वेद श्रुतींनी मोक्ष प्राप्तीसाठी कर्म ,उपासना ,ज्ञान हि साधने अधिकारानुसार सांगितली आहेत ,बहुतेक लोक हे कर्माधिकारी असतात .हे कर्म मोक्ष दायी होण्यासाठी ते ईश्वर समर्पण बुद्धीने करावे लागते हि गोष्ट भगवंतानी चौथ्या अध्यायात अधिक स्पष्ट करून सांगितली आहे .
गीतेतील कर्म हे साध्य नाही तर ते ईश्वराची कर्म कुसुमानि पूजा करून त्यासप्रसन्न करून घेण्याचेसाधन आहे .गीतेने जी साधना सांगितली तिचा कर्मयोग हा पाया तर ज्ञानयोग हे शिखर आहे .कर्मयोग हा अंतकरणशुद्धी द्वारा ज्ञानयोगास साधनभूत आहे ,आणि ज्ञानयोग मोक्ष दायक आहे .पूर्वी जनक आदि राजापर्यंत ज्ञात असलेले हे ज्ञान काळाच्या ओघात नाहीसे झाले होते ,ते आता मी तू माझा सखा भक्त असल्यामुळे तुला सांगत आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात .
यथार्थपणे कर्मशास्त्र समजण्यासाठी कर्म ,अकर्म आणि विकर्म हे तीन प्रकार समजले पाहिजेत कर्म अकर्माचा विचार करताना ज्ञान्यानाही भ्रम होतो कारण कर्माचे योग्य असणे हे कर्त्याचा वर्ण ,आश्रम ,परिस्थिती ,काळवेळ यावर अवलंबून आहे .
कर्म याचा अर्थ ज्ञानेश्वरांनी सामान्य कर्म -सृष्टी उत्पादक व्यापार असा केला आहे .
विकर्म याचा अर्थ वर्ण आश्रम यानुसार कर्तव्य असे कर्म .
अकर्म याचा ज्ञानेश्वरांनी निशिध्ह कर्म असा अर्थ केला आहे .शास्त्राने जे कधीही करू नये असे सांगितले आहे ते ,ब्रम्हहत्या ,सुरापान ,चोरी ,परदारागमन इत्यादी .
त्याज्य कर्म कोणते हे कळण्या करता आधी विहित कर्म समजून घ्यावे लागते .
तरी कर्म म्हणजे स्वभावे ।जेणे विश्वाकारु संभवे ।ते सम्यक आधी जाणावे लागे येथ ।८५
येथे कर्माचा विचार अधिक व्यापक केला आहे .या सर्व विश्वाला आदिकारण जो आदिसंकल्प त्यास इथे कर्म म्हटले आहे .कर्म म्हणजे ईश्वराचे मायारूप आद्यस्पंदन .
मग वर्णाश्रमासि उचित ।जे विशेष विहित कर्म ।तेंही ओळखावे निश्चित ।उपयोगेसी ।९०
वर्ण आणि आश्रम यांना अनुसरून योग्य म्हणून शास्त्राने सांगितलेले विशिष्ट कर्म -विहित कर्म म्हणजेच विकर्म होय.हे कर्ममाणसाचे ऐहिक व पारलौकिक कल्याण करून देणारे आहे ,म्हणून ते विधीपूर्वक ,सावधपणे आचरले पाहिजे असे ते सांगतात
इथआणिक हि एक अर्जुना ।हे कर्म अकर्म विवंचना ।आपुलिया चाडे सज्ञाना ।योग्य नोहे ।८४
भगवान म्हणतात की ही कर्म व अकर्माची निवड ज्ञानी माणसालाही स्वताच्या इच्छेने करता येत नाही -याचा निर्णय शास्त्रोक्त व सारासार विचाराने घ्यावा .
कर्मे करत असतानाही कर्तृत्वाचा अहंकार आणि फळाची आसक्ती सोडली तर ती कर्मे बाधक होत नाहीत -म्हणून अशा भावनेने कर्म करणे ही खरी युक्ती होय .गीतेतला निष्काम कर्मयोग तो हाच .
