सार्या ब्रह्मांडाला आधारभूत असलेली शक्ती मानव शरीरातही आहे .ती आत्म्याची शक्ती ,प्राणशक्ती .श्री ज्ञानेश्वर तिचे वर्णन करताना म्हणतात
ते कुंडलिनी जगदंबा ।जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा ।
जिया विश्व्बीजाचीया कोम्भा। साउली केली ।6 -272
जे शून्यलिंगाची पिंडी ।जे परमात्मया शिवाची करंडी ।
जे प्राणाची उघडी ।जन्मभूमी ।6 -273
याभगवतशक्तीचे जे साडेतीन वेढे आहेत ,ते म्हणजे ओंकाराच्या 'अ ''उ 'म 'आणि अर्धमात्रा अशा साडेतीन मात्रांची मुल स्थिती होय . ; मी; या वृत्तीरुपाने ती जिवामध्ये अस्तित्व दर्शवते .अज्ञानाने ती आपले हे रूप विसरते आणि सत्व रज तम या त्रिगुणात्मक होते .सत्वगुणाने ती प्रकाशरूप असते ,रजोगुणाने क्रियारूप होते ,तर तमोगुणाने जड पदार्थ रूप होते ,म्हणजेच ती निजलेली असते .म्हणजे आपण म्हणजे चैतन्य हे विसरलेली असते ,ती खाली बघत असते म्हणजे परमात्म्याला विसरून ती कार्यरूप सृष्टीकडे पाहत असते .अधोमुख असते .या स्थितीत ती जगाचा विचार करते .ती जेंव्हा जागी होते ,ऊर्ध्व मुख होते तेंव्हा ती जगत कल्पनेचा नाश करून ब्रह्ममय होते .तिचे रूप तेजोमय होते .ही प्राणशक्ती जेंव्हा ब्रम्ह रूपाशी ऐक्य स्थितीत येते तेंव्हा ओम्कारही लुप्त होतो .आकार म्हणजे मन .मकार म्हणजे चित्त ,उकार म्हणजे बुद्धी ,अर्धमात्रा म्हणजे अहंकार ,हे सर्व नाहीसे होतात ,ब्रह्म रूपाशी ऐक्य पावतात ,हे योगमार्गाचे उद्दिष्ट आहे .
या कुंडलिनीची जागृती योगाभ्यासाने ,वैराग्याने ,ज्ञानाने ,भक्तीने ,प्राणायामाने अथवा सद्गुरूच्या कृपेने होते .हिचे चित्र रूप वर्णन करताना श्री ज्ञानेश्वर म्हणतात
नागिणीची पिले ।कुंकुमे नाहले ।वळण घेऊन आले ।सेजे जैसे ।6 -222
तेसी ते कुंडलिनी ।मोठ्की औत्त वलनी।अधोमुख सर्पिणी ।निदेली असे ।6 -233
No comments:
Post a Comment