गुरुकृपादृष्टीरूपी मातेचा जयजयकार करून श्रीज्ञानेश्वर बाराव्या अध्यायाला प्रारंभ करतात .
या दृष्टीचे महिमान वर्णन करताना ते हि दृष्टी शुध्द आहे ,उदार म्हणून प्रसिध्द आहे ,अखंड आनंदाचा वर्षाव करणारी आहे .या दृष्टीच्या योगाने विषयरूपी सर्पाच्या दंशाने येणारी भ्रांती नाहीशी होते ,या दृष्टीला येणारी प्रसन्नता रूप भरती जीवाला संसारातील त्रिविध ताप आणि खेद यापासून वाचवते ,भक्तांना अष्टांग योगाच्या सुखाचे भोग प्राप्त होतात व त्याहीपुढे "ते ब्रम्ह मी आहे "अशा स्वरूप सिद्धीच्या प्राप्तीची हौस तीच पुरवते .
गुरूची दृष्टी ज्यावर पडते त्याला जे दिसत नव्हते, कळत नव्हते ,ते दिसू,कळू लागते ,शब्दातून व्यक्त करता येते ,आणि याचीच मला गरज आहे ,कारण आता सर्वात अवघड असे देव व भक्त यांच्यातल्या प्रेमाचे वर्णन करायचे आहे ,म्हणून श्रीज्ञानेश्वर म्हणतात की तू माउली होऊन मला ती शक्ती दे .
म्हणोनी साधका तू माउली ।पिके सारस्वत तुझिया पाऊली ।
याकारणे मी साउली ।न सांडी तुझी ।५
सर्व विश्वात पसरलेली ,सर्वत्र सारखी ,शुध्द शक्ती तू आहेस ,तू अनवरत -अखंड आनंदाचा वर्षाव करतोस -उदारपणे सगळंच देऊन टाकतोस -तर ती कृपादृष्टी ,ते तुझे स्वरूप -आनंद ,ते मला दे .असा जेंव्हा तू मला प्रसन्न होशील ,तेंव्हा मी तुझी सावली सोडणार नाही ,कारण मातेच्या सावलीत बालकाला जे सुख मिळते ,ते त्रिभुवनात कोठेही मिळत नाही .मग तुझ्या सावलीत ,तुझ्या पावलांनी सारस्वत माझ्या घरात पिकेल ,मुखातून बाहेर पडेल ,श्रोत्यांना ऐकावयाला मिळेल ,यासाठी तू नुसते माझ्याकडे पहा ,तू नुसते पाहिलेस की हे घडेल ,मग माझ्या मनातले तुझ्याबद्दलचे प्रेम माझ्या शब्दातून उगवून भरघोस वाढेल .
अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी ।तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी ।ते सकळ विध्याचीये सृष्टी ।धात्रा होय ।९
भक्तांचा कल्पतरू अशा गुरुदृष्टीरूप आईला ते आपल्या ग्रंथनिर्मितीसाठी विविध गोष्टींची मागणी करतात
शांत ,अद्भुत अशा रसांच्या समुद्राची माझ्या भाषेत भरती कर ,परमार्थ निरुपणाला शोभतील अशा योग्य अलंकार रुपी रत्नांची माझे निरुपण हे खाणच होऊन राहील असे कर ,माझ्या या व्याख्यानात गीतेतील अभिप्रायाचे मोठमोठे पर्वत तयार होतील असे कर ,मराठी भाषारुपी पृथ्वीमध्ये अलंकार रुपी सोन्याच्या खाणी उघड ,व आत्मानात्मविचार रुपी वेलींची जिकडे तिकडे लावणी होऊ दे ,संवादरूपी फळे लगडलेले सिद्धांत रुपी वृक्षांचे विस्तीर्ण बगीचे तयार कर ,या बागीचातील नास्तिक पणाच्या दर्या आणि वितंडवाद रुपी आड वाटा नाहीशा कर ,आणि कुतर्क रुपी दुष्ट जनावरे हाकून दे .श्रीकृष्ण गुणांचे वर्णन करण्यास मला समर्थ कर व श्रोत्यांना श्रवणाच्या राज्यावर बसव ,या मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञानाची रेलचेल कर व जगाला ब्रम्ह्सुखाचेच देणेघेणे होऊ दे. मराठीचिये नगरी ।ब्रम्हविध्येचा सुकाळू करी ।
घेणेदेणे सुखचि वरी ।हो देई या जगा ।
यावर श्रीगुरुंनी आता गीतार्थ सांगण्यास सुरवात कर अशी श्रीज्ञानदेवास आज्ञा केली
या दृष्टीचे महिमान वर्णन करताना ते हि दृष्टी शुध्द आहे ,उदार म्हणून प्रसिध्द आहे ,अखंड आनंदाचा वर्षाव करणारी आहे .या दृष्टीच्या योगाने विषयरूपी सर्पाच्या दंशाने येणारी भ्रांती नाहीशी होते ,या दृष्टीला येणारी प्रसन्नता रूप भरती जीवाला संसारातील त्रिविध ताप आणि खेद यापासून वाचवते ,भक्तांना अष्टांग योगाच्या सुखाचे भोग प्राप्त होतात व त्याहीपुढे "ते ब्रम्ह मी आहे "अशा स्वरूप सिद्धीच्या प्राप्तीची हौस तीच पुरवते .
