Thursday, July 12, 2012

arjunache sat prashn

सातव्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाने विनंती केली की त्या सात पदांचे पुन्हा निरुपण करावे या अर्जुनाच्या विनंतीला मान देताना पुढे होणार्या कृष्ण अर्जुन संवादाचे वर्णन करताना श्री ज्ञानदेव म्हणतात
तैसे देशियेचिया हवावा ।   इंद्रिये करिती राणिवा ।मग प्रमेयाचिया गांवा ।लेसा जाईजे ।7-209
इथे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रिये राज्य करतील ,बुद्धीच्या जीह्वेने शब्दातील अर्थ चाखण्या आधीच अक्षरांच्या शोभेने इंद्रियांचे समाधान होईल मग सिध्तान्ताच्या गावास त्याला चांगल्या तयारीने जाता येईल .जेथे शब्दच नाहीसे होतात ते बोलणे मी अशा सुंदर रीतीने सांगेन
1पुढे श्री भगवंत म्हणतात ,आकाराला आलेल्या सर्व सूक्ष्म पदार्थात भरलेले जे अविनाशी तत्व त्यास ब्रम्ह म्हणतात .
 2सृष्टीच्या उत्पत्ती आणि लया बरोबर जे ब्रम्ह उत्पन्न अथवा लयीभूत होत नाही ही त्याची जी स्थिती ते अध्यात्म .
3निराकार ब्रम्हाच्या ठिकाणी प्रकृतीयोगाने विश्व साकार होणे हे कर्म 
4 सजीवाचे शरीर ते अधिभूत
5 परमात्म्याचे त्या शरीरात वास करणारे   अधिदैव
6अधिदैवाचा मीपणाचा अहंकार गेला की तो  माझ्याप्रत  तो अधियज्ञ
एरवी अधिभूत आणि आधिदैव हे भगवंताचाच भाग , पण    अविध्येने  त्यांना  कमीपणा आला आहे .हा कमीपणा घालवण्यासाठी इंद्रियांना प्रिय असलेल्या विषयांकडे पाठ फिरवून वैराग्याच्या आधाराने अष्टांग योगाचे साधन करावे म्हणजे ते पुरुष मद्रूप अधियज्ञ होतात
7प्रयाण काली  योग्यांना होणारे  भगवंताचे स्मरण -पुढे याबद्दल भगवंत विस्ताराने बोलून अर्जुनाचे  पूर्ण समाधान करतात 

No comments:

Post a Comment