Tuesday, July 24, 2012

bhagvantaache mulswarup

उदरीचा गर्भ जैसा ।नेणे मायेची वयसा ।
आपल्या मूळ रुपाबद्दल बोलताना भगवंत म्हणतात गर्भाला आईचे वय माहित नसते ,त्याप्रमाणे मी ज्यांना उत्पन्न केले आहे ते वेद ,मन ,प्राण ,देव यापैकी कोणीही माझे मूळ स्वरूप ,त्याची उत्पत्ती याबद्दल सांगू शकणार नाही .पण जर कोणी देह इत्यादी अनात्म तत्वावरून परावृत्त होईल व पंचमहाभूतांच्या माथ्यावर चढेल त्याला आत्म तत्वाच्या प्रकाशात माझे जन्म रहस्य कळेल .
मी या मूळ  एक  तत्वापासून पुढे मन ,मनापासून अकरा लोकपाल ,लोकपालांपासून सर्व भिन्न प्राणिजात उत्पन्न झाले -या सर्व अनेकात एक आत्म तत्व मीच आहे याची धारणा जो बाळगेल ,
जे जे भेटे भूत ।ते ते मानिजे भगवंत ।या वृत्तीने जो वागेल तो जिवंत पणीच मजप्रत येईल .
या भाषणाने संतुष्ट झालेला अर्जुन म्हणाला ,पूर्वी थोर मुनी तुझ्या वर्णनात जे सांगत त्यातले सत्य मला आता उमगले आहे .एरवी मी  नारदांच्या वर्णनाचा अर्थ न लक्षात घेता त्यांच्या गायनावरच लुब्ध होत असे .आम्हाला रागदारीचे कौतुक वाटायचे व परमार्थ कडू लागायचा ,महर्षी व्यास तुझे यथार्थ रूप समजावत त्यावेळी अंधारात सापडलेला चिंतामणी दगड म्हणून फेकून द्यावा तसे आम्ही वागत असू .कृष्णा आमच्याकडे अज्ञानाचा अंधार होता ,नव्हे आम्ही स्वतःच आंधळे होतो .पण आता काय झाले तर
ते आता वाक्यसूर्यकर तुझे फाकले ।आणि ऋषिमार्ग होते जे कथाले ।तिया आघावायान्चेची फिटले अनोळखपण  ।
आता तुझी वाक्यरूपी सूर्यकिरणे माझ्या हृदयावर पडली आणि पूर्वी ऋषींनी सांगितलेल्या मार्गाचे अनोळखी पण फिटले .ऋषींनी पेरलेल्या  ज्ञानबिजाना  तुझ्या कृपेचा ओलावा लाभला म्हणून ते बीज आता अंकुरले .व तुझ्या संवादाचे त्यास फल लाभले .गुरूची कृपा झाली म्हणजे ऐकलेले व शिकवलेले सर्व ज्ञान आपले काम करते .गुरुच्या अस्तित्वाला तो वसंत ऋतूची  किंवा शरीरातील चैतन्याची उपमा देतो व म्हणतो की केवळ आपल्या शहाणपणाने तुझी कृपा होण्या आधीच मी ज्ञान प्राप्त करून घेतो असे कोणी म्हणेल तर केवळ बुद्धीच्या सामर्थ्यावर समजला  जाण्याजोगा तू केंव्हाच नाहीस हे मला आत्ता कळले .
तुझे वाक्य व्यक्ती न येत देवा ।आपुलिया जाणे जाणीवा ।तैसा काहीच नाही हे सदभावा ।भरवसेनी आले ।

No comments:

Post a Comment