कुंडलिनी योग गीतेत नसलेले पूर्णपणे ज्ञानेश्वरांनी घेतलेले प्रकरण आहे .कारण स्वतः ज्ञानेश्वर नाथपंथीय आहेत आणि हा कुंडलिनी योग त्यांच्या पंथातून आलेला आहे .ते म्हणतात की तुझा देहच ब्रम्हरूप कसा होईल याचा मार्ग कुंडलिनी योग आहे .हा योग करायचा असेल तर कुठे जावे ?याचे उत्तर अतिशय चित्रमय भाषेत त्यांनी दिले आहे.
शुचौ देशे प्रतिष्ठाप्य ।अशाठिकाणी जा जे स्थळ निर्मल ,पवित्र असेल .जिथे नदी वाहत असेल .बाराही महिने स्वच्ह पाणी मिळेल .वनश्री सुंदर असेल ,फुल फुललेली असतील ,पण भुंग्यांचा आवाज येणार नाही .एखादा दुसरा पोपट किंवा मयूर आवाज करून गेले तर चालेल ,पण त्यांचा कलकलाट नको .माणूस तर नकोच .एखादे मंदिर असावे शंकराचे ,अशा ठिकाणी तू बैस .
शुचौ देशे प्रतिष्ठाप्य ।अशाठिकाणी जा जे स्थळ निर्मल ,पवित्र असेल .जिथे नदी वाहत असेल .बाराही महिने स्वच्ह पाणी मिळेल .वनश्री सुंदर असेल ,फुल फुललेली असतील ,पण भुंग्यांचा आवाज येणार नाही .एखादा दुसरा पोपट किंवा मयूर आवाज करून गेले तर चालेल ,पण त्यांचा कलकलाट नको .माणूस तर नकोच .एखादे मंदिर असावे शंकराचे ,अशा ठिकाणी तू बैस .
त्या स्थानी पूर्वी काही साधकांनी तपश्चर्या केली असावी .तेथे अमृतासारखी फळे नेहमी देणारी झाडे असावीत ,उन्हे सौम्य असावीत ,वर मंदमंद वाहत असावा ,श्वापदे असू नयेत ,असा ठिकाणी मन स्थिर राहते कि नाही ते पाहावे .ते स्थानच आपले भटकणारे मन स्थिर करणारे ,वैराग्याला जागे करणारे असावे .
या ठिकाणी आसन लावावे .टोके असलेले दर्भ तळाशी घालावेत .दर्भ कोवळे असावेत .त्यावर शुध्द कृष्णाजिन असावे ,वर धुतलेल्या वस्त्राची घडी घालावी .आसन फार उंच असू नये ,फार सखोल असू नये .अशा आसनावर बसून प्रथम सद्गुरूंचे स्मरण करावे .मग मन एकाग्र करून साधना आरंभ करावी .
या ठिकाणी आसन लावावे .टोके असलेले दर्भ तळाशी घालावेत .दर्भ कोवळे असावेत .त्यावर शुध्द कृष्णाजिन असावे ,वर धुतलेल्या वस्त्राची घडी घालावी .आसन फार उंच असू नये ,फार सखोल असू नये .अशा आसनावर बसून प्रथम सद्गुरूंचे स्मरण करावे .मग मन एकाग्र करून साधना आरंभ करावी .
No comments:
Post a Comment