प्रयाण समयी योग्यांना होणारे भगवंताचे स्मरण या विषयी बोलताना भगवंत म्हणतात कि जिवंत असताना ज्या गोष्टीची आपल्याला आवड असते तीच गोष्ट मरण समयी आठवते व मरण समयी जी गोष्ट आठवते त्याच गतीला तो पुरुष जातो .
अंतकालेच मामेव स्मरन मुक्त्वा कलेवरम ।य :प्रयाति स मद्भावं याती नास्त्यत्र संशयः ।5
मरणाचे वेळी जो माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो तो मत्स्वरूप होतो यात संशय नाही .
ज्या पुरुषांनी मरणा पूर्वीच अष्टांग योगाचा अभ्यास करून मदरुपता प्राप्त करून घेतली आहे ,त्यांना शरीर पडल्याचे समजूनही येत नाही -याचा ज्याला अनुभव घ्यायचा आहेत्याने चित्ताला माझी मोहोर लावायचा अभ्यास करावा व प्रयाण काळी योगयुक्त होऊन स्थिर अंतकरणाने अव्यंग ब्रम्हाचे स्मरण करीत त्याचे प्रती जावे ,-तेंव्हा घटाखाली झाकलेल्या दिव्याप्रमाणे त्या योगी पुरुषाचे शांत देहावसान होते .
कां झाकलीये घटींचा दिवा ।नेणिजे काय जाहला जेंव्हा ।या रिती जो पांडवा देह ठेवी ।
तो केवळ परब्रम्ह ।जया परम पुरुष हे नाम ।ते माझे निजधाम ।होऊनी ठाके ।98-99
जिवंत पणीच योगाभ्यासाने ब्रम्हरूप प्राप्त करण्याच्या मार्गाचे सोपेपण वर्णन करताना भगवंत म्हणतात-
या मनाला सहज बाहेर येण्याची जी सवय आहे ,ती नाहीशी करून मन हृदयाच्या डोहात बुडेल असे करावे ,सर्व इंद्रियांचे नियमन करून ,हृदयाच्या ठिकाणी मनाचा निरोध करून ,प्राणवायू मस्तकाकडे ठेवून , योगाचरणात स्थित होऊन ओम या एकाक्षरी ब्रम्हचा उच्चार करीत व माझे स्मरण करीत जो देहत्याग करतो ,तो श्रेष्ठ अशा गतीला पावतो .
तरी मना या बाहेरीलकडे ।यावयाची सविया सवें मोडे । हें हृदयाचिया डोही बुडे ।तैसे कीजे ।11
यावरही अर्जुनास वाटले की इंद्रिये असमर्थ झाल्यावर ,मरणाची लक्षणे उघड दिसू लागल्यावर कोणी ओंकाराचे स्मरण कसे करावे ?या प्रश्नाला उत्तर देताना भगवंत म्हणतात
तरीअगा ऐशिया ध्वनी ।झणे थारा देशी हो मनी । पै नित्य सेविला मी निदानी ।सेवकु होय। 23
जे माझी नित्य सेवा करतात त्या भक्तांच्या मरण काळी मी त्यांचा सेवक होतो ,म्हणून त्यांचा अंतकाळ योगमार्गाने ,ओंकाराचे स्मरण करीत होईल याची मीच काळजी घेतो ,माझ्या भक्ताला मी आपल्याकडे काही आयास न पडता आणतो .
अंतकालेच मामेव स्मरन मुक्त्वा कलेवरम ।य :प्रयाति स मद्भावं याती नास्त्यत्र संशयः ।5
मरणाचे वेळी जो माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो तो मत्स्वरूप होतो यात संशय नाही .
ज्या पुरुषांनी मरणा पूर्वीच अष्टांग योगाचा अभ्यास करून मदरुपता प्राप्त करून घेतली आहे ,त्यांना शरीर पडल्याचे समजूनही येत नाही -याचा ज्याला अनुभव घ्यायचा आहेत्याने चित्ताला माझी मोहोर लावायचा अभ्यास करावा व प्रयाण काळी योगयुक्त होऊन स्थिर अंतकरणाने अव्यंग ब्रम्हाचे स्मरण करीत त्याचे प्रती जावे ,-तेंव्हा घटाखाली झाकलेल्या दिव्याप्रमाणे त्या योगी पुरुषाचे शांत देहावसान होते .
कां झाकलीये घटींचा दिवा ।नेणिजे काय जाहला जेंव्हा ।या रिती जो पांडवा देह ठेवी ।
तो केवळ परब्रम्ह ।जया परम पुरुष हे नाम ।ते माझे निजधाम ।होऊनी ठाके ।98-99
जिवंत पणीच योगाभ्यासाने ब्रम्हरूप प्राप्त करण्याच्या मार्गाचे सोपेपण वर्णन करताना भगवंत म्हणतात-
या मनाला सहज बाहेर येण्याची जी सवय आहे ,ती नाहीशी करून मन हृदयाच्या डोहात बुडेल असे करावे ,सर्व इंद्रियांचे नियमन करून ,हृदयाच्या ठिकाणी मनाचा निरोध करून ,प्राणवायू मस्तकाकडे ठेवून , योगाचरणात स्थित होऊन ओम या एकाक्षरी ब्रम्हचा उच्चार करीत व माझे स्मरण करीत जो देहत्याग करतो ,तो श्रेष्ठ अशा गतीला पावतो .
तरी मना या बाहेरीलकडे ।यावयाची सविया सवें मोडे । हें हृदयाचिया डोही बुडे ।तैसे कीजे ।11
यावरही अर्जुनास वाटले की इंद्रिये असमर्थ झाल्यावर ,मरणाची लक्षणे उघड दिसू लागल्यावर कोणी ओंकाराचे स्मरण कसे करावे ?या प्रश्नाला उत्तर देताना भगवंत म्हणतात
तरीअगा ऐशिया ध्वनी ।झणे थारा देशी हो मनी । पै नित्य सेविला मी निदानी ।सेवकु होय। 23
जे माझी नित्य सेवा करतात त्या भक्तांच्या मरण काळी मी त्यांचा सेवक होतो ,म्हणून त्यांचा अंतकाळ योगमार्गाने ,ओंकाराचे स्मरण करीत होईल याची मीच काळजी घेतो ,माझ्या भक्ताला मी आपल्याकडे काही आयास न पडता आणतो .
No comments:
Post a Comment