मार्ग एकाच ईश्वरा पर्यंत पोहोचवतात .
तिसरा अध्याय म्हणजे गीतेवरील धर्म कीर्तनाचा प्रारंभ .मानवी जीवन ही एक अखंड कर्म यात्राच.अज्ञानी जीवांना मोक्षपद मिळण्याची योग्यता येण्यासाठी गीतेने कर्म उपासनेचा मार्ग सांगितला .कर्मयोगाचे निरुपण दुसर्या अध्यायापासून अठराव्या अध्यायापर्यंत पुन्ह पुन्ह प्रकटते .
प्रत्येक सजीवात असलेले प्रकृतिजन्य गुण त्याच्याकडून कर्म घडवत असतात. जो कर्म टाळून मनात मात्र विषयांचे चिंतन करतो त्यास दांभिक म्हणतात .पण जो मनाने इंद्रियांचे नियमन करून ,विषयासक्ती सोडून कर्म करतो तो योगी होय .तो इंद्रियांना हुकुम करत नाही ,विषय त्याला बाधत नाहीत ,तो विहित कार्याचा अनादर करत नाही ,पण कर्मापासून निर्माण होणारे विकार त्याला चिकटत नाहीत ,म्हणून तो दिसताना सामान्य माणसा प्रमाणे कर्म मग्न दिसतो .
जे जे करण्यायोग्य आणि प्रसंगानुरूप कर्म आहे ते फळाची आशा सोडून करावे ,मग ते कर्म जीवाला बांधत नाही
ब्रह्मदेवाने प्रजेला सांगितले की तुम्ही फक्त स्वधर्माचरण करा ,मग दुसरी व्रते ,नियम याची जरूर नाही ,शरीराला पिडा देणे ,तीर्थयात्रा करणे जरूर नाही ,मंत्र तंत्र ,योग याचीही गरज नाही .सर्वथा अनासक्त होऊन कर्तव्य असे कर्म केल्याने मोक्ष मिळतो .,आत्मज्ञानाची प्राप्ती होते
श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतात ,लोक त्याचे अनुकरण करतात ,म्हणून अशा मोक्ष प्राप्त पुरुषाने समाजात राहून आपली विहित कर्मे अनुसरत राहावी लागतात ,म्हणून समर्थ पुरुषाने कर्मत्याग करू नये .
अहंकारी पुरुष प्रकृतीच्या गुणाने होणार्या कर्मांचा मीच करता असे मानतो .असे म्हणतात की इंद्रिये श्रेष्ठ आहेत ,पण त्यांच्यापेक्षा मन श्रेष्ठ ,मनापेक्षा बुद्धी ,बुध्धीपेक्षा काम श्रेष्ठ ,म्हणून मन आणि बुद्धी यांना एकत्र येऊन कामाला जिंकावे लागते काम हा इंद्रिये ,मन ,बुद्धी यांच्या आश्रयाने ज्ञानाला झाकतो ,म्हणून अगोदर इंद्रिये ,मन ,बुद्धी यांचे नियमन करून काम ,क्रोध ,लोभ ,मद, मोह ,मत्सर या सहा शत्रूंचा नाश करावा ,आणि मग कर्म करावे .
तिसरा अध्याय म्हणजे गीतेवरील धर्म कीर्तनाचा प्रारंभ .मानवी जीवन ही एक अखंड कर्म यात्राच.अज्ञानी जीवांना मोक्षपद मिळण्याची योग्यता येण्यासाठी गीतेने कर्म उपासनेचा मार्ग सांगितला .कर्मयोगाचे निरुपण दुसर्या अध्यायापासून अठराव्या अध्यायापर्यंत पुन्ह पुन्ह प्रकटते .
प्रत्येक सजीवात असलेले प्रकृतिजन्य गुण त्याच्याकडून कर्म घडवत असतात. जो कर्म टाळून मनात मात्र विषयांचे चिंतन करतो त्यास दांभिक म्हणतात .पण जो मनाने इंद्रियांचे नियमन करून ,विषयासक्ती सोडून कर्म करतो तो योगी होय .तो इंद्रियांना हुकुम करत नाही ,विषय त्याला बाधत नाहीत ,तो विहित कार्याचा अनादर करत नाही ,पण कर्मापासून निर्माण होणारे विकार त्याला चिकटत नाहीत ,म्हणून तो दिसताना सामान्य माणसा प्रमाणे कर्म मग्न दिसतो .
जे जे करण्यायोग्य आणि प्रसंगानुरूप कर्म आहे ते फळाची आशा सोडून करावे ,मग ते कर्म जीवाला बांधत नाही
ब्रह्मदेवाने प्रजेला सांगितले की तुम्ही फक्त स्वधर्माचरण करा ,मग दुसरी व्रते ,नियम याची जरूर नाही ,शरीराला पिडा देणे ,तीर्थयात्रा करणे जरूर नाही ,मंत्र तंत्र ,योग याचीही गरज नाही .सर्वथा अनासक्त होऊन कर्तव्य असे कर्म केल्याने मोक्ष मिळतो .,आत्मज्ञानाची प्राप्ती होते
श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतात ,लोक त्याचे अनुकरण करतात ,म्हणून अशा मोक्ष प्राप्त पुरुषाने समाजात राहून आपली विहित कर्मे अनुसरत राहावी लागतात ,म्हणून समर्थ पुरुषाने कर्मत्याग करू नये .
अहंकारी पुरुष प्रकृतीच्या गुणाने होणार्या कर्मांचा मीच करता असे मानतो .असे म्हणतात की इंद्रिये श्रेष्ठ आहेत ,पण त्यांच्यापेक्षा मन श्रेष्ठ ,मनापेक्षा बुद्धी ,बुध्धीपेक्षा काम श्रेष्ठ ,म्हणून मन आणि बुद्धी यांना एकत्र येऊन कामाला जिंकावे लागते काम हा इंद्रिये ,मन ,बुद्धी यांच्या आश्रयाने ज्ञानाला झाकतो ,म्हणून अगोदर इंद्रिये ,मन ,बुद्धी यांचे नियमन करून काम ,क्रोध ,लोभ ,मद, मोह ,मत्सर या सहा शत्रूंचा नाश करावा ,आणि मग कर्म करावे .
Mast! Purpane Patale aani aavadale...
ReplyDelete