गीतेचे महत्व वर्णन करताना भगवंत म्हणतात ,गीतेतील ज्ञान ही केवळ सर्व शास्त्राच्या अभ्यासाने प्राप्त होणारी वस्तू आहे .ती उपनिषद रुपी कमळातील सुगंध आहे. व्यासांच्या बुद्धिरूप रवीने हे अनादिसिध्द लोणी भगवंतानी काढले आहे .गीता ही ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे .विचार रुपी क्षीरसागराचे मंथन करून काढलेली ही दुसरी लक्ष्मी आहे .तिने आपले सर्वस्व म्हणजे पद ,वर्ण ,अर्थ वगैरे एका पुरुषोत्तमास अर्