अहिंसा या पदाचे व्याख्यान करताना ज्ञानदेवांनी प्रथम अहिन्सेबद्दलची कर्मकांडातली हास्यास्पद मते सांगून त्यांचे खंडन केले आहे .उत्तरपक्ष करताना ते म्हणतात कि खरी अहिंसा हि मनात उत्पन्न होत असते ,मन हे सर्व इंद्रियांचे प्रेरक असल्याने मनात अहिंसा उत्पन्न झाली असता त्याच्या सर्व शारीरिक क्रियांमध्ये प्राणीमात्रांविषयी प्रेम भरलेले दिसते .आत्मवत सर्व भूतानि ।म्हणजे आपल्याप्रमाणेच सर्व भूतजात आहे असे आत्मज्ञान त्याला झाले म्हणजे मनात साऱ्या प्राणिमात्रांबद्दल निखळ प्रेम निर्माण होते हाच अहिंसेचा मूळ विचार होय .ज्ञानी माणसाच्या मनातील अहिंसेची विविध रूपे अनेक दृष्टान्तानी दाखवताना श्रीज्ञानेश्वर अरूप अहिंसेचे मूर्त रूप आपल्यासमोर उभे करतात .
पै मोहाचेनि सांगाडे ।लासी पिले धरी तोंडे ।तेथ दातांचे आगरडे ।लागती जैसे ।
मांजरी आपले पिलू तोंडात धरते तेंव्हा त्याला जसे तिचे दात लागत नाहीत तशी त्याची दृष्टी एकाच वेळी बळकट पण अतिशय नाजूक असते .
का नादब्रम्ह्ची मुसे आले ।कि गंगापय असलेले ।पतिव्रते भाळे ।वार्धक्य का ।
त्याचे बोलणे म्हणजे जणूकाही नादब्रम्ह आकारास आले असे मधुर ,किंवा गंगेचे पाणी उसळले असे पवित्र ,किंवा पतिव्रतेला म्हातारपण आले असे रसाळ ,खरे ,मोजके पण सरळ ,कोणाला न खुपणारे असे असते .
तरी चंद्रबिम्बोनी धारा ।निघता नव्हती गोचरा ।परि एकसरे चकोरा।निघती दोंदे ।
चंद्र बिम्बातून निघणार्या अमृताच्या धारा ज्याप्रमाणे डोळ्याला दिसत नाहीत ,पण त्यांच्या योगाने चकोर पक्षी पुष्ट होतात ,त्याप्रमाणे त्याची दृष्टी प्राण्यांकडे असते .
भ्रमर जसे कमळावर त्याचे केसर चुरगाळतील या शंकेने नाजूक पाय ठेवतात त्याप्रमाणे सर्वत्र लहान जीव आहेत हे जाणून तो दयेने आपली पावले लपवित चालतो .
पुढा स्नेह पाझरे ।मांगा चालती अक्षरे । शब्द पाठी अवतरे ।कृपा आधी ।
तो कोणाशी बोलत असताना पुढे प्रेम पाझरते ,मागून अक्षरे चालतात .कृपा आधी प्रकट होते व शब्द मागून येतात त्याचे बोलणे ऐकणाराला तो आपले आईबापच आहे कि काय असे वाटते .
ज्याप्रमाणे जमिनीत पेरलेले बीच वृक्ष होते त्याप्रमाणे त्याचे मनच इंद्रीयाद्वारा पसरले आहे .समुद्रास पूर्ण भरती आली म्हणजे तो जसा आपल्या पाण्याने खाड्या भरून टाकतो ,तसे चित्तच आपल्या अहिंसारूपी जलसंपत्तीने या इंद्रियांना भरून टाकते
तो जान वेल्हाळ ।ज्ञानाचे वेलाउल ।हे असो निखळ ।ज्ञानची तो ।
मनाने ,देहाने ,वाचेने हिंसेचा त्याग झालेला पुरुष हा ज्ञानाचे मंदिर होय ,नव्हे तो साक्षात ज्ञानाची मूर्ती होय असे समज .
अरूप
पै मोहाचेनि सांगाडे ।लासी पिले धरी तोंडे ।तेथ दातांचे आगरडे ।लागती जैसे ।
मांजरी आपले पिलू तोंडात धरते तेंव्हा त्याला जसे तिचे दात लागत नाहीत तशी त्याची दृष्टी एकाच वेळी बळकट पण अतिशय नाजूक असते .
का नादब्रम्ह्ची मुसे आले ।कि गंगापय असलेले ।पतिव्रते भाळे ।वार्धक्य का ।
त्याचे बोलणे म्हणजे जणूकाही नादब्रम्ह आकारास आले असे मधुर ,किंवा गंगेचे पाणी उसळले असे पवित्र ,किंवा पतिव्रतेला म्हातारपण आले असे रसाळ ,खरे ,मोजके पण सरळ ,कोणाला न खुपणारे असे असते .
तरी चंद्रबिम्बोनी धारा ।निघता नव्हती गोचरा ।परि एकसरे चकोरा।निघती दोंदे ।
चंद्र बिम्बातून निघणार्या अमृताच्या धारा ज्याप्रमाणे डोळ्याला दिसत नाहीत ,पण त्यांच्या योगाने चकोर पक्षी पुष्ट होतात ,त्याप्रमाणे त्याची दृष्टी प्राण्यांकडे असते .
भ्रमर जसे कमळावर त्याचे केसर चुरगाळतील या शंकेने नाजूक पाय ठेवतात त्याप्रमाणे सर्वत्र लहान जीव आहेत हे जाणून तो दयेने आपली पावले लपवित चालतो .
पुढा स्नेह पाझरे ।मांगा चालती अक्षरे । शब्द पाठी अवतरे ।कृपा आधी ।
तो कोणाशी बोलत असताना पुढे प्रेम पाझरते ,मागून अक्षरे चालतात .कृपा आधी प्रकट होते व शब्द मागून येतात त्याचे बोलणे ऐकणाराला तो आपले आईबापच आहे कि काय असे वाटते .
ज्याप्रमाणे जमिनीत पेरलेले बीच वृक्ष होते त्याप्रमाणे त्याचे मनच इंद्रीयाद्वारा पसरले आहे .समुद्रास पूर्ण भरती आली म्हणजे तो जसा आपल्या पाण्याने खाड्या भरून टाकतो ,तसे चित्तच आपल्या अहिंसारूपी जलसंपत्तीने या इंद्रियांना भरून टाकते
तो जान वेल्हाळ ।ज्ञानाचे वेलाउल ।हे असो निखळ ।ज्ञानची तो ।
मनाने ,देहाने ,वाचेने हिंसेचा त्याग झालेला पुरुष हा ज्ञानाचे मंदिर होय ,नव्हे तो साक्षात ज्ञानाची मूर्ती होय असे समज .
No comments:
Post a Comment