गीतेतील निरुपणा प्रमाणे सृष्टीत जे अनेक प्रकारचे विनाशी पदार्थ आहेत ,त्या सर्वात एकच परमेश्वर भरून राहिला आहे हे समजणे म्हणजे ज्ञान .
एकाच नित्य परमेश्वरापासून विविध नाशिवंत पदार्थ कसे होतात हे समजणे याचे नाव विज्ञान .
हा नाशिवंत प्रपंच हेच अंतिम सत्य समजणे म्हणजे अज्ञान .
या मूळ श्लोकामधले गूढ तत्व आपल्या रसपूर्ण भाषेत समजावून सांगताना श्री ज्ञानदेव म्हणतात
तैसी जाणीव जेथ न रिघे ।विचार मागुता पाऊली निघे ।तर्कु आयणी नेघें ।आंगी जयांचा ।
अर्जुना तया नाव ज्ञान ।येर प्रपंचु हे विज्ञान ।तेथ सत्यबुद्धी हे अज्ञान । हेंहि जाण ।75 /76
श्रीकृष्ण सांगतात कि अर्जुना .मला संपूर्ण जाणण्यासाठी जे स्वरूपज्ञान म्हणजे काय ते तू प्रथम समजून घे .जेथे बुद्धीचा प्रवेश होत नाही ,विचार जेथून मागे फिरतो ,तर्काचे चातुर्य जेथे चालत नाही त्याचे नाव ज्ञान होय .त्याहून दुसरा जो प्रपंच त्याचे नाव विज्ञान आहे .आणि प्रपंचच खरा आहे असे समजणे म्हणजे अज्ञान होय .म्हणून ज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी आधी विज्ञान समजणे जरुरी आहे .
आणि इयेते प्रकृती म्हणिजे ।जे अष्टधा भिन्न जाणिजे ।लोकत्रय निपजे ।इयेस्तव ।16
आप तेज गगन ।मही ,मारुत ,मन ।बुद्धी ,अहंकार हे भिन्न ।आठै भाग ।18
ही माझी प्रकृती पृथ्वी ,जलं ,तेज , वायू ,आकाश ,मन ,बुद्धी आणि अहंकार अशा आठ प्रकारात विभागली आहे .हीच माझी माया आहे .हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते .हिला अपरा प्रकृती असे म्हणतात .आणि जिने हे जग धारण केले आहे अशी माझी जीवभूता परा प्रकृती दुसरी आहे ..सर्व प्राणिमात्र या दोन प्रकृतीपासून निर्माण झाले आहेत .या सर्व जगाचा आदी आणि अंत मी आहे ,पण प्रत्यक्ष नामरूपाचा विस्तार प्रकृतीच करते .ज्याप्रमाणे दोरा मण्याला धारण करतो ,त्याप्रमाणे मी जगाला धारण करतो .
सात्विक ,राजस आणि तामस म्हणून जे जे पदार्थ आहेत .ते सर्व माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत ,पण मी त्यामध्ये नाही .या त्रिगुणात्मक मायेच्या मोहात पडलेले जग या गुणाहून वेगळ्या आणि विकाररहित अशा मला जाणत नाही .प्रकृतीचा हा विलास जाणणे हे विज्ञान होय .व या पलीकडील माझे अस्तित्व जाणणे हे ज्ञान होय .तसेच त्रिगुणात्मक सृष्टीस सत्य मानणे हे अज्ञान होय .माया किंवा अज्ञान हा त्रिगुणात्मक देह व इंद्रियांचा धर्म आहे -आत्म्याचा नाही .
एकाच नित्य परमेश्वरापासून विविध नाशिवंत पदार्थ कसे होतात हे समजणे याचे नाव विज्ञान .
हा नाशिवंत प्रपंच हेच अंतिम सत्य समजणे म्हणजे अज्ञान .
या मूळ श्लोकामधले गूढ तत्व आपल्या रसपूर्ण भाषेत समजावून सांगताना श्री ज्ञानदेव म्हणतात
तैसी जाणीव जेथ न रिघे ।विचार मागुता पाऊली निघे ।तर्कु आयणी नेघें ।आंगी जयांचा ।
अर्जुना तया नाव ज्ञान ।येर प्रपंचु हे विज्ञान ।तेथ सत्यबुद्धी हे अज्ञान । हेंहि जाण ।75 /76
श्रीकृष्ण सांगतात कि अर्जुना .मला संपूर्ण जाणण्यासाठी जे स्वरूपज्ञान म्हणजे काय ते तू प्रथम समजून घे .जेथे बुद्धीचा प्रवेश होत नाही ,विचार जेथून मागे फिरतो ,तर्काचे चातुर्य जेथे चालत नाही त्याचे नाव ज्ञान होय .त्याहून दुसरा जो प्रपंच त्याचे नाव विज्ञान आहे .आणि प्रपंचच खरा आहे असे समजणे म्हणजे अज्ञान होय .म्हणून ज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी आधी विज्ञान समजणे जरुरी आहे .
आणि इयेते प्रकृती म्हणिजे ।जे अष्टधा भिन्न जाणिजे ।लोकत्रय निपजे ।इयेस्तव ।16
आप तेज गगन ।मही ,मारुत ,मन ।बुद्धी ,अहंकार हे भिन्न ।आठै भाग ।18
ही माझी प्रकृती पृथ्वी ,जलं ,तेज , वायू ,आकाश ,मन ,बुद्धी आणि अहंकार अशा आठ प्रकारात विभागली आहे .हीच माझी माया आहे .हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते .हिला अपरा प्रकृती असे म्हणतात .आणि जिने हे जग धारण केले आहे अशी माझी जीवभूता परा प्रकृती दुसरी आहे ..सर्व प्राणिमात्र या दोन प्रकृतीपासून निर्माण झाले आहेत .या सर्व जगाचा आदी आणि अंत मी आहे ,पण प्रत्यक्ष नामरूपाचा विस्तार प्रकृतीच करते .ज्याप्रमाणे दोरा मण्याला धारण करतो ,त्याप्रमाणे मी जगाला धारण करतो .
सात्विक ,राजस आणि तामस म्हणून जे जे पदार्थ आहेत .ते सर्व माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत ,पण मी त्यामध्ये नाही .या त्रिगुणात्मक मायेच्या मोहात पडलेले जग या गुणाहून वेगळ्या आणि विकाररहित अशा मला जाणत नाही .प्रकृतीचा हा विलास जाणणे हे विज्ञान होय .व या पलीकडील माझे अस्तित्व जाणणे हे ज्ञान होय .तसेच त्रिगुणात्मक सृष्टीस सत्य मानणे हे अज्ञान होय .माया किंवा अज्ञान हा त्रिगुणात्मक देह व इंद्रियांचा धर्म आहे -आत्म्याचा नाही .
No comments:
Post a Comment