Friday, July 13, 2012

paramdhaam

अव्यक्तोक्षर इत्युक्तस्तमाहु  परमां गतीम ।यं प्राप्य न निवर्तन्ते तत्धाम परमं मम ।21
ज्यास अव्यक्त .अक्षर म्हणतात ,त्यालाच परम गती म्हणतात ,ज्याप्रत गेल्यावर प्राणी परत येत नाहीत ,ते माझे अत्यंत श्रेष्ठ असे स्वरूप आहे .
21 व्या श्लोकातील भगवंताच्या या विधानाचे विवेचन करताना श्री ज्ञानेश्वरांच्या वाणीला बहर आला आहे .अनेक  दृष्टातांचा आधार घेऊन ही भगवंतांच्या अंतरंगातली गुह्य गोष्ट त्यांनी आपल्यासाठी सोपी करून मांडली आहे .
सुरवातीसच त्यांनी सांगून टाकले की हा श्रेष्ठ पुरुष फक्त अनन्य भक्तीनेच प्राप्त होणारा आहे
याला अव्यक्त असे म्हणतात कारण ते मन आणि बुद्धीला दिसत नाही
आकाराला आल्याने त्याचे निराकारपण जात नाही व आकार लोप पावल्याने त्याची निरयता बिघडत नाही ,म्हणून त्याला अक्षर म्हंटले आहे .
त्याच्यापलीकडे काही विस्तार दिसत नाही म्हणून त्यास परमगती ,अंतिम गती असे म्हणतात
संपूर्ण देहरूपी  नगरामध्ये तो परमात्मा निजल्यासारखा उदासीन आहे कारण तो बुद्धीची जाणण्याची क्रिया ,इंद्रियांचे व्यापार ,मनाची संकल्प विकल्प रूप क्रिया ,प्राणवायूची हालचाल या सर्व व्यापाराचा कर्ता किंवा करवता नाही ,पण ज्याप्रमाणे सूर्य आहे म्हणून लोकांचे व्यापार चालतात ,त्याप्रमाणे याच्या केवळ अस्तित्वाने शरीराचे व्यापार चालतात .
हा प्रकृतीशी एकनिष्ठ  असतो म्हणून त्यास पुरुष म्हणता येते .
वर सांगितलेले या पुरुषाचे खरे स्वरूप जाणणारे श्रेष्ठ योगी यास परमगती म्हणतात .
जे श्रेष्ठ भक्त कायावाचामनाने हे त्रैलोक्यच पुरुषोत्तम आहे अशी धारणा धरतात ,परमात्मा त्यांचे घर शोधत येतो ,या परमात्मरूपी मुक्कामाला पोहोचलेल्या भक्ताला हा संसारच सर्व बाजूनी मोक्ष होऊन राहतो .आणि जो हे परमात्मरूप पावला त्याला पुनर्जन्म नाही .,जसे परिसाने लोखंडाचे सोने केल्यावर त्याला पुन्हा लोखंड करणारा पदार्थ नाही ,लाकूड अग्नीत गेले असता अग्निरुप्च होते ,लाकूड राहत नाही .
  जे परम स्वरम ,माझे स्वताचे श्रेष्ठ धाम -ही अंतरंगातील गुप्त गोष्ट मी तुला दाखवत आहे
ते माझे परम ।साचोकारे निजधाम ।हे आतुवर तुज वर्म ।दाविजत असे ।3

No comments:

Post a Comment