तेथ संजये माथा तुकविला ।अहा अमृताचा पाऊस वर्षला ।किं हा येथ असुनची गेला ।सेजिया गावा ।
श्रीकृष्णार्जुन संवाद ऐकून भान हरपलेला संजय धृतराष्ट्राच्या विरुध्द मनस्थितीचे वर्णन करताना म्हणतो ,आज येथे अमृताची वृष्टी झाली ,पण हा धृतराष्ट्र येथ असूनही शेजारच्या गावाला गेल्यासारखा आहे .
पुढे तो म्हणतो की धन्य माझे भाग्य की महामुनी व्यासांनी धृतराष्ट्राला हा वृत्तांत सांगण्याचे निमित्ताने या ज्ञानपूर्ण संवादश्रवणाची संधी मला दिली व जन्ममृत्युच्या फेर्यापासून माझे रक्षण केले - हे बोलत असताना त्याच्या मनात अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले -त्याचे चित्त चकित झाले ,वाचा कुंठीत झाली ;सर्वांगावर रोमांच उभे राहिले ,अर्धोन्मीलित डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले .सुखातीरेकाने त्याचे शरीर कापू लागले सर्वांगावर घामाचे थेंब जमले ,या महासुखाचे भाराने त्याच्या जीवाची आटणी होण्याची वेळ आली ,तेंव्हा श्रीकृष्णार्जुनाचे बोलणे धोधो अशा गर्जना करीत त्याचे कानावर आले ,त्यामुळे संजय देह्स्मृतीवर आला .
संजयाच्या मनस्थितीचे हे श्रीज्ञानेश्वरांचे भाष्य संपूर्ण स्वतंत्र आहे -एकंदरच गीतेच्या तात्विक विवेचनाला श्रीज्ञानेश्वरांनी विविध संवादाच्या रूपाने जी मानवी भावनिक बैठक दिली आहे ,त्याच्याशी हे सुसंगत आहे .संजय व धृतराष्ट्र यांच्या दोन टोकाच्या प्रतिक्रिया ह्या मानवी स्वभावाच्या दोन छटांचे विलोभनीय दर्शन घडवतात -तसेच संजयाच्या भावस्थितीचे वर्णन हे एका अर्थी स्वतः ज्ञानेश्वर आणि सर्व श्रोते यांच्याच भावस्थितीचे वर्णन आहे ,हेच त्यांना सूचित करायचे आहे .आणि श्रोता कसा नसावा हे त्यांनी धृतराष्ट्राच्या वर्णनातून खुबीने सांगितले आहे .असा हा मनोद्न्य नवव्या अध्यायाचा शेवट आहे .
श्रीकृष्णार्जुन संवाद ऐकून भान हरपलेला संजय धृतराष्ट्राच्या विरुध्द मनस्थितीचे वर्णन करताना म्हणतो ,आज येथे अमृताची वृष्टी झाली ,पण हा धृतराष्ट्र येथ असूनही शेजारच्या गावाला गेल्यासारखा आहे .
पुढे तो म्हणतो की धन्य माझे भाग्य की महामुनी व्यासांनी धृतराष्ट्राला हा वृत्तांत सांगण्याचे निमित्ताने या ज्ञानपूर्ण संवादश्रवणाची संधी मला दिली व जन्ममृत्युच्या फेर्यापासून माझे रक्षण केले - हे बोलत असताना त्याच्या मनात अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले -त्याचे चित्त चकित झाले ,वाचा कुंठीत झाली ;सर्वांगावर रोमांच उभे राहिले ,अर्धोन्मीलित डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले .सुखातीरेकाने त्याचे शरीर कापू लागले सर्वांगावर घामाचे थेंब जमले ,या महासुखाचे भाराने त्याच्या जीवाची आटणी होण्याची वेळ आली ,तेंव्हा श्रीकृष्णार्जुनाचे बोलणे धोधो अशा गर्जना करीत त्याचे कानावर आले ,त्यामुळे संजय देह्स्मृतीवर आला .
संजयाच्या मनस्थितीचे हे श्रीज्ञानेश्वरांचे भाष्य संपूर्ण स्वतंत्र आहे -एकंदरच गीतेच्या तात्विक विवेचनाला श्रीज्ञानेश्वरांनी विविध संवादाच्या रूपाने जी मानवी भावनिक बैठक दिली आहे ,त्याच्याशी हे सुसंगत आहे .संजय व धृतराष्ट्र यांच्या दोन टोकाच्या प्रतिक्रिया ह्या मानवी स्वभावाच्या दोन छटांचे विलोभनीय दर्शन घडवतात -तसेच संजयाच्या भावस्थितीचे वर्णन हे एका अर्थी स्वतः ज्ञानेश्वर आणि सर्व श्रोते यांच्याच भावस्थितीचे वर्णन आहे ,हेच त्यांना सूचित करायचे आहे .आणि श्रोता कसा नसावा हे त्यांनी धृतराष्ट्राच्या वर्णनातून खुबीने सांगितले आहे .असा हा मनोद्न्य नवव्या अध्यायाचा शेवट आहे .
No comments:
Post a Comment