Monday, September 3, 2012

aishwaryyog

ईश्वर या शब्दाचे भाव वाचक नाम म्हणून ऐश्वर्य हा शब्द तयार झाला .भाववाचक नाम हे मूळ  नामाचे स्वरूप ओळखणारी लक्षणे दाखवते .ही लक्षणे दोन प्रकारची असतात .जे बदलू शकते ,परिवर्तनीय आहे ते तटस्थ लक्षण ,जे ईश्वराचे सगुणत्व आहे .जे कायम आहे ,अपरिवर्तनीय आहे ते स्वरूप लक्षण ,ते ईश्वराचे निर्गुणत्व आहे ,म्हणून तेच खरे आहे व हा खरा ऐश्वर्ययोग .
आईका  यश ,श्री ,औदार्य ,।ज्ञान ,वैराग्य ,ऐश्वर्य ।हे साही गुणवर्य ।वसती जेथ ।
यश ,श्री ,औदार्य ,ज्ञान ,वैराग्य ,ऐश्वर्य हे सहा गुण ज्याच्या ठिकाणी वास करतात त्याला भगवंत असे म्हणतात .
हा आमुचा ऐश्वर्ययोगु ।तुवा देखिला कि चांगु ।आता सांगे काही येथ लागू ।भूतभेदाचा असे ।अ ९ -८७
ज्याप्रमाणे सूर्य आणि सूर्यप्रकाश एकच आहे ,त्याप्रमाणे मी जग या कल्पनेला आश्रय आहे ,मी सर्व जगाहून वेगळा नाही  असा आहे ,तर मग येथे मी व भूतमात्र यात भेदभाव करण्याचे काही कारण आहे का ?हा आमचा ऐश्वर्य योग तुला चांगला समजला का ?
नवव्या अध्यायात ज्ञान -विज्ञानाचा विषय समजावून सांगताना भगवंत म्हणतात कि अखंड ,निराकार अशा मला मायेच्या कर्तृत्वाने विश्वरूप प्राप्त होते .मी सर्वत्र  व्याप्त  आहे, मी काही करत  नाही अथवा करवत नाही ,केवळ निमित्त मात्र आहे ,माझ्या आधाराने माया हे विश्व निर्माण करते .जसे सागरावर वायूच्या योगाने लाटा  उत्पन्न होतात ,त्या लाटात  सागर असतोच ,पण लाटा  विरून गेल्या तरी सागराचे अस्तित्व कायम असते .म्हणून खरे भक्त हे सर्व सृष्टी हे माझे रूप समजून सर्वत्र नमस्कार करीत राहतात व मद्रूप होतात हा माझा ऐश्वर्ययोग  आहे .
आपल्या मूळ  स्वरूपाविषयी भगवंत म्हणतात , माझे स्वरूप निर्मल ,शुध्द ,अखंड आहे .प्रकृतीने निर्माण केलेली भूतसृष्टी कल्पांती प्रकृतीतच विलीन होते .नवीन कल्पाच्या आरंभी प्रकृती पुन्हा कार्यरत होते .मी अध्यक्ष असून प्रकृती हे चराचर निर्माण करते .मला विनाशी अशा मनुष्य रुपात लोक पाहतात ,हे अज्ञान आहे ,तर विश्वा पलीकडचे माझे मूळ अव्यक्त असे रूप जाणून घेणे हा माझा  ऐश्वर्य योग आहे .
 ऐश्वर्य योग म्हणजे अद्वैत परमात्म तत्वाचे यथार्थ रूप विशद करणे -यात आत्मतत्व आणि  सृष्टी यांचा संबंध उलगडून दाखवला आहे .हे अवाच्य असे ज्ञान  भगवंतानी नवव्या अध्यायात वाच्य केले आहे 

No comments:

Post a Comment