सातव्या अध्यायात ज्ञान व विज्ञान यातील फरक स्पष्ट करताना श्री ज्ञानेश्वर विज्ञान म्हणजे त्रीगुणात्मक मायेचा खेळ असे वर्णन करतात .या मायेच्या पलीकडे पोहोचून अविकारी अशा परमेश्वराचे रूप जाणून घेण्यासाठी त्यांनी मायानदीचे रूपक उभे केले .आहे
गीतेत नसलेले पण ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने उभे केलेले हे एक प्रभावी भव्य रूपक आहे .श्री ज्ञानदेव म्हणतात
आता महदादि हे माझी माया ।उतरोनिया धनंजया ।मी होईजे हे आया ।कैसेनी ये ।68
हे अर्जुना -महत तत्व ही माझी माया ,ती पार करून माझ्याशी एकरूप होणे कसे साध्य होईल ?
ही माया नदी ब्रह्म रुपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून मुल संकल्प रुपी उसळीने निघाली -त्यावेळी तिच्यात पंच महाभूताचा लहान बुडबुडा उत्पन्न झाला .ही नदी सृष्टीच्या विस्तार रूपाने वाढते ,मोठा ओघ बनते ,काळाच्या ग्रास करण्याच्या शक्तीरूपाने वेगाने वाढून ती प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही काठाबाहेर वाहते -नंतर गुणरुपी मेघांच्या जोरदार वर्षावाने तिला मोह रुपी महापूर येतो ,या पुरात यम नियम रुपी गांवे वाहून जातात .या नदीचा प्रवाह द्वेष रुपी भोवर्यांनी दाट भरला आहे ,तिला मत्सर रुपी वळणे आहेत ,तिच्यात तरुण स्त्रीयारूपी मोठे मासे आहेत ,तिला प्रपंच रुपी वळणे आहेत ,व कर्माकर्म रुपी पूर येत आहेत आणि सुख दुख रुपी पुराड त्यावर तरंगत आहे .
रतीच्या बेटावर या नदीच्या कामरूपी लाटा आदळतात व तेथे जीवांचा समुदाय दिसतो .
या नदीत अहंकाराच्या मोठ्या धारा आहेत व त्यावर विद्या ,धन ,कुल या तीन मदाच्या उकळ्या येतात आणि विषयरूपी लाटा उसळतात .या नदीत उदय अस्तांचे लोंढे जन्म मृत्यू रूप व तेथे पंचमहाभुतापासून शरीर रुपी बुडबुडे तयार होतात व जातात .येथे अज्ञानाचे भोवरे वक्रगतीने फिरतात ,भ्रांतीच्या गढुळपणामुळे आशा रूपी गाळात प्राणी फसतात .या नदीत तमोगुणाची धार मोठी असते ,पण सत्वगुणांचा स्थिरपणा गंभीर असतो .अशी ही मायानदी तरून जाण्यास फार कठीण आहे तिच्या पूनर्जन्म रुपी लाटांची उसळी सत्य लोकाच्या बुरुजावर जाऊन आदळते व त्यामुळे ब्रम्हांडाचे धोंडे कोसळून पडतात .या लाटांमुळे आलेला पूरअद्याप हि थांबत नाही .
