या सातव्या अध्यायाचा शेवट ही ज्ञानेश्वरांची एक नाट्य निर्मिती म्हणावी लागेल .मूळ गीतेत नसलेला एक प्रसंग त्यांनी इथे आपल्या कल्पना विलासाने उभा केला आहे .
मग चमत्कारला म्हणे ।इये जळीची मा तारांगणे ।कैसा झकविलो असलगपणे ।अक्षरांचे मी ।7-194
"आत्मप्राप्तीसाठी झटनार्याना परब्रम्ह रूप फल मिळते आणि प्रयाण काळीही ते मला विसरत नाहीत "हे भगवंत सांगत असताना अर्जुनाला ती पदे अनाकलनीय वाटली हे सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात की ती पदे त्याला पाण्यात पडलेल्या तार्यांच्या प्रतीबिम्बाप्रमाणे सुंदर पण दूरस्थ आणि अप्र्याप्य वाटली .
या अर्जुनाच्या मनस्थितीचे ते नाट्यरूप निवेदन करतात
ही ब्रम्हाच्या प्रतिपादनाची वाक्ये म्हणजे अर्थरूप रसाने भरलेली फळेच ,ती अर्जुनाच्या विचाराच्या तोंडात मावेनात अशी ते उपमा देतात .आणि हेतूच्या दातानीही ती फुटेनात ,म्हणजे भगवंताचा हेतू काय हे त्याला कळेना ,म्हणून अर्जुन ती वाक्यरूपी फळे तोंडाला लावेना .
तंव इये शब्द कुपिकेतळी ।नोढवेची अवधानाची अंजुळी ।जे नावेक अर्जुन त्यावेळी। मागांची होता ।7-185
श्रीकृष्णाच्या शब्दरूपी कुपिच्या खाली अर्जुनाची लक्ष रुपी ओंजळ प्राप्त झाली नाही ,कारण अर्जुनाचे त्यावेळी लक्ष नव्हते .त्याठिकाणी ते ब्रम्हाचे प्रतिपादन करणारी वाक्ये हीच कोणी फळे नाना प्रकारच्या अर्थ रुपी रसाने भरली होती व अभिप्रायाच्या सुगंधाने दरवळली होती ,ही श्रीकृष्णरूपी वृक्षाची वचन रुपी फळे सहज कृपारूपी मंद वार्याने अर्जुनाच्या कान रुपी ओटीत अकस्मात पडली .
ती वाक्यरूप फळे तत्वज्ञानाच्या सिद्धांताची बनवलेली असून ब्रम्हरसाच्या समुद्रात बुडवून मग तशीच परमानंदाने घोळली होती .या फळाच्या बाह्य सौंदर्याचे सुख अर्जुनास अनुभवास येऊ लागले ,पण मग त्याला जाणवले की ही सुलभ दिसणारी वाक्ये नाहीत तर ह्या आकाशाच्या घड्याच आहेत .तेथे आमच्या बुद्धीने कितीही धडपड केली तरी तिला थांग लागणार नाही .म्हणून त्याने भगवंतास विनंती केली ह्या सात पदांचा अर्थ मला पुन्हा सांगावा ,हे सांगणे म्हणजे अथवा अध्याय होय .
मग चमत्कारला म्हणे ।इये जळीची मा तारांगणे ।कैसा झकविलो असलगपणे ।अक्षरांचे मी ।7-194
"आत्मप्राप्तीसाठी झटनार्याना परब्रम्ह रूप फल मिळते आणि प्रयाण काळीही ते मला विसरत नाहीत "हे भगवंत सांगत असताना अर्जुनाला ती पदे अनाकलनीय वाटली हे सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात की ती पदे त्याला पाण्यात पडलेल्या तार्यांच्या प्रतीबिम्बाप्रमाणे सुंदर पण दूरस्थ आणि अप्र्याप्य वाटली .
या अर्जुनाच्या मनस्थितीचे ते नाट्यरूप निवेदन करतात
ही ब्रम्हाच्या प्रतिपादनाची वाक्ये म्हणजे अर्थरूप रसाने भरलेली फळेच ,ती अर्जुनाच्या विचाराच्या तोंडात मावेनात अशी ते उपमा देतात .आणि हेतूच्या दातानीही ती फुटेनात ,म्हणजे भगवंताचा हेतू काय हे त्याला कळेना ,म्हणून अर्जुन ती वाक्यरूपी फळे तोंडाला लावेना .
तंव इये शब्द कुपिकेतळी ।नोढवेची अवधानाची अंजुळी ।जे नावेक अर्जुन त्यावेळी। मागांची होता ।7-185
श्रीकृष्णाच्या शब्दरूपी कुपिच्या खाली अर्जुनाची लक्ष रुपी ओंजळ प्राप्त झाली नाही ,कारण अर्जुनाचे त्यावेळी लक्ष नव्हते .त्याठिकाणी ते ब्रम्हाचे प्रतिपादन करणारी वाक्ये हीच कोणी फळे नाना प्रकारच्या अर्थ रुपी रसाने भरली होती व अभिप्रायाच्या सुगंधाने दरवळली होती ,ही श्रीकृष्णरूपी वृक्षाची वचन रुपी फळे सहज कृपारूपी मंद वार्याने अर्जुनाच्या कान रुपी ओटीत अकस्मात पडली .
ती वाक्यरूप फळे तत्वज्ञानाच्या सिद्धांताची बनवलेली असून ब्रम्हरसाच्या समुद्रात बुडवून मग तशीच परमानंदाने घोळली होती .या फळाच्या बाह्य सौंदर्याचे सुख अर्जुनास अनुभवास येऊ लागले ,पण मग त्याला जाणवले की ही सुलभ दिसणारी वाक्ये नाहीत तर ह्या आकाशाच्या घड्याच आहेत .तेथे आमच्या बुद्धीने कितीही धडपड केली तरी तिला थांग लागणार नाही .म्हणून त्याने भगवंतास विनंती केली ह्या सात पदांचा अर्थ मला पुन्हा सांगावा ,हे सांगणे म्हणजे अथवा अध्याय होय .
No comments:
Post a Comment