याचे उदाहरण देताना भगवंत म्हणतात :सूर्य उदय व अस्त पावतो ,यावरून तो चालतो असे भासते ,वास्तविक तो चालत नाही ,याप्रमाणे जो कर्माचरण करतानाही अलिप्त राहतो तो नैष्कर्म्य करणे जाणतो .नावेत बसून जाणार्या माणसाला किनार्यावरील झाडे चालत आहेत असे दिसते ,पण वास्तविक नाव चालत असून झाडे स्थिर आहेत हे जो जाणतो , त्याप्रमाणे कर्मेद्रीयाद्वारा कर्म करताना ज्याचे मन आणि बुद्धी भगवंत चरणी स्थिर आहे तो निष्काम योगी .कर्म सन्यास याचा अर्थ सर्व कर्मे टाकून देणे असा नसून फलेच्छा रहित बुद्धीने कर्म हे ब्रम्हच आहे हे जाणून बाह्यतः कर्म करूनही अंतकरणी निष्काम राहणे असा आहे या रीतीने जो आपली कर्तव्ये मात्र तत्परतेने करतो तो ज्ञानी ,मनुष्य रूपातील साक्षात ब्रह्मच होय
अनिष्ट ,इष्ट व मिश्र अशी कर्माची तीन फळे आहेत .जड सृष्टी व पशुपक्षी योनी हे अनिष्ट फल होय ,मनुष्य जन्म हे मिश्र फल ,तर स्वर्गात देवांचे जन्म लाभणे हे इष्ट फल ,अशा तर्हेने त्रिविध जग हे कर्माचे फल आहे आणि ब्रम्हाशी एकरूप होणे हीच मुक्ती होय .
मागील मुमुक्षु जे होते ।तीही ऐशियाची जाणून माते ।कर्मे केली समस्ते ।धनुर्धरा ।
परी ते बीजे जैसी दग्धली ।नुगवतीच पेरिली ।तैशी कर्मेच परी त्या झली ।मोक्ष हेतू ।८२ ,८३
पूर्वी जे ज्ञानाचे अधिकारी मोक्ष मार्गी होते त्यांनी माझे मुल रूप जणून सर्व कर्मे केली ,परंतु भाजलेले बी ज्याप्रमाणे उगवत नाही ,त्याप्रमाणे त्यांच्या निष्काम रीतीने त्यांना त्या कर्माचे फल न लागता मोक्ष प्राप्त झाला.
कर्मास कारण देह ,पाच ज्ञानेंद्रिये. मन .बुद्धी ,पंच कर्मेंद्रिये हे आहेत .आत्मरूप मी हा कर्मास कारण नाही .म्हणून शरीर माध्यमातून क्रिया घडत असल्या तरी आत्मा निर्लेप असतो ,हे ज्ञान प्रत्यक्ष कृतीत आणणे हा खरा निष्काम कर्मयोग .
गीतेतील कर्म हे साध्य नाही तर ते ईश्वराची कर्म कुसुमानि पूजा करून त्यासप्रसन्न करून घेण्याचेसाधन आहे .गीतेने जी साधना सांगितली तिचा कर्मयोग हा पाया तर ज्ञानयोग हे शिखर आहे .कर्मयोग हा अंतकरणशुद्धी द्वारा ज्ञानयोगास साधनभूत आहे ,आणि ज्ञानयोग मोक्ष दायक आहे .पूर्वी जनक आदि राजापर्यंत ज्ञात असलेले हे ज्ञान काळाच्या ओघात नाहीसे झाले होते ,ते आता मी तू माझा सखा भक्त असल्यामुळे तुला सांगत आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात .
यथार्थपणे कर्मशास्त्र समजण्यासाठी कर्म ,अकर्म आणि विकर्म हे तीन प्रकार समजले पाहिजेत कर्म अकर्माचा विचार करताना ज्ञान्यानाही भ्रम होतो कारण कर्माचे योग्य असणे हे कर्त्याचा वर्ण ,आश्रम ,परिस्थिती ,काळवेळ यावर अवलंबून आहे .
कर्म याचा अर्थ ज्ञानेश्वरांनी सामान्य कर्म -सृष्टी उत्पादक व्यापार असा केला आहे .
विकर्म याचा अर्थ वर्ण आश्रम यानुसार कर्तव्य असे कर्म .
अकर्म याचा ज्ञानेश्वरांनी निशिध्ह कर्म असा अर्थ केला आहे .शास्त्राने जे कधीही करू नये असे सांगितले आहे ते ,ब्रम्हहत्या ,सुरापान ,चोरी ,परदारागमन इत्यादी .
त्याज्य कर्म कोणते हे कळण्या करता आधी विहित कर्म समजून घ्यावे लागते .
तरी कर्म म्हणजे स्वभावे ।जेणे विश्वाकारु संभवे ।ते सम्यक आधी जाणावे लागे येथ ।८५
येथे कर्माचा विचार अधिक व्यापक केला आहे .या सर्व विश्वाला आदिकारण जो आदिसंकल्प त्यास इथे कर्म म्हटले आहे .कर्म म्हणजे ईश्वराचे मायारूप आद्यस्पंदन .
