Monday, May 21, 2012

yogsadhana

योगसाधनेसाठी मागे सांगितल्याप्रमाणे स्थळ आणि स्थानाची निवड करून आसनावर बसून प्रथम सद्गुरूंचे स्मरण करावे .त्यामुळे आपला अहंकार मावळतो .मग मन एकाग्र करावे .
विषयांचा विसरू पडे ।इंद्रियांची कसमस मोडे ।मनाची घडी घडे ।हृदयामाजी ।6 -188
अशी मनाची स्थिरता साधावी .
वज्रासनात बसावे .प्रथम मुल बंध साधावा ,म्हणजे जे आधारचक्र गुदाच्या  समोरअसते  तेथे ताचेने  दाब द्यावा ,त्याचवेळी टाचेवर आपले शरीर ताठ तोलून धरावे म्हणजे खालचा मार्ग बंद होऊन अपानवायू कोंडला जातो .
मान आणि मस्तक हे ताठ, स्वतःच्या नाकाच्या टोकाकडे दृष्टी लावलेली ,मग दृष्टी आत वळून शीर खाली केल्याने गळ्याखाली हनुवटी अडकून बसते आणिविशुध्द चक्रावर जो बंध पडतो त्यास जालंदरबंध असे म्हणतात .पोट आत ओढल्याने मणिपूर आणि स्वाभिमान चक्रास जो बंध पडतो त्यास वोधीयाना बंध म्हणतात .
अंतकरण शांत असलेला ,भितीरहित ,ब्रह्मचर्या व्रताचे पालन करणारा ,मनाचे संयमन केलेला, माझ्या ठिकाणी  चित्त ठेवणारा असे होऊन सर्व बंध लावून आसनावर बसावे .शांत शरीर आणि मनास भूक आणि झोप यांचीदेखील आठवण रहात नाही .मुलबंधाने  कोंडलेला  अपानवायू गुरगुर करून मणिपूरचक्राला धक्के देतो ,कफ .पित्त ,कोठ्यातील घाण,बाहेर काढतो ,मेदाचे पर्वत फोडतो ,हाडातील मज्जा बाहेर काढतो ,नाड्या  मोकळ्या करतो .शरीरातील पृथ्वी आणि पाण्याचे अंश एक करतो .मग या वज्रासानातील उष्णतेने कुंडलिनी शक्ती जागी होते नाभिस्थानाजवळ साडेतीन वेढे घेवून अग्नीच्या ज्वालेप्रमाणे निजलेली ती जागी होताच 
हृदय कोशातील वारा खाऊन  टाकते ,मग सप्त धातूंना पिऊन शरीर फक्त त्वचा आणि हाडाचे शिल्लक ठेवते .मग शांत होऊन ती सुशुम्नेजवळ राहते .प्राणायामाने कोंडलेला प्राणवायू आणि अपानवायू यांची भेट होते पण शत चक्राचे पदर त्यांना वेगळे ठेवतात .
शांत झालेली कुंडलिनी तोंडाने अमृताचे गरळ ओकते ,त्या अमृताने प्राण जगतो ,सर्व गात्रांची गेलेली शक्ती परत येऊ लागते .पण शरीराचे धर्म राहत नाहीत .इडा ,पिंगला या नाड्या एक होतात ,शत चक्रे यांचे पदर फुटतात .श्वास बंद होतो ,बुद्धी चैतन्यात नाहीशी होते तेंव्हा  चान्द्रमृताचे तळे  तिरपे होऊन ते अमृत कुन्द्लीनीच्या मुखात पडते आणि तो रस सर्व अंगात भरतो .आता शरीराच्या आकाराने जणू काय मूर्तिमंत तेजच प्रकट होते .या देहात पृथ्वी आणि पाण्याचे अंश नसतात म्हणून तो वायुसारखा हलका होतो .कुंडलिनी जेंव्हा हृदयात म्हणजे अनाहत चक्रात येते तेंव्हा ती अनाहत शब्दाने बोलते ,तो नाद हृदयात घुमतो तेंव्हा ब्राह्म्स्थानाचे द्वार आपोआप उघडते ,तेथे चैतन्य वसलेले असते ,त्या चैतन्याला कुंडलिनी आपले तेज अर्पण करते आणि आपण केवळ प्राणवायुरूप  होऊन त्या शक्तीमध्ये एकरूप होते .जेंव्हा कुंडलिनी याप्रमाणे चैतन्याशी एकरूप होते तेंव्हा त्यांचा देहाकार हा परब्रह्माचे रूपच असा दिसतो .जे पंचमहाभूतांचे बीज ,सूर्याचे तेज ,त्रैलोक्याचे कारण ,मनरहित अवस्थेचे सौंदर्य,नित्य सिद्ध व अमर्याद आहे ,अष्टांग योगरूपी वृक्षाचे फल ,आनंदाची जीवनकला आहे ,ते माझे खास स्वरूप आहे असे भगवंत म्हणतात

No comments:

Post a Comment