तिसर्या अध्यायाला प्रारंभ होतो अर्जुनाच्या प्रश्नाने
हे भगवंता ,तू मला ज्ञान निष्ठा सांगितलीस ,कर्म निष्ठाही सांगितलीस -मी नेमके काय करायच्र ?तू मला गोंधळात टाकतो आहेस .तुझ बोलणे व्यामिश्र आहे ,तेंव्हा निश्चित सांग की ज्ञान मार्गाने जाऊन संन्यास पत्करू की कर्म मार्गाने जाऊन युद्ध करू ?
त्याचवेळी ज्ञानेश्वरांचा अर्जुन मनात म्हणतो ,बरे झाले ,तूच सांगतोस कर्म नको ,संन्यास मार्ग ,ज्ञान मार्ग चांगला आहे ,आता मी नाहीच युद्ध करत .हे अनंता ,तू जर म्हणतोस की कर्म आणि करता हे उरतच नाहीत ,तर मग मला युध्धासारख्या घोर कर्मात का घालतोस ?तूच सर्व कर्मांचा निषेध करतोस ,आणि मजकडून हे हिंसात्मक कृत्यकरून घेतोस ? याचा मेल कसा घालावा ?अविवेकी अर्जुन संभ्रमामुळे भगवंताना "तुला लाज वाटत नाही काय ?"असेही म्हणतो .उपहासाने तो म्हणतो की तूच असे बोलल्यावर सारासार विचार या जगातून नाहीसा झाला असे म्हणावे ;आमचीआत्म बोधाची इच्छा तू चांगलीच पुरवलीस म्हणायची . चिडून अर्जुन भगवंतास रोग्याला विष देणाऱ्या वैद्याची उपमा देतो आणि उपहासाने सांगतो कि आधीच मर्कट ,तशात मद्य प्याले तशी तुझ्या उपदेशाने आमची स्थिती झाली आहे .यानंतर निराश अर्जुन कळवळून विचारतो कि तुझ्या उपदेशाप्रमाणे वागनार्याशी तू असे वागावे का ?तो हताश होऊन विचार करतो की आता याचेकडून ज्ञान मिळवण्याचीआशा तर संपलीच,पण माझे स्थिर असलेले मनही गडबडले .
तो पुन्हा भगवंताना शरण जाऊन विनंती करतो की मला समजेल असा हा उपदेश सोपा पण निश्चयात्मक करून सांगा .भगवंतांची स्तुती करताना तो त्यांच्यासारख्या गुरुकडून आपल्या ईछेच्या तृप्तीची हक्काने मागणी करतो .त्यांना चिंतामणीची ,कामधेनूची ,अमृताच्या समुद्राची उपमा देतो ,लहान मुलाने वेळीअवेळी आईकडे स्तनपान मागावे त्याप्रमाणे मी तुम्हाला मागत आहे असे म्हणून त्यांच्या ममतेला साद घालतो
या अर्जुनाच्या भाव भावनाच्या खेळणे श्रीकृष्ण चकित झाले .त्यांनी त्यास सांगितले कि कर्त्याच्या योग्यतेवर कोणता मार्ग हे अवलंबून आहे ,म्हणून अर्जुना तुझ्यासाठी निष्काम कर्मयोगच योग्य आहे अशा रितीने भगवंतानी अर्जुनाला भ्रमातून हळूहळू बाहेर काढून त्याचे मन निष्काम कर्मयोगाचे ठिकाणी स्थिर केले .
हे भगवंता ,तू मला ज्ञान निष्ठा सांगितलीस ,कर्म निष्ठाही सांगितलीस -मी नेमके काय करायच्र ?तू मला गोंधळात टाकतो आहेस .तुझ बोलणे व्यामिश्र आहे ,तेंव्हा निश्चित सांग की ज्ञान मार्गाने जाऊन संन्यास पत्करू की कर्म मार्गाने जाऊन युद्ध करू ?
त्याचवेळी ज्ञानेश्वरांचा अर्जुन मनात म्हणतो ,बरे झाले ,तूच सांगतोस कर्म नको ,संन्यास मार्ग ,ज्ञान मार्ग चांगला आहे ,आता मी नाहीच युद्ध करत .हे अनंता ,तू जर म्हणतोस की कर्म आणि करता हे उरतच नाहीत ,तर मग मला युध्धासारख्या घोर कर्मात का घालतोस ?तूच सर्व कर्मांचा निषेध करतोस ,आणि मजकडून हे हिंसात्मक कृत्यकरून घेतोस ? याचा मेल कसा घालावा ?अविवेकी अर्जुन संभ्रमामुळे भगवंताना "तुला लाज वाटत नाही काय ?"असेही म्हणतो .उपहासाने तो म्हणतो की तूच असे बोलल्यावर सारासार विचार या जगातून नाहीसा झाला असे म्हणावे ;आमचीआत्म बोधाची इच्छा तू चांगलीच पुरवलीस म्हणायची . चिडून अर्जुन भगवंतास रोग्याला विष देणाऱ्या वैद्याची उपमा देतो आणि उपहासाने सांगतो कि आधीच मर्कट ,तशात मद्य प्याले तशी तुझ्या उपदेशाने आमची स्थिती झाली आहे .यानंतर निराश अर्जुन कळवळून विचारतो कि तुझ्या उपदेशाप्रमाणे वागनार्याशी तू असे वागावे का ?तो हताश होऊन विचार करतो की आता याचेकडून ज्ञान मिळवण्याचीआशा तर संपलीच,पण माझे स्थिर असलेले मनही गडबडले .
तो पुन्हा भगवंताना शरण जाऊन विनंती करतो की मला समजेल असा हा उपदेश सोपा पण निश्चयात्मक करून सांगा .भगवंतांची स्तुती करताना तो त्यांच्यासारख्या गुरुकडून आपल्या ईछेच्या तृप्तीची हक्काने मागणी करतो .त्यांना चिंतामणीची ,कामधेनूची ,अमृताच्या समुद्राची उपमा देतो ,लहान मुलाने वेळीअवेळी आईकडे स्तनपान मागावे त्याप्रमाणे मी तुम्हाला मागत आहे असे म्हणून त्यांच्या ममतेला साद घालतो
या अर्जुनाच्या भाव भावनाच्या खेळणे श्रीकृष्ण चकित झाले .त्यांनी त्यास सांगितले कि कर्त्याच्या योग्यतेवर कोणता मार्ग हे अवलंबून आहे ,म्हणून अर्जुना तुझ्यासाठी निष्काम कर्मयोगच योग्य आहे अशा रितीने भगवंतानी अर्जुनाला भ्रमातून हळूहळू बाहेर काढून त्याचे मन निष्काम कर्मयोगाचे ठिकाणी स्थिर केले .
No comments:
Post a Comment