गुरूची दृष्टी ज्यावर पडते त्याला जे दिसत नव्हते, कळत नव्हते ,ते दिसू,कळू लागते ,शब्दातून व्यक्त करता येते ,आणि याचीच मला गरज आहे ,कारण आता सर्वात अवघड असे देव व भक्त यांच्यातल्या प्रेमाचे वर्णन करायचे आहे ,म्हणून श्रीज्ञानेश्वर म्हणतात की तू माउली होऊन मला ती शक्ती दे .
म्हणोनी साधका तू माउली ।पिके सारस्वत तुझिया पाऊली ।
याकारणे मी साउली ।न सांडी तुझी ।५
सर्व विश्वात पसरलेली ,सर्वत्र सारखी ,शुध्द शक्ती तू आहेस ,तू अनवरत -अखंड आनंदाचा वर्षाव करतोस -उदारपणे सगळंच देऊन टाकतोस -तर ती कृपादृष्टी ,ते तुझे स्वरूप -आनंद ,ते मला दे .असा जेंव्हा तू मला प्रसन्न होशील ,तेंव्हा मी तुझी सावली सोडणार नाही ,कारण मातेच्या सावलीत बालकाला जे सुख मिळते ,ते त्रिभुवनात कोठेही मिळत नाही .मग तुझ्या सावलीत ,तुझ्या पावलांनी सारस्वत माझ्या घरात पिकेल ,मुखातून बाहेर पडेल ,श्रोत्यांना ऐकावयाला मिळेल ,यासाठी तू नुसते माझ्याकडे पहा ,तू नुसते पाहिलेस की हे घडेल ,मग माझ्या मनातले तुझ्याबद्दलचे प्रेम माझ्या शब्दातून उगवून भरघोस वाढेल .
अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी ।तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी ।ते सकळ विध्याचीये सृष्टी ।धात्रा होय ।९
भक्तांचा कल्पतरू अशा गुरुदृष्टीरूप आईला ते आपल्या ग्रंथनिर्मितीसाठी विविध गोष्टींची मागणी करतात
शांत ,अद्भुत अशा रसांच्या समुद्राची माझ्या भाषेत भरती कर ,परमार्थ निरुपणाला शोभतील अशा योग्य अलंकार रुपी रत्नांची माझे निरुपण हे खाणच होऊन राहील असे कर ,माझ्या या व्याख्यानात गीतेतील अभिप्रायाचे मोठमोठे पर्वत तयार होतील असे कर ,मराठी भाषारुपी पृथ्वीमध्ये अलंकार रुपी सोन्याच्या खाणी उघड ,व आत्मानात्मविचार रुपी वेलींची जिकडे तिकडे लावणी होऊ दे ,संवादरूपी फळे लगडलेले सिद्धांत रुपी वृक्षांचे विस्तीर्ण बगीचे तयार कर ,या बागीचातील नास्तिक पणाच्या दर्या आणि वितंडवाद रुपी आड वाटा नाहीशा कर ,आणि कुतर्क रुपी दुष्ट जनावरे हाकून दे .श्रीकृष्ण गुणांचे वर्णन करण्यास मला समर्थ कर व श्रोत्यांना श्रवणाच्या राज्यावर बसव ,या मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञानाची रेलचेल कर व जगाला ब्रम्ह्सुखाचेच देणेघेणे होऊ दे. मराठीचिये नगरी ।ब्रम्हविध्येचा सुकाळू करी ।
घेणेदेणे सुखचि वरी ।हो देई या जगा ।
यावर श्रीगुरुंनी आता गीतार्थ सांगण्यास सुरवात कर अशी श्रीज्ञानदेवास आज्ञा केली
No comments:
Post a Comment