पंधराव्या अध्यायात संसाराचे मिथ्यारूप दाखवण्यासाठी भगवंतानी अश्वत्थ वृक्षाच्या महारुपकाचा उपयोग केला आहे .
अ ==नाही ,श्व ==उद्या ,त्थ =न टिकणारा .जो उद्यापर्यंत टिकत नाही तो अश्वत्थ .ब्रम्ह हे याचे ऊर्ध्व ,माया हे मूळ आहे .माया व ब्रम्हाच्या संबंधातून या वृक्षाची निर्मिती होते .महत तत्व हे याचे कोवळे पान आहे ,त्याला त्रिगुणात्मक अहंकाराचा शेंडा फुटतो ,मन, बुद्धी इ .लहान फांद्या फुटतात ,मग पंचमहाभूते ,पंचज्ञानेंद्रिये हे सूक्ष्म विषय निर्माण होतात .हा वृक्ष प्रतिक्षणी नाश पावतो ,पण हे जगणे व नाश पावणे इतक्या वेगाने होते कि ते सामान्यांना दिसत नाही .महाप्रलयाच्या संहारक वार्यात याची नाळ गळून पडते ,मग पुन्हा कल्पाच्या आरंभी नवनवीन सृष्ट्याचे समूह तयार होतात .कालांतराने या वृक्षातून चौर्यांशी लक्ष योनी मधून जीव जन्माला येतात .या वृक्षाला उन्मळून टाकणारी शक्ती यथार्थ ज्ञान ही आहे .हा वृक्ष खरा आहे असे अज्ञानी मानतात ,पण ज्ञानी याचे क्षणभंगुरत्व जाणतात .
एकी देहाची डिरी तुटे ।तव देहांकुरी बहुनी फुटे ।ऐसेनि भाव्तरू हा वाढे ।अव्यवो जैसा ।
या संसारवृक्षाचा शरीररूपी एक शेंडा गळून पडतो न पडतो तोच त्याला अनेक देहरूपी अंकुर फुटतात .म्हणून तो सतत नाश पावत असूनही अविनाशी आहे असे भासते .,जसे पाणी जोरात वाहत जात असते व मागून त्याला तसेच पाणी येऊन मिळत असते तेंव्हा बघनारास तेच पाणी आहे असे वाटते ,किंवा भिंगरी जेंव्हा अतिशय वेगाने फिरत असते तेंव्हा बघणाराला ती जमिनीला उभी चिकटली आहे असे वाटते ,याप्रमाणे अतिशय वेग हा स्थिरतेच्या भ्रमाला कारण होतो ,म्हणजेच संसारवृक्ष हा नाशिवंत असूनही मोठ्या वेगाने नाश व निर्माण पावत असल्याने वेडे लोक यास अविनाशी मानतात .,पण ज्ञानी व्यक्तीस हा क्षणभंगुर असून याचे अस्तित्व मिथ्या आहे हे कळते .
सभोवतालच्या परिस्थितीचे ज्ञानी व्यक्तीला होणारे आकलन हे सामान्याच्या आकलनशक्तीच्या पलीकडचे असते ,त्यामुळे तीच गोष्ट पटवण्यासाठी अशा दृष्टांताचा आधार घेणे ही ज्ञानेश्वरांची खास शैली आहे ,त्यामुळे अदृश्य प्रतिमा दृश्य प्रतिमेशी संलग्न होऊन मनात रुजतात ,चटकन समजतात .
अशा या केवळ अज्ञानामुळे बळावलेल्या संसारवृक्षाला आत्मज्ञानरुपी दुधारी तलवारीने नाहीसा कर अशी भगवंत अर्जुनाला आज्ञा करतात व इतर कोणतेही उपाय चालत नाहीत असे सांगतात .
म्हणोनी स्वप्निचीये भय ।ओखद चेवोंची धनंजया ।तेंवी अज्ञानमुला यया ।ज्ञानची खड्ग ।
अर्जुना ,जसे भीतीला जागे होणे हेच औषध ,तसे अज्ञानरूपी मुल असलेल्या संसार वृक्षाचा नाश करण्यास समर्थ एक ज्ञानखड्गच आहे .
