1 पाहे पां दूध पवित्र आणि गोड ।पांसी त्वचेचीया पदराआड ।परि ते अव्हेरून गोचीड ।अशुध्द काय नेघाती ?57
नवव्या अध्यायात भगवंत अत्यंत गुह्य असे ब्रम्हज्ञान ,आपल्या अंतकरणातील गोष्ट सांगतात कारण अर्जुन स्वतः ज्ञानप्राप्तीच्या इच्छेची मूर्ती आहे .हे स्वरूपज्ञान सर्व विद्ध्यामध्ये श्रेष्ठ विद्या आहे -यावर अर्जुन शंका व्यक्त करतो कि अशी ज्ञानासारखी वस्तू लोकात अनुभव घेतल्याशिवाय कशी राहिली ?याचे उत्तर देताना धर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्या पुरुषाचे वर्णन करताना भगवंत म्हणतात -
दुध हे पवित्र व गोड असून जवळच त्वचेच्या पदरा आड आहे ,तरी गोचीड ते सोडून रक्त पीत नाही काय?
कमळ आणि बेडूक यांची वस्ती एकाच ठिकाणी आहे ,कमळातील परिमल दूरचे भुंगे येऊन सेवन करून जातात ,पण बेडकासाठी चिखलच असतो
दुर्देवी पुरुषाच्या घरात हजारो मोहोरा पुरलेल्या आहेत ,परंतु अज्ञानाने तो त्यावरच बसून दारिद्र्यात जीवन घालवतो -याचप्रमाणे सर्व सुखांचा बगीचा असा राम तो सर्वांच्या हृदयात असताना ,त्या मला न जाणून मूर्ख लोक सुखाकरता विषयांची इच्छा धरतात ,म्हणून ते जन्म मरण रूप दुथड्या नदीत गटांगळ्या खात रहातात .
2दिपु ठेविला परिवरी ।कवणाते नियमि ना निवारी ।आणि कवण कवणिये व्यापारी ।राहाटे तेही नेणे ।28
तो जैसा का साक्षी भूत ।गृह्व्यापार प्रवृत्ती हेतू ।तैसा भूत कर्मी अनासक्तू ।मी भूती असे ।29
भगवंत म्हणतात कि अव्यक्त रूपाने मी हे सर्व जग व्यापले आहे ,सर्व भुते माझ्या ठिकाणी आहेत ,पण मी त्यांच्या ठिकाणी स्थित नाही ,अव्यक्त रूपाने असलेला मी त्रैलोक्य रूपाने विस्तार पावतो हा भास आहे .
भूतांना धारण करणारे ,तथापि भुतांच्या ठिकाणी स्थित नसलेले आणि ज्याच्या ठिकाणी भूतांची कल्पना केली जाते असे माझे स्वरूप आहे मायेमुळे माझ्या शुध्द रूपावर भूतांची कल्पना करणारी प्रकृती संपली कि त्यापलीकडे असणारी माझी शुध्द स्वरूपस्थिती वेगळी समजणे हा माझा ऐश्वर्य योग आहे .
या सर्व भूत समुदायाची उत्पत्ती ,स्थिती आणि लय या कर्माचे मूळ कारण प्रकृती आहे -जी पंचमहाभूतात्मक जगाचा आकार प्रकट करते -या प्रकृतीला माझ्या सत्तेचा केवळ आधार असतो ,बाकी कर्तृत्व हिचे -म्हणून ह्या कर्माच्या ठिकाणी मी अनासक्त असल्याने मला हि कर्मे बंधन करू शकत नाहीत -ही गुह्य गोष्ट स्पष्ट करण्याकरता ते वरील दृष्टांत देतात
घरात ठेवलेला दिवा कोणाला तू काही कर असे नियम घालून देत नाही ,अथवा निवारण करत नाही ,तसेच घरात कोणकोण काय करत आहे हे दिवा जाणत नाही -तो केवळ साक्षीभूत असूनही घरातील सर्व व्यापाराच्या प्रवृत्तीला कारण असतो -त्याप्रमाणे सर्व भूतामध्ये मी असून त्यांच्याकडून होणार्या कर्माबद्दल उदासीन आहे ,पण त्याच वेळी माझ्या अस्तित्वाच्या आधारानेच कर्मे होतात
समाप्त
नवव्या अध्यायात भगवंत अत्यंत गुह्य असे ब्रम्हज्ञान ,आपल्या अंतकरणातील गोष्ट सांगतात कारण अर्जुन स्वतः ज्ञानप्राप्तीच्या इच्छेची मूर्ती आहे .हे स्वरूपज्ञान सर्व विद्ध्यामध्ये श्रेष्ठ विद्या आहे -यावर अर्जुन शंका व्यक्त करतो कि अशी ज्ञानासारखी वस्तू लोकात अनुभव घेतल्याशिवाय कशी राहिली ?याचे उत्तर देताना धर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्या पुरुषाचे वर्णन करताना भगवंत म्हणतात -
दुध हे पवित्र व गोड असून जवळच त्वचेच्या पदरा आड आहे ,तरी गोचीड ते सोडून रक्त पीत नाही काय?
