दहाव्या अध्यायाच्या प्रारंभी आढावा घेताना श्री ज्ञानदेव म्हणतात -पंचमी गव्हारले ।योग तत्व ।म्हणजे पाचव्या अध्यायात योगाचे गूढ तत्व स्पष्ट केले आहे ,म्हणून या अध्यायास योग गर्भ हे नाव दिले आहे .
पाचव्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुन विचारतो कि सन्यास आणि योग यातला श्रेयस्कर मार्ग कोणता हे सांगा .
उत्तर देताना भगवंत पहिला सिद्धांत सांगतात कि ज्ञान म्हणजेच संन्यास आणि योग हे अंतिमतः एकच आहेत .कारण दोन्ही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत .पण ज्याप्रमाणे पाण्यातून तरून जाण्यास नाव हे सुलभ साधन आहे ,त्याप्रमाणे सर्वांसाठी निष्काम कर्मयोग हा भवसागर तरून जाण्यास सोपे साधन आहे .जो कोणाचा द्वेष करत नाही व कशाची इच्छा धरत नाही असा कर्मयोगी हा संन्यासीच जाणावा .त्याच्या अन्तः करणामध्ये मी व माझे याचे स्मरणच राहिले नाही तो संन्यासीच होय .अशा स्थितीत घर ,संसार वगैरेचा त्याग करण्याची जरूर राहत नाही ,कारण या सगळ्याकडे ओढले जाणारे त्याचे मनच निःसंग झाले असते .विस्तव विझून गेल्यावर ज्याप्रमाणे राखेचा गोळा कापसात गुंडाळून ठेवला तरी कापूस पेटत नाही ,त्याप्रमाणे ज्याचे मन अंतरात्म्यापाशी स्थिर झाले त्याला प्रपंच गुंतवू शकत नाही .
जो स्वतःला ओळखतो तो स्वाभाविकच "मी देह नव्हे ,तर सतत स्फुरण पावणारे आत्म तत्व म्हणजे मी "हे जाणतो ,त्यामुळे त्याचे मनही शरीर ,मन, बुद्धी यांच्यामुळे घडणाऱ्या संकल्पापासून मुक्त होते .आणि तो जीव स्वतःच ब्रह्म रूप होतो .अशावेळी हा निष्काम कर्मयोगी हा कर्म करूनही कर्माचा त्याग करणारा संन्यासी असल्याप्रमाणे होतो ..म्हणून ज्ञानमार्गाने कर्म त्याग केलेला संन्यासी व निष्काम कर्मयोगी हे एकच आहेत .
तयासींची जगी पाहले ।आपणपे तेणे देखिले ।ज्या सांख्य योग जाणवले ।भेदेवीन ।३१ अ ५
ज्याला सांख्य आणि कर्मयोग यात भेद नाही हे जाणवले ,त्यालाच जगात ज्ञान दिसले ,त्यानेच आत्म रूप पहिले .
दिव्याच्या उजेडात घरातील सर्व कर्मे होतात ,पण दिवा स्वतः काही करत नाही ,त्याप्रमाणे ज्ञानाच्या उजेडात देहातील सर्व कर्मे होतात ,पण कर्मफल त्या कर्मयोग्यास बाधत नाही .कमळाचे पान पाण्यात असून पाण्याने लिप्त होत नाही ,त्याप्रमाणे तो संसारात असून कर्माच्या बंधनात सापडत नाही ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाची हालचाल असते .त्याप्रमाणे योगी केवळ शरीराने कर्म करतात ,त्यामागे हेतू व फळाची अपेक्षा नसते .कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेले कर्म हे कर्मसंन्यासाच्या सारखेच होय .जे बुद्धीला प्राप्त करण्यास कठीण आणि मनाला आकलन करण्यास अवघड असे हे ज्ञान भगवंतानी अर्जुनास सांगितले .
No comments:
Post a Comment