अ ==नाही ,श्व ==उद्या ,त्थ =न टिकणारा .जो उद्यापर्यंत टिकत नाही तो अश्वत्थ .ब्रम्ह हे याचे ऊर्ध्व ,माया हे मूळ आहे .माया व ब्रम्हाच्या संबंधातून या वृक्षाची निर्मिती होते .महत तत्व हे याचे कोवळे पान आहे ,त्याला त्रिगुणात्मक अहंकाराचा शेंडा फुटतो ,मन, बुद्धी इ .लहान फांद्या फुटतात ,मग पंचमहाभूते ,पंचज्ञानेंद्रिये हे सूक्ष्म विषय निर्माण होतात .हा वृक्ष प्रतिक्षणी नाश पावतो ,पण हे जगणे व नाश पावणे इतक्या वेगाने होते कि ते सामान्यांना दिसत नाही .महाप्रलयाच्या संहारक वार्यात याची नाळ गळून पडते ,मग पुन्हा कल्पाच्या आरंभी नवनवीन सृष्ट्याचे समूह तयार होतात .कालांतराने या वृक्षातून चौर्यांशी लक्ष योनी मधून जीव जन्माला येतात .या वृक्षाला उन्मळून टाकणारी शक्ती यथार्थ ज्ञान ही आहे .हा वृक्ष खरा आहे असे अज्ञानी मानतात ,पण ज्ञानी याचे क्षणभंगुरत्व जाणतात .
एकी देहाची डिरी तुटे ।तव देहांकुरी बहुनी फुटे ।ऐसेनि भाव्तरू हा वाढे ।अव्यवो जैसा ।
या संसारवृक्षाचा शरीररूपी एक शेंडा गळून पडतो न पडतो तोच त्याला अनेक देहरूपी अंकुर फुटतात .म्हणून तो सतत नाश पावत असूनही अविनाशी आहे असे भासते .,जसे पाणी जोरात वाहत जात असते व मागून त्याला तसेच पाणी येऊन मिळत असते तेंव्हा बघनारास तेच पाणी आहे असे वाटते ,किंवा भिंगरी जेंव्हा अतिशय वेगाने फिरत असते तेंव्हा बघणाराला ती जमिनीला उभी चिकटली आहे असे वाटते ,याप्रमाणे अतिशय वेग हा स्थिरतेच्या भ्रमाला कारण होतो ,म्हणजेच संसारवृक्ष हा नाशिवंत असूनही मोठ्या वेगाने नाश व निर्माण पावत असल्याने वेडे लोक यास अविनाशी मानतात .,पण ज्ञानी व्यक्तीस हा क्षणभंगुर असून याचे अस्तित्व मिथ्या आहे हे कळते .
सभोवतालच्या परिस्थितीचे ज्ञानी व्यक्तीला होणारे आकलन हे सामान्याच्या आकलनशक्तीच्या पलीकडचे असते ,त्यामुळे तीच गोष्ट पटवण्यासाठी अशा दृष्टांताचा आधार घेणे ही ज्ञानेश्वरांची खास शैली आहे ,त्यामुळे अदृश्य प्रतिमा दृश्य प्रतिमेशी संलग्न होऊन मनात रुजतात ,चटकन समजतात .
अशा या केवळ अज्ञानामुळे बळावलेल्या संसारवृक्षाला आत्मज्ञानरुपी दुधारी तलवारीने नाहीसा कर अशी भगवंत अर्जुनाला आज्ञा करतात व इतर कोणतेही उपाय चालत नाहीत असे सांगतात .
म्हणोनी स्वप्निचीये भय ।ओखद चेवोंची धनंजया ।तेंवी अज्ञानमुला यया ।ज्ञानची खड्ग ।
अर्जुना ,जसे भीतीला जागे होणे हेच औषध ,तसे अज्ञानरूपी मुल असलेल्या संसार वृक्षाचा नाश करण्यास समर्थ एक ज्ञानखड्गच आहे .
No comments:
Post a Comment