कमळ आणि बेडूक यांची वस्ती एकाच ठिकाणी आहे ,कमळातील परिमल दूरचे भुंगे येऊन सेवन करून जातात ,पण बेडकासाठी चिखलच असतो
दुर्देवी पुरुषाच्या घरात हजारो मोहोरा पुरलेल्या आहेत ,परंतु अज्ञानाने तो त्यावरच बसून दारिद्र्यात जीवन घालवतो -याचप्रमाणे सर्व सुखांचा बगीचा असा राम तो सर्वांच्या हृदयात असताना ,त्या मला न जाणून मूर्ख लोक सुखाकरता विषयांची इच्छा धरतात ,म्हणून ते जन्म मरण रूप दुथड्या नदीत गटांगळ्या खात रहातात .
2दिपु ठेविला परिवरी ।कवणाते नियमि ना निवारी ।आणि कवण कवणिये व्यापारी ।राहाटे तेही नेणे ।28
तो जैसा का साक्षी भूत ।गृह्व्यापार प्रवृत्ती हेतू ।तैसा भूत कर्मी अनासक्तू ।मी भूती असे ।29
भगवंत म्हणतात कि अव्यक्त रूपाने मी हे सर्व जग व्यापले आहे ,सर्व भुते माझ्या ठिकाणी आहेत ,पण मी त्यांच्या ठिकाणी स्थित नाही ,अव्यक्त रूपाने असलेला मी त्रैलोक्य रूपाने विस्तार पावतो हा भास आहे .
भूतांना धारण करणारे ,तथापि भुतांच्या ठिकाणी स्थित नसलेले आणि ज्याच्या ठिकाणी भूतांची कल्पना केली जाते असे माझे स्वरूप आहे मायेमुळे माझ्या शुध्द रूपावर भूतांची कल्पना करणारी प्रकृती संपली कि त्यापलीकडे असणारी माझी शुध्द स्वरूपस्थिती वेगळी समजणे हा माझा ऐश्वर्य योग आहे .
या सर्व भूत समुदायाची उत्पत्ती ,स्थिती आणि लय या कर्माचे मूळ कारण प्रकृती आहे -जी पंचमहाभूतात्मक जगाचा आकार प्रकट करते -या प्रकृतीला माझ्या सत्तेचा केवळ आधार असतो ,बाकी कर्तृत्व हिचे -म्हणून ह्या कर्माच्या ठिकाणी मी अनासक्त असल्याने मला हि कर्मे बंधन करू शकत नाहीत -ही गुह्य गोष्ट स्पष्ट करण्याकरता ते वरील दृष्टांत देतात
घरात ठेवलेला दिवा कोणाला तू काही कर असे नियम घालून देत नाही ,अथवा निवारण करत नाही ,तसेच घरात कोणकोण काय करत आहे हे दिवा जाणत नाही -तो केवळ साक्षीभूत असूनही घरातील सर्व व्यापाराच्या प्रवृत्तीला कारण असतो -त्याप्रमाणे सर्व भूतामध्ये मी असून त्यांच्याकडून होणार्या कर्माबद्दल उदासीन आहे ,पण त्याच वेळी माझ्या अस्तित्वाच्या आधारानेच कर्मे होतात
समाप्त
No comments:
Post a Comment