Monday, July 9, 2012

bhakt

मायानदीचे वर्णन करताना भगवंत म्हणतात कि हा मायानदीचा  पूर तरून जाण्यास बुद्धी कामाला येत नाही ,तर उपाय म्हणजे सर्व भावाने मला भजणे .हे भक्त चार प्रकारचे असतात ,आर्त ,जिज्ञासू ,अर्थप्राप्तीची इच्छा धरणारा आणि ज्ञानी .यापैकी ज्ञानी हा भक्त माझ्याशी एकरूप झालेला असतो ,म्हणून मला प्रिय आहे .आर्त म्हणजे दुखं निवारणार्थ माझ्याकडे येणारे. काही जाणून घेण्याची इच्छा असलेले ते जिज्ञासू आणि अर्थार्थी म्हणजे अर्थ प्राप्तीची इच्छा धरणारा ..हे भक्तच आहेत ,मला आवडतात ,पण कनिष्ठ प्रतीचे ,खर्या श्रेष्ठ भक्ताला माझ्यापासून कशाचीच अपेक्षा नसते .फार काय ,तो माझ्याच योग्यतेला आलेला असतो आणि तरीही माझी सेवा करतो .
मग चौथियांचा ठायी । काहीच करणे नाही ।मग भक्तु एक पाही ।ज्ञानिया जो ।111
जे तया ज्ञानाचेनि प्रकाशे ।फिटले भेदाभेदाचे कवडसे ।मग मिची जाहला समरसे ।आणि भक्तुही तेवीची ।112
 असे पहा अर्जुना ,दुधासाठी लोक गाईला बांधून घालतात ,पण दोरावाचून वासराचा पाश इतका बळकट की ते शरीर ,मन आणि प्राणाने आपल्या आईखेरीज कोणाला जाणत  नाही .ते इतके अनन्यगती असते ,म्हणून गाईचीही त्याच्यावर तशीच प्रीती असते ,तसेच माझे आणि ज्ञानी भक्ताचे नाते आहे .हे संपूर्ण विश्व श्री वासुदेव आहे असा ज्यांचा भाव असतो ,तो सर्व भक्तांचा राजा आहे ,ज्ञानी आहे ,पण असे भक्त दुर्लभ असतात .असे जे भक्त मला जाणतात ते मरणसमयीही मला स्मरतात .ते माझ्याशी इतके एकरूप झालेले असतात की शरीराच्या वियोगाच्या वेळेस दुखी होत नाहीत .
येर तनुमन प्राणी ।जे निरंतर माझेयाची वाहणी ।ते देहाचा निर्वाणी ।मिची होती ।7-150
असा हा ज्ञानी भक्त म्हणजे माझे केवळ चैतन्यच होय ,ही शब्दात न सांगता येणारी गोष्ट ,मी अर्जुनावरच्या प्रेमापोटी बोलून गेलो
.एर्हवी ज्ञानिया जो म्हणिजे ।तो चैतन्यची केवळ माझे ।हे न म्हणावे परी काय कीजे ।न बोलणे बोलो ।7-126
 

No comments:

Post a Comment