नवव्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीत ज्ञानेश्वरांचा आत्मविश्वास त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिज्ञापुर्वक बोलण्यातून प्रतीत होतो .
तरी अवधान एक वेळ दीजे ।मग सर्व सुखासी पात्र होईजे ।हे प्रतिज्ञोत्तर माझे ।उघड ऐका ।1
आपले हे बोलणे गर्वाचे वाटेल कि काय अशा शंकेने ते लगेच लडिवाळपणे लक्ष देण्याची विनंती करतात .आणि या विनंतीचा विस्तार करताना ते एकाहून एक उत्तम अनेक दृष्टांत देतात आणि आपल्या प्रतिभेने श्रोत्यांचे मन जिंकतात .या श्रोत्यांच्या कृपेनेच आपल्या हातून चांगले ग्रंथ कर्तृत्व होणार आहे अशी ते खात्री देतात. समोर बसलेल्या संतसज्जनांच्या कृपेसाठी ते आईसमोर मुलाने बोलावे तसे लडिवाळ बोलत आहेत ,.त्यांच्या समोर बोलण्याची आपली योग्यता नाही असे वर्णन करताना ते म्हणतात ,
अवधारा आवडे तेसणा घुन्घुरू।परि महातेजी मिरवे काय करू ?अमृताचिया ताटी वोगरू ।ऐसी रससोय कैची । काजवा हवा तेवढा मोठा असला तरी सूर्याच्या प्रकाशापुढे त्याचे तेज दिसत नाही ,अमृताच्या ताटात वाढावे असे पक्वान्न कोठून असणार ?चंद्राला पंख्याने वारा घालणे ,प्रत्यक्ष नाद्ब्रम्हाला गाणे ऐकवणे ,किंवा अलंकारास दागिन्याने सजवणे असे कोठे झाले आहे का ?सुवासाचा वास कशाने घ्यावा ?समुद्राने कोठे स्नान करावे ? आकाशच ज्यामध्ये मावेल अशी वस्तू कोणती ?त्याप्रमाणे तुमचे मन तृप्त करील असे वक्तृत्व कोणाजवळ आहे ?असे ते विचारतात.
पण असे असले तरी ते निरुपण करणार आहेत याची कारणमीमांसा करताना ते पुन्हा नव्या कल्पनांचा आविष्कार करतात,
तरि विश्व प्रगटीतया गभस्ती ।हातिवेनी न कीजे आरती ।कां चुळोदके आपांपती ।अर्घ्यु नेदिजे ।13
असे जरी आहे तरीजग उजेडात आणणाऱ्या सूर्याला काड्वातीने ओवाळू नये काय ?किंवा चुळ भर पाण्याने समुद्राला अर्घ्य देऊ नये काय ?
असे हे आपले आख्यान श्रोते स्वीकारणार आहेत याची खात्री दाखवताना ते श्रोत्यांच्या वात्सल्य भावाला आवाहन करतात म्हणतात कि
अहो तान्ह्याची लागे झटे।तरी अधिकची पान्हा फुटे ।शेषे प्रेम दुणावते ।पढीयन्ताचेनी ।18
गायीच्या सडाला वासराने ढुशी दिली तिला जास्तच पान्हा फुटतो ,कारण आवडत्याच्या रागाने प्रेम दुप्पट होत .असते -त्याप्रमाणे मी प्रतिज्ञेने बोलून चूक केली तरी तुम्ही कृपाळूपणे ते मनावर घेणार नाहीत .
