Monday, April 30, 2012

adbhut nate krushnarjunache

श्री ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने कृष्णार्जुन नात्यातले सारे पैलू हळुवारपणे उलगडून दाखवले आहेत .
पाचव्या अध्यायातल्या अर्जुनाची भूमिका ही एका सुखासीन पण जीज्ञासुची भूमिका आहे .त्यला सत्य जाणून घेण्याचा मार्ग पालखीसारखा आरामदायी असावा असे वाटते .
देखे रोगा ते जिणावे ।औषध तरी ध्यावे ।परी ते अतिरुच्य व्हावे ।मधुर जैसे ।३ -१९ 
 रोग बरा करणारे औषधही मधुर असावे असे त्याला वाटते .ही वचने त्याची सुखासीनता दाखवतात .म्हणून त्याच्या मागणीनुसार भगवंत कठीण ज्ञानमार्ग अथवा योगमार्गापेक्षा सोप्या कर्मयोगावर भर देतात.अर्जुनालाही कर्म मार्ग सोपा वाटतो ,पण तो समजून घेण्यास आणि आचरणातआणण्यास  वेळ लागेल असे वाटते म्हणून तो श्रीकृष्णांना हा मार्ग सविस्तर सांगण्याची विनंती करतो .
एरव्ही तरी अवधारा ।जो दाविला तुम्हीअनुसारा ।तो पव्हण्याहून पाय उतारा ।सोहपा जैसा ।
तैसा सांख्याहून प्रांजाला ।परी आम्हा सारखिया अभोळा ।इथ आहाती कांही परी कला ।तो सांहो ये वर ।
सहज पहिले तर देवा ,तुम्ही जो मार्ग दाखवला तो पोहून जाण्यापेक्षा पायउताराने जाणे सोपे ,तसा ज्ञान्मार्गाहून कर्मयोग सोपा ,आमच्या सारख्या दुर्बलांना येथे काही विलंब लागेल ,तो सहन करता येईल .
या सर्व संभाषणात भगवंताचे अर्जुनाविषयी मातेप्रमाणे प्रेम ,त्यांच्या स्नेहाचेअद्भुत पण याचे वर्णन करण्यात ज्ञानदेव रंगून जातात .
देखा कामधेनु ऐसी माये ।सदैव जया होये ।तो चंद्रुही परी लाहे ।खेळावाया ।
श्रीकृष्णांच्या अर्जुना विषयींच्या लोभास  कामधेनु ,कल्पवृक्ष अशी इच्छापूर्ती करणारी उपमा ते देतात .नंतर अशी माया लाभलेल्या अर्जुनाच्या भाग्याचे लोभस वर्णन करतात .स्वतः अर्जुन देवांना त्यांच्या या मायेबद्दल मन कवड्याचे राजे म्हणतो .
ते देखिलिया कृष्णे जान्नितले  ।मग हांसोनी पार्थाते म्हणितले।ते काई पा चित्त उवाइले ।ईये बोली तुझे ।
तंव अर्जुन म्हणे देवो ।परचित्तलक्षणांचा रावो ।भला जाणितला जी भावो ।मानसु  माझा ।५ -१६२ ,१६३ 
श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनाची स्थिती जाणली व मग हसून म्हणाले" आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का ? "यावर अर्जुन म्हणाला "देवा ,आपण मनकवद्याचे  राजे आहात .आपण माझ्या मनातला भाव चांगला ओळखलात .
यावर पुन्हा अर्जुनाचे कौतुक करताना श्रीकृष्ण म्हणतात 
अर्जुना तू परियसी ।परिसोनी अनुश्ठीशी ।तरी अम्हासीची वाणी कायसी ।सांगावयाची ।
अर्जुन ,तू चांगले ऐकतोस ,त्याप्रमाणेआचरनही करतोस ,तर आम्ही सांगावयास कमी का करू ?
यावेळी श्रीकृष्णांच्या अर्जुनाविषयी ममतेला जो पूर आला त्याचे वर्णन करण्यास शब्द अपुरे आहेत असे ते म्हणतात .
हे बहु जे जे जल्पिजेल ।तेथे कथेसी फांकू होईल ।परी ते स्नेह रुप नयेल ।बोलवरी ।५ -१७३ 
अशा रीतीने अर्जुनाच्या मोहात अडकलेल्या श्रीकृष्णांच्या दृष्टीचे वर्णन करण्यास साक्षात श्री ज्ञानेश्वरांना शब्द तोकडे पडतात -तर आपण पामरे त्याचे काय वर्णन करू शकणार ?

No comments:

Post a Comment