श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या नात्याचा वेळोवेळी उल्लेख करताना ज्ञानेश्वरांनी त्यांची सर्व आवडती उपमाने -कामधेनूचा बछडा ,कल्पतरूच्या खाली बसलेला इच्छुक ,चिंतामणीच्या घरात निजलेला .ही वापरली आहेत .भगवंताची थोरवी वर्णन करताना ते त्यांना मातेची उपमा देतात
जे अपत्य थानीहून निगे ।त्याची भूक त्या मायेसीच लागे ।एऱ्हवी ते शब्दे काय संगे ।मज स्तन्य दे येरी ।13
स्तनपान करणाऱ्या बाळाची भूक ज्याप्रमाणे त्याने शब्दामध्ये स्तन्याची मागणी न करताच आईला कळते ,त्याप्रमाणे न बोलताच अर्जुनाच्या मनातले प्रश्न ओळखून भगवंतानी आपल्या बोलण्याला प्रारंभ केला .मानवी मनातील अष्ट सात्विक भावांचे असे भगवंताच्या व्यक्तिमत्वावर रोपण करणे हे श्री ज्ञानदेवांचे वैशिष्ट्य होय .आणि या मातृभावाने योगेश्वर कृष्णाची थोरवीही विशेष प्रतीत होते .पुरुषोत्तमा ,मधुसूदना ,सर्वेश्वर ,सर्वज्ञ वैगेरे अर्जुनाने जी श्रीकृष्णांना संबोधने वापरली आहेत त्यातूनही वरील भावच प्रकट होतात .
अर्जुनाने सातवा प्रश्न विचारला की योगी मृत्युसमयी तुला कसे जाणतात ?या प्रश्नांचे उत्तर तर भगवंतानी सविस्तर दिलेच ,पण त्यांची थोरवी अशी की मृत्युसमयी आपल्याला कोणता मार्ग प्राप्त होईल ?या विचाराने खिन्न झालेल्या अर्जुनाला दिलासा देताना त्यांनी प्रत्यक्ष परमेश्वरापेक्षा भक्त श्रेष्ठ असा पवित्रा घेतला आहे ,ते म्हणतात
कोणी पापी अथवा दीन मरण समयी माझा धावा करू लागला तरी त्याच्यासाठी मी धावतोच न ?मग भक्ताचे वेगळेपण येथेच आहे अनेकविध मार्गाने त्याने केलेली भक्ती ही परमेश्वरावर केलेल्या ऋणा सारखी असते ,व ते ऋण फेडण्या करिता परमेश्वर स्वतःमरण समयी त्याची चाकरी करतो ,त्याला योग्य मरण देतो ,त्यासाठी त्याने माझी त्यावेळीच आठवण करावी याची गरज नाही .याशिवाय अजून एक गोष्ट ते अर्जुनाला समजावून सांगतात
तरी आता देह असो अथवा जावो ।आम्ही तो केवळ वस्तूची आहो ।का जे दोरी सर्पत्व वावो ।दोराचीकडून ।48
जो योगमार्गाने जातो त्याला हे ज्ञान प्राप्त असते की देह जावो अथवा राहो ,आम्ही तर केवळ ब्रम्हच आहोत .व म्हणून या देहाच्या अस्तित्वाचे फोलपण व आत्म्याचे अमरत्व जाणवते जसा दोरीवर अंधाराने होणारा सर्पाचा भास मिथ्या आहे व दोरी असणे हेच अंतिम सत्य आहे .
जे अपत्य थानीहून निगे ।त्याची भूक त्या मायेसीच लागे ।एऱ्हवी ते शब्दे काय संगे ।मज स्तन्य दे येरी ।13
स्तनपान करणाऱ्या बाळाची भूक ज्याप्रमाणे त्याने शब्दामध्ये स्तन्याची मागणी न करताच आईला कळते ,त्याप्रमाणे न बोलताच अर्जुनाच्या मनातले प्रश्न ओळखून भगवंतानी आपल्या बोलण्याला प्रारंभ केला .मानवी मनातील अष्ट सात्विक भावांचे असे भगवंताच्या व्यक्तिमत्वावर रोपण करणे हे श्री ज्ञानदेवांचे वैशिष्ट्य होय .आणि या मातृभावाने योगेश्वर कृष्णाची थोरवीही विशेष प्रतीत होते .पुरुषोत्तमा ,मधुसूदना ,सर्वेश्वर ,सर्वज्ञ वैगेरे अर्जुनाने जी श्रीकृष्णांना संबोधने वापरली आहेत त्यातूनही वरील भावच प्रकट होतात .
अर्जुनाने सातवा प्रश्न विचारला की योगी मृत्युसमयी तुला कसे जाणतात ?या प्रश्नांचे उत्तर तर भगवंतानी सविस्तर दिलेच ,पण त्यांची थोरवी अशी की मृत्युसमयी आपल्याला कोणता मार्ग प्राप्त होईल ?या विचाराने खिन्न झालेल्या अर्जुनाला दिलासा देताना त्यांनी प्रत्यक्ष परमेश्वरापेक्षा भक्त श्रेष्ठ असा पवित्रा घेतला आहे ,ते म्हणतात
कोणी पापी अथवा दीन मरण समयी माझा धावा करू लागला तरी त्याच्यासाठी मी धावतोच न ?मग भक्ताचे वेगळेपण येथेच आहे अनेकविध मार्गाने त्याने केलेली भक्ती ही परमेश्वरावर केलेल्या ऋणा सारखी असते ,व ते ऋण फेडण्या करिता परमेश्वर स्वतःमरण समयी त्याची चाकरी करतो ,त्याला योग्य मरण देतो ,त्यासाठी त्याने माझी त्यावेळीच आठवण करावी याची गरज नाही .याशिवाय अजून एक गोष्ट ते अर्जुनाला समजावून सांगतात
तरी आता देह असो अथवा जावो ।आम्ही तो केवळ वस्तूची आहो ।का जे दोरी सर्पत्व वावो ।दोराचीकडून ।48
जो योगमार्गाने जातो त्याला हे ज्ञान प्राप्त असते की देह जावो अथवा राहो ,आम्ही तर केवळ ब्रम्हच आहोत .व म्हणून या देहाच्या अस्तित्वाचे फोलपण व आत्म्याचे अमरत्व जाणवते जसा दोरीवर अंधाराने होणारा सर्पाचा भास मिथ्या आहे व दोरी असणे हेच अंतिम सत्य आहे .
No comments:
Post a Comment