लहान मुल बापाच्या ताटात जेवायला बसते व पानातील पदार्थ घेऊन बापालाच जेऊ घालते , बापही आपले तोंड पुढे करतो ,त्याप्रमाणे माझ्या बालबुद्धी बडबडीने तुम्ही आनंदी होता, असे ते श्रोत्यांना म्हणतात .वक्ता
आणि श्रोता या संवादात श्रोत्यांचे महत्व सांगताना ते ,म्हणतात अहो ,चंद्रकांत मणि पाझरणारा आहे , पण त्याला पाझरवण्याची शक्ती चंद्रामधेच आहे ,त्याप्रमाणे वक्ता पुष्कळ बोलेल ,पण त्याला बोलते करण्याची शक्ती श्रोत्याकडेच आहे .-म्हणून चंद्रापेक्षा शांत करणारे आणि अमृतापेक्षा जीवित वाढवणारे असे जे श्रोत्यांचे लक्ष ,त्या लक्षाने श्री ज्ञानेश्वरांच्या मनोरथांची वाढ करावी अशी विनंती ते करतात
तरी अवधान एक वेळ दीजे ।मग सर्व सुखासी पात्र होईजे ।हे प्रतिज्ञोत्तर माझे ।उघड ऐका ।1
आपले हे बोलणे गर्वाचे वाटेल कि काय अशा शंकेने ते लगेच लडिवाळपणे लक्ष देण्याची विनंती करतात .आणि या विनंतीचा विस्तार करताना ते एकाहून एक उत्तम अनेक दृष्टांत देतात आणि आपल्या प्रतिभेने श्रोत्यांचे मन जिंकतात .या श्रोत्यांच्या कृपेनेच आपल्या हातून चांगले ग्रंथ कर्तृत्व होणार आहे अशी ते खात्री देतात. समोर बसलेल्या संतसज्जनांच्या कृपेसाठी ते आईसमोर मुलाने बोलावे तसे लडिवाळ बोलत आहेत ,.त्यांच्या समोर बोलण्याची आपली योग्यता नाही असे वर्णन करताना ते म्हणतात ,
अवधारा आवडे तेसणा घुन्घुरू।परि महातेजी मिरवे काय करू ?अमृताचिया ताटी वोगरू ।ऐसी रससोय कैची । काजवा हवा तेवढा मोठा असला तरी सूर्याच्या प्रकाशापुढे त्याचे तेज दिसत नाही ,अमृताच्या ताटात वाढावे असे पक्वान्न कोठून असणार ?चंद्राला पंख्याने वारा घालणे ,प्रत्यक्ष नाद्ब्रम्हाला गाणे ऐकवणे ,किंवा अलंकारास दागिन्याने सजवणे असे कोठे झाले आहे का ?सुवासाचा वास कशाने घ्यावा ?समुद्राने कोठे स्नान करावे ? आकाशच ज्यामध्ये मावेल अशी वस्तू कोणती ?त्याप्रमाणे तुमचे मन तृप्त करील असे वक्तृत्व कोणाजवळ आहे ?असे ते विचारतात.
पण असे असले तरी ते निरुपण करणार आहेत याची कारणमीमांसा करताना ते पुन्हा नव्या कल्पनांचा आविष्कार करतात,
तरि विश्व प्रगटीतया गभस्ती ।हातिवेनी न कीजे आरती ।कां चुळोदके आपांपती ।अर्घ्यु नेदिजे ।13
असे जरी आहे तरीजग उजेडात आणणाऱ्या सूर्याला काड्वातीने ओवाळू नये काय ?किंवा चुळ भर पाण्याने समुद्राला अर्घ्य देऊ नये काय ?
असे हे आपले आख्यान श्रोते स्वीकारणार आहेत याची खात्री दाखवताना ते श्रोत्यांच्या वात्सल्य भावाला आवाहन करतात म्हणतात कि
अहो तान्ह्याची लागे झटे।तरी अधिकची पान्हा फुटे ।शेषे प्रेम दुणावते ।पढीयन्ताचेनी ।18
गायीच्या सडाला वासराने ढुशी दिली तिला जास्तच पान्हा फुटतो ,कारण आवडत्याच्या रागाने प्रेम दुप्पट होत .असते -त्याप्रमाणे मी प्रतिज्ञेने बोलून चूक केली तरी तुम्ही कृपाळूपणे ते मनावर घेणार नाहीत .
लहान मुल बापाच्या ताटात जेवायला बसते व पानातील पदार्थ घेऊन बापालाच जेऊ घालते , बापही आपले तोंड पुढे करतो ,त्याप्रमाणे माझ्या बालबुद्धी बडबडीने तुम्ही आनंदी होता, असे ते श्रोत्यांना म्हणतात .वक्ता
आणि श्रोता या संवादात श्रोत्यांचे महत्व सांगताना ते ,म्हणतात अहो ,चंद्रकांत मणि पाझरणारा आहे , पण त्याला पाझरवण्याची शक्ती चंद्रामधेच आहे ,त्याप्रमाणे वक्ता पुष्कळ बोलेल ,पण त्याला बोलते करण्याची शक्ती श्रोत्याकडेच आहे .-म्हणून चंद्रापेक्षा शांत करणारे आणि अमृतापेक्षा जीवित वाढवणारे असे जे श्रोत्यांचे लक्ष ,त्या लक्षाने श्री ज्ञानेश्वरांच्या मनोरथांची वाढ करावी अशी विनंती ते करतात
No comments:
Post a Comment