दहाव्या अध्यायात वेगवेगळ्या स्वरूपातील विभूतीचे वर्णन भगवंतांनी केले .ते संपताना त्यांना शंका आली कि ही कथा अभेदभावाने अर्जुनाला कळली कि नाही ?म्हणून भगवंत अर्जुनास म्हणाले
येरा विभूती विस्तारास काही ।एथ सर्वथा लेख नाही ।म्हणोनी परिससी तू कायी ।आम्ही सांगो किती?
अर्जुना ,पृथ्वीवर उगवणार्या गवताचे अंकुर किती हे मोजता येईल काय ?याप्रमाणे माझ्या विभूतीना मोजमाप नाही -याकरिता आम्ही आपले वर्म तुला सांगतो कि सर्व प्राणीरूप अंकुराने वाढणारे ते बीज मी आहे .जी जी वस्तू वैभवाने ,संपत्तीने अथवा उदारतेने युक्त असेल ती माझ्या तेजापासून उत्पन्न झाली आहे असे समज .एकच जाण कि आपल्या एकाच अंशाने मी हे सर्व विश्व व्यापून राहिलो आहे .
आता सामान्य विशेष ।हे जाणणे येथ महादोष ।कां जे मीची एक अशेष ।विश्व आहे म्हणोनी ।
आता हे संपूर्ण विश्व मीच आहे असे असताना एक साधारण आणि एक चांगला असा आपल्याच बुद्धीने माझ्या ठिकाणी भेदाचा कलंक का लावावा ?याकरता अर्जुना प्रत्येक वस्तुत वेगवेगळा तू मला कुठवर जाणशील ?याकरिता आता भेद भावना टाकून ऐक्य दृष्टीने मला सर्व ठिकाणी सारखा भज .
आता पै माझेनी अंशे ।हे जग व्यापिले असे ।यालागी भेद सांडूनी सरिसे ।साम्ये भज ।
यावर अर्जुन म्हणाला महाराज ,भेद हा एक वेगळा असून ,त्यास टाकणारे आम्ही वेगळे असे तुम्ही अविचाराने बोलता ,सूर्यापुढे जसा अंधार नाही तसा तुमच्या स्वरुपापुढे भेद नाही .कोणत्याही वेळी तुझे नावच ज्याच्या मुखात येईल ,अथवा कानावर पडेल त्याच्या अंत करणाला भेद टाकून पळतो . असा जो तू मला दैवाने प्राप्त झाला आहे तर आता भेद कोठे पहायचा ?तेंव्हा देवाने संतुष्ट होऊन म्हटले कि अर्जुना तुला हे पटले की नाही हे आम्ही पाहत होतो तेंव्हा तू रागावू नकोस यावर अर्जुन म्हणाला ,
येथ अर्जुन म्हणे देवे ।हे अपुले आपण जाणावे ।परि देखतसे विश्व आघवे ।तुंवा भरले ।
येरा विभूती विस्तारास काही ।एथ सर्वथा लेख नाही ।म्हणोनी परिससी तू कायी ।आम्ही सांगो किती?
अर्जुना ,पृथ्वीवर उगवणार्या गवताचे अंकुर किती हे मोजता येईल काय ?याप्रमाणे माझ्या विभूतीना मोजमाप नाही -याकरिता आम्ही आपले वर्म तुला सांगतो कि सर्व प्राणीरूप अंकुराने वाढणारे ते बीज मी आहे .जी जी वस्तू वैभवाने ,संपत्तीने अथवा उदारतेने युक्त असेल ती माझ्या तेजापासून उत्पन्न झाली आहे असे समज .एकच जाण कि आपल्या एकाच अंशाने मी हे सर्व विश्व व्यापून राहिलो आहे .
आता सामान्य विशेष ।हे जाणणे येथ महादोष ।कां जे मीची एक अशेष ।विश्व आहे म्हणोनी ।
आता हे संपूर्ण विश्व मीच आहे असे असताना एक साधारण आणि एक चांगला असा आपल्याच बुद्धीने माझ्या ठिकाणी भेदाचा कलंक का लावावा ?याकरता अर्जुना प्रत्येक वस्तुत वेगवेगळा तू मला कुठवर जाणशील ?याकरिता आता भेद भावना टाकून ऐक्य दृष्टीने मला सर्व ठिकाणी सारखा भज .
आता पै माझेनी अंशे ।हे जग व्यापिले असे ।यालागी भेद सांडूनी सरिसे ।साम्ये भज ।
यावर अर्जुन म्हणाला महाराज ,भेद हा एक वेगळा असून ,त्यास टाकणारे आम्ही वेगळे असे तुम्ही अविचाराने बोलता ,सूर्यापुढे जसा अंधार नाही तसा तुमच्या स्वरुपापुढे भेद नाही .कोणत्याही वेळी तुझे नावच ज्याच्या मुखात येईल ,अथवा कानावर पडेल त्याच्या अंत करणाला भेद टाकून पळतो . असा जो तू मला दैवाने प्राप्त झाला आहे तर आता भेद कोठे पहायचा ?तेंव्हा देवाने संतुष्ट होऊन म्हटले कि अर्जुना तुला हे पटले की नाही हे आम्ही पाहत होतो तेंव्हा तू रागावू नकोस यावर अर्जुन म्हणाला ,
येथ अर्जुन म्हणे देवे ।हे अपुले आपण जाणावे ।परि देखतसे विश्व आघवे ।तुंवा भरले ।
No comments:
Post a Comment