येथ एक नवलावो ।जो जो कीजे तरणोपावो ।तो तो अपावो ।होय ते ऐक ।
या मायानदीतून तरून जाण्याचा जो जो उपाय करावा तो तो अपायचं होतो ,ऐक कसे ते ,
एक आपल्या बुद्धिरूपी बाहूने ही नदी तरून जाण्याकरता नदीत शिरले -ते कोठे गेले त्याचा पत्ताच नाही .दुसरे किती एक ज्ञानाच्या डोहामध्ये अभिमानाने गिळले गेले .किती एकानी वेदरुपी सांगडीचा आश्रय केला ,पण त्याबरोबर अभिमानाचे मोठे धोंडे घेतले -ते मद रुपी माशाच्या तोंडात सबंध गेले .कितिकांनी तारुण्य रुपी कांस पेटा कमरेस बांधला ,ते विषय रुपी मगर यांनी चघळून टाकले .नंतर म्हातारपण रुपी लाटेमध्ये असणार्या बुद्धिभ्रंश रुपी जाळ्याने ते व्यापले जातात ,शोकरुपी काठावर आदळले जातात ,क्रोध रुपी भवर्यात गुरफटतात ,संकटरुपी गीधाडाकडून टोचले जातात ,दुख रुपी चिखलाने भरून मरण रुपी गाळात फसतात कितीएकानि क्रीयारूपी पेटी पोटाशी बांधली ,ते स्वर्गसुखाच्या कपारीत अडकून राहिले ,ज्यांनी कर्मरुपी बाहूंवर विश्वास ठेवला ते विधीनिषेधाच्या वळणात सापडले .
अष्टांग योगानेही इथे कदाचित काही तरणोपाय होतो .अंगच्या सामर्थ्याने ही नदी उतरून जाता येत नाही ,जे सर्वभावे ईश्वराला भजले ,तेच ही मायानदी सहज तरून गेले .ज्यास सदगुरू हा तारणारा नावाडी आहे ,ज्यांनी आत्मानुभव रुपी कासोटा घट्ट बांधला आहे ,-ज्यांना आत्मनिवेदन रुपी तराफा प्राप्त झाला आहे ,जे अहंभावाचे ओझे टाकून ,विकल्प रुपी वार्याच्या झुळुका चुकवून ,संसारावरील प्रेमाच्या ओहोटीचे पाणी तपासून चालतात त्यांना जीव व परमात्मा यांच्या ऐक्य रुपी उतार असलेल्या पाण्यात ज्ञान रुपी सोपी पायवाट सापडून ते निवृत्ती रूप तीराकडे वळतात ,वैराग्यरूपी हाताने पाणी तोडीत ,मीच परमात्मा आहे या समजुतीच्या बलाने तोल सांभाळत निवृत्तीरूप काठाने बाहेर आले व मायानदी तरून गेले .पण असे भक्त थोडे आहेत .
येथ एकची लीला तरले ।जे सर्वभावे मज भजले ।तया ऐलीच थडिये सरले ।मायाजळ ।
गीतेत नसलेले पण ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने उभे केलेले हे एक प्रभावी भव्य रूपक आहे .श्री ज्ञानदेव म्हणतात
आता महदादि हे माझी माया ।उतरोनिया धनंजया ।मी होईजे हे आया ।कैसेनी ये ।68
हे अर्जुना -महत तत्व ही माझी माया ,ती पार करून माझ्याशी एकरूप होणे कसे साध्य होईल ?
ही माया नदी ब्रह्म रुपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून मुल संकल्प रुपी उसळीने निघाली -त्यावेळी तिच्यात पंच महाभूताचा लहान बुडबुडा उत्पन्न झाला .ही नदी सृष्टीच्या विस्तार रूपाने वाढते ,मोठा ओघ बनते ,काळाच्या ग्रास करण्याच्या शक्तीरूपाने वेगाने वाढून ती प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही काठाबाहेर वाहते -नंतर गुणरुपी मेघांच्या जोरदार वर्षावाने तिला मोह रुपी महापूर येतो ,या पुरात यम नियम रुपी गांवे वाहून जातात .या नदीचा प्रवाह द्वेष रुपी भोवर्यांनी दाट भरला आहे ,तिला मत्सर रुपी वळणे आहेत ,तिच्यात तरुण स्त्रीयारूपी मोठे मासे आहेत ,तिला प्रपंच रुपी वळणे आहेत ,व कर्माकर्म रुपी पूर येत आहेत आणि सुख दुख रुपी पुराड त्यावर तरंगत आहे .
रतीच्या बेटावर या नदीच्या कामरूपी लाटा आदळतात व तेथे जीवांचा समुदाय दिसतो .
