Thursday, May 3, 2012

dhyanmarg

सहाव्या अध्यायात परमेश्वर प्राप्तीचा ध्यानमार्ग सांगितला आहे ,
हा मार्ग बुद्धीला आकलन करण्यास कठीण आहे ,तो शब्दात व्यक्त करणेही अवघड आहे ,पण सद्गुरूचे कृपेने हे अतींद्रिय ज्ञान श्री ज्ञानेश्वरांना प्राप्त झाले ,ते मी श्रोत्यांना इंद्रीयाकरवी भोगवीन ,अरुपाचे रूप दाखवीन अशी ते प्रतिज्ञा करतात .
तेणे कारणे मी बोलेन ।बोली अरुपाचे रूप दावीन ।अतींद्रिय परी भोगवीन ।इंद्रीयाकरवी ।6 -36
सर्व प्रथम योगमार्गाने जाताना मनातील संकल्प सुटला पाहिजे ,त्याची इंद्रिये काम करीत असली तरी मनात फलाशा नसावी ,तरच तो योगी होऊ शकतो हे ते स्पष्ट करतात .या ध्यानमार्गात प्रत्यक्ष आदिनाथ महेश हि वाटसरू बनला आहे , व तो योगमार्गीना मार्गदर्शन करतो असे ज्ञान देव सूचित करतात -पुढे ते सांगतात कि या मार्गावर तहान भुकेची शुध्द रहात नाही ,रात्र कि दिवस याचे भान राहत नाही ,जेथे पावूल  पडेल तेथे मोक्षाची खाणच सापडते ,स्वर्ग सुखाचा लाभ होतो ,असे या मार्गाचे महत्व ते सांगतात .या मार्गाने जात असताना ज्या गावास जायचे ते गावच आपण होतो  हा या प्रवासाचा विशेष ते सांगतात .
येणे मार्गे ज्या ठाया जाएजे ।तों गांवो आपणची होईजे ।हे सांगो काय सहजे ।जाणसी तू ।6 -160 
ही योगसाधना पूर्णत्वास पोहोचली असता प्राणरूप शक्ती ही जेंव्हा  ब्रह्मरूप प्राप्त करून घेते त्याला सिद्ध योग हे नाव दिले आहे .हा ऐक्यानुभव म्हणजे योगद्रुमाचे फल ,महातेजाचे तेज ,तुर्येचे तारुण्य अशा विविध उपमांनी त्याचे वर्णन करून हा शब्दातीत अनुभव ज्ञानदेवांनी शब्द गोचर केला आहे .

No comments:

Post a Comment