चौथ्या अध्यायाच्या शेवटी उपसंहार रूप गीतेत नसलेले ,पणज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने प्रकट झालेले जे श्लोक आहेत ,ते ज्ञानेश्वरीची थोरवी वर्णन करतात .
तो शान्तूची अभिनवेल ।ते परियसा मरहात्ते बोल ।
जे समुद्राहून खोल ।अर्थ भरीत ।२१४
तोशांतरसच ज्यात अपूर्वतेने प्रकटेल ,जे अर्थपूर्ण व समुद्रापेक्षा गंभीर आहेत ,ते मराठी बोल ऐका .
ज्ञानेश्वरीचे वर्णन ते भावाची संपत्ती ,रसाची उन्नत्ती असे करतात .पण सारे आठ रस यात प्रकट झाले असले तरी शांत रसच विशेष अपूर्वतेने प्रकटेल असे ते म्हणतात .शांत रस हा या जगी सज्जनांच्या बुद्धीचे विश्रामस्थान आहे ,त्याच्या चांगलेपणावरून बाकीचे रस ओवाळून टाकावेत.याचे मराठी बोल हे अर्थाने समुद्राहून गंभीर आहेत अशी ते सूचना देतात .परत एकदा सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे या शब्दांच्या अर्थाची व्याप्ती अमर्याद आहे असेही वर्णन करतात .या शब्दांचे सामर्थ्य वर्णन करताना ते त्यांना कल्पवृक्षाची उपमा देतात ,इच्छा करणारांचे सारे संकल्प तो पुरे करील असे सांगतात .
जेथ साहित्य आणि शांती ।हे रेखा दिसे बोलती ।
जेथ साहित्य आणि शांती ।हे रेखा दिसे बोलती ।
एख्याद्या लावण्यगुणवतीने पतिव्रता असावे ,याप्रमाणे या शांत रसाला अलंकारांची जोड मिळाली आहे हे सांगताना ते "रेखा "हा शब्द "शब्दकला "या अर्थी वापरतात .मराठे या शब्दाचा अर्थ मराठी भाषा ,तसेच कानडे विरुध्द मराठे म्हणजे "सुबोध "या अर्थी पण वापरतात
आपली हि कथा अवधान पूर्वक निके (पूर्ण )चित्त देवून ऐकावी असे ते श्रोत्यांना आवाहन करतात ,पण ते करताना यात साखरेची गोडी ,मलय पर्वतावरील सुगंध ,सुमधुर स्वर ,आणि वार्याचा चा शरीर शांत करणारा स्पर्श असे अनुभूतीच्या सर्व मार्गांनी हि कथा तुम्हाला सुखवील असे आश्वासन देतात .
या कथेच्या ऐकण्याने कानाचे पारणे तरफिटेल ,पण संसार दुखाचे समूळ उच्चाटन होईल ,मनाला न मारता ,इंद्रियांना दुख न देता येथे नुसते ऐकण्याने मोक्ष मिळेल म्हणून प्रसन्न मानाने हा गीतार्थ ऐका असे ते आवाहन करतात .
अतींद्रिय परी भोगवीन ।इंद्रिय करवी ।
या त्यांच्या प्रतिज्ञेची पुरती करताना ते शब्द ,रूप ,रस ,गंध ,स्पर्श या इंद्रिय संवेदनाचा याश्रवणसुखाशी संबंध जोडतात .
आता शांतरसाचे भरीते ।सांडीत आहे पात्राते ।ते बोलणे बोलापरीते ।बोलविले ।
शांत रसाच्या नदीचा काठ ओलांडून पलीकडे वाहतो आहे ,अशा वेळी बोलणे हे अशांत आहे ,पण स्थितप्रज्ञाचे वर्णन करताना जे बोलू नये ते मी बोललो असे ते म्हणतात .
आता शांतरसाचे भरीते ।सांडीत आहे पात्राते ।ते बोलणे बोलापरीते ।बोलविले ।
शांत रसाच्या नदीचा काठ ओलांडून पलीकडे वाहतो आहे ,अशा वेळी बोलणे हे अशांत आहे ,पण स्थितप्रज्ञाचे वर्णन करताना जे बोलू नये ते मी बोललो असे ते म्हणतात .
शांत हा ज्ञानेश्वरीतील प्रधान रस आहे .व आत्मज्ञान हा शांत रसाचा स्थायी भाव आहे .ज्ञानेश्वरी हे आत्म ज्ञानाचेच विवेचन असल्याने शांतरस हा या ग्रंथाचा प्रमुख रस ठरतो .एकूणच या ग्रंथात साहित्य म्हणजे नादमधुर शब्द संपत्ती व शांतरस यांचा ज्ञानेन्द्रीयाना सुखावणारा मधुर मिलाप आहे .
पूर्ण ग्रंथात ज्यांना आत्म बोधाचे ज्ञान झाले आहे अशा स्थितप्रद्न्य ,ज्ञानी ,,योगी भक्त ,गुणातीत ,संत यांची वर्णने येतात ती शांत रसाचा पूर्ण अविष्कार आहेत .ही वर्णने वाचताना आपल्याला होणारी आत्म तत्वाची आनंदमय जाणीव हाच शांत रसाचा अनुभव होय .
मोह्ग्रस्तता ते मोहमुक्तता हा अर्जुनाचा प्रवास या शान्तिकथेचा गाभा आहे .याचे स्वरूप धर्म कीर्तनाचे आहे ,पण काव्याच्या अंगाने ही शांतीकथा आहे .काव्य आणि तत्वज्ञान यांचे एकात्म असे हे रूप आहे
मोह्ग्रस्तता ते मोहमुक्तता हा अर्जुनाचा प्रवास या शान्तिकथेचा गाभा आहे .याचे स्वरूप धर्म कीर्तनाचे आहे ,पण काव्याच्या अंगाने ही शांतीकथा आहे .काव्य आणि तत्वज्ञान यांचे एकात्म असे हे रूप आहे
No comments:
Post a Comment