या नदीत अहंकाराच्या मोठ्या धारा आहेत व त्यावर विद्या ,धन ,कुल या तीन मदाच्या उकळ्या येतात आणि विषयरूपी लाटा उसळतात .या नदीत उदय अस्तांचे लोंढे जन्म मृत्यू रूप व तेथे पंचमहाभुतापासून शरीर रुपी बुडबुडे तयार होतात व जातात .येथे अज्ञानाचे भोवरे वक्रगतीने फिरतात ,भ्रांतीच्या गढुळपणामुळे आशा रूपी गाळात प्राणी फसतात .या नदीत तमोगुणाची धार मोठी असते ,पण सत्वगुणांचा स्थिरपणा गंभीर असतो .अशी ही मायानदी तरून जाण्यास फार कठीण आहे तिच्या पूनर्जन्म रुपी लाटांची उसळी सत्य लोकाच्या बुरुजावर जाऊन आदळते व त्यामुळे ब्रम्हांडाचे धोंडे कोसळून पडतात .या लाटांमुळे आलेला पूरअद्याप हि थांबत नाही .
येथ एक नवलावो ।जो जो कीजे तरणोपावो ।तो तो अपावो ।होय ते ऐक ।
या मायानदीतून तरून जाण्याचा जो जो उपाय करावा तो तो अपायचं होतो ,ऐक कसे ते ,
एक आपल्या बुद्धिरूपी बाहूने ही नदी तरून जाण्याकरता नदीत शिरले -ते कोठे गेले त्याचा पत्ताच नाही .दुसरे किती एक ज्ञानाच्या डोहामध्ये अभिमानाने गिळले गेले .किती एकानी वेदरुपी सांगडीचा आश्रय केला ,पण त्याबरोबर अभिमानाचे मोठे धोंडे घेतले -ते मद रुपी माशाच्या तोंडात सबंध गेले .कितिकांनी तारुण्य रुपी कांस पेटा कमरेस बांधला ,ते विषय रुपी मगर यांनी चघळून टाकले .नंतर म्हातारपण रुपी लाटेमध्ये असणार्या बुद्धिभ्रंश रुपी जाळ्याने ते व्यापले जातात ,शोकरुपी काठावर आदळले जातात ,क्रोध रुपी भवर्यात गुरफटतात ,संकटरुपी गीधाडाकडून टोचले जातात ,दुख रुपी चिखलाने भरून मरण रुपी गाळात फसतात कितीएकानि क्रीयारूपी पेटी पोटाशी बांधली ,ते स्वर्गसुखाच्या कपारीत अडकून राहिले ,ज्यांनी कर्मरुपी बाहूंवर विश्वास ठेवला ते विधीनिषेधाच्या वळणात सापडले .
अष्टांग योगानेही इथे कदाचित काही तरणोपाय होतो .अंगच्या सामर्थ्याने ही नदी उतरून जाता येत नाही ,जे सर्वभावे ईश्वराला भजले ,तेच ही मायानदी सहज तरून गेले .ज्यास सदगुरू हा तारणारा नावाडी आहे ,ज्यांनी आत्मानुभव रुपी कासोटा घट्ट बांधला आहे ,-ज्यांना आत्मनिवेदन रुपी तराफा प्राप्त झाला आहे ,जे अहंभावाचे ओझे टाकून ,विकल्प रुपी वार्याच्या झुळुका चुकवून ,संसारावरील प्रेमाच्या ओहोटीचे पाणी तपासून चालतात त्यांना जीव व परमात्मा यांच्या ऐक्य रुपी उतार असलेल्या पाण्यात ज्ञान रुपी सोपी पायवाट सापडून ते निवृत्ती रूप तीराकडे वळतात ,वैराग्यरूपी हाताने पाणी तोडीत ,मीच परमात्मा आहे या समजुतीच्या बलाने तोल सांभाळत निवृत्तीरूप काठाने बाहेर आले व मायानदी तरून गेले .पण असे भक्त थोडे आहेत .
येथ एकची लीला तरले ।जे सर्वभावे मज भजले ।तया ऐलीच थडिये सरले ।मायाजळ ।
No comments:
Post a Comment