मग वर्णाश्रमासि उचित ।जे विशेष विहित कर्म ।तेंही ओळखावे निश्चित ।उपयोगेसी ।९०
वर्ण आणि आश्रम यांना अनुसरून योग्य म्हणून शास्त्राने सांगितलेले विशिष्ट कर्म -विहित कर्म म्हणजेच विकर्म होय.हे कर्ममाणसाचे ऐहिक व पारलौकिक कल्याण करून देणारे आहे ,म्हणून ते विधीपूर्वक ,सावधपणे आचरले पाहिजे असे ते सांगतात
इथआणिक हि एक अर्जुना ।हे कर्म अकर्म विवंचना ।आपुलिया चाडे सज्ञाना ।योग्य नोहे ।८४
भगवान म्हणतात की ही कर्म व अकर्माची निवड ज्ञानी माणसालाही स्वताच्या इच्छेने करता येत नाही -याचा निर्णय शास्त्रोक्त व सारासार विचाराने घ्यावा .
कर्मे करत असतानाही कर्तृत्वाचा अहंकार आणि फळाची आसक्ती सोडली तर ती कर्मे बाधक होत नाहीत -म्हणून अशा भावनेने कर्म करणे ही खरी युक्ती होय .गीतेतला निष्काम कर्मयोग तो हाच .
नैष्कर्म्य
मनाने इंद्रियांचे नियमन करून फलाशा न ठेवता केवळ कर्मे इंद्रीयाद्वारा करणे म्हणजे नैष्कर्म्य होय .याचे उदाहरण देताना भगवंत म्हणतात :सूर्य उदय व अस्त पावतो ,यावरून तो चालतो असे भासते ,वास्तविक तो चालत नाही ,याप्रमाणे जो कर्माचरण करतानाही अलिप्त राहतो तो नैष्कर्म्य करणे जाणतो .नावेत बसून जाणार्या माणसाला किनार्यावरील झाडे चालत आहेत असे दिसते ,पण वास्तविक नाव चालत असून झाडे स्थिर आहेत हे जो जाणतो , त्याप्रमाणे कर्मेद्रीयाद्वारा कर्म करताना ज्याचे मन आणि बुद्धी भगवंत चरणी स्थिर आहे तो निष्काम योगी .कर्म सन्यास याचा अर्थ सर्व कर्मे टाकून देणे असा नसून फलेच्छा रहित बुद्धीने कर्म हे ब्रम्हच आहे हे जाणून बाह्यतः कर्म करूनही अंतकरणी निष्काम राहणे असा आहे या रीतीने जो आपली कर्तव्ये मात्र तत्परतेने करतो तो ज्ञानी ,मनुष्य रूपातील साक्षात ब्रह्मच होय
अनिष्ट ,इष्ट व मिश्र अशी कर्माची तीन फळे आहेत .जड सृष्टी व पशुपक्षी योनी हे अनिष्ट फल होय ,मनुष्य जन्म हे मिश्र फल ,तर स्वर्गात देवांचे जन्म लाभणे हे इष्ट फल ,अशा तर्हेने त्रिविध जग हे कर्माचे फल आहे आणि ब्रम्हाशी एकरूप होणे हीच मुक्ती होय .
मागील मुमुक्षु जे होते ।तीही ऐशियाची जाणून माते ।कर्मे केली समस्ते ।धनुर्धरा ।
परी ते बीजे जैसी दग्धली ।नुगवतीच पेरिली ।तैशी कर्मेच परी त्या झली ।मोक्ष हेतू ।८२ ,८३
पूर्वी जे ज्ञानाचे अधिकारी मोक्ष मार्गी होते त्यांनी माझे मुल रूप जणून सर्व कर्मे केली ,परंतु भाजलेले बी ज्याप्रमाणे उगवत नाही ,त्याप्रमाणे त्यांच्या निष्काम रीतीने त्यांना त्या कर्माचे फल न लागता मोक्ष प्राप्त झाला.
कर्मास कारण देह ,पाच ज्ञानेंद्रिये. मन .बुद्धी ,पंच कर्मेंद्रिये हे आहेत .आत्मरूप मी हा कर्मास कारण नाही .म्हणून शरीर माध्यमातून क्रिया घडत असल्या तरी आत्मा निर्लेप असतो ,हे ज्ञान प्रत्यक्ष कृतीत आणणे हा खरा निष्काम कर्मयोग .
No comments:
Post a Comment