Tuesday, May 1, 2012

jeevanmukt purushachi lakshane

पाचव्या अध्यायातदुसर्या  भागात जीवन्मुक्त पुरुषाची लक्षणे वर्णन केली आहेत 
मनुष्य जोवर देहधारी आहे ,तोवर काम क्रोधाच्या आधीन  असतोच ,पण जीवन मुक्त त्यांना जिवंत पणीच जिंकतो .कारण त्याला आत्मानंदात अधिक गोडी वाटते .हे त्याचे मोठे लक्षण .  एकदा ही गोडी चाखल्यावर कोणी इंद्रिय विषयांकडे वळणार नाही हे सांगताना ते म्हणतात ,
सांगे कुमुद द्लाचेनी ताटे ।जो जेविला चंद्र किरण चोखते ।तो चकोर काई वाळूवनटे ।चुंबितु आहे ।
जो कमळाच्या पानावर चंद्रकिरण जेवला तो चकोर वाळू चाखून  बघेल काय ?
यानिवृत्त वृत्तीमुळे तो कर्म फलाविषयी उदास असतो ,म्हणून तो कर्म करूनही अकर्ता असतो ,प्रत्यक्ष कर्मत्याग करण्याची त्याला गरज नसते .या अकरतेपणाची तुलना  प्रत्यक्ष ईश्वराशी केली आहे .
जैसे का सर्वेश्वरू ।पाहिजे तव निर्व्यापारु ।परी तोची रची विस्तारू ।त्रिभुवनाचा ।5 -76
इथे जीवन मुक्ताच्या या अकरतेपणाची तुलना प्रत्यक्ष ईश्वराशी केली आहे .जसे ईश्वर स्वतः काही न करताही त्रिभुवनाचा व्यापार घडवून आणतो ,त्याप्रमाणे जीवन्मुक्त सर्व कर्मे करूनही अकर्ता असतो' याच जाणीवेमुळे त्याची जगाबद्दल ईश्वराप्रमाणे  समदृष्टी होते .आत्मज्ञानाच्या प्रकाशात आपण आणि हे विश्व यातील एकरूपत्व जाणवणे म्हणजेच देहात असतानाच ब्रह्मरूप होणे ,म्हणून तो जीवन्मुक्त
अशा पुरुषाचे पुढे वर्णन करताना ते म्हणतात की प्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता आनंद माणू  नये  आणि अप्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता उद्वेग  पावू नये अशी समदृष्टी ज्याची आहे तो स्थिरबुद्धी सर्वज्ञ ब्त्राम्ह्सुखाच्या ठिकाणी स्थिर होऊन अक्षय आनंदाचा अनुभव घेतो.

No comments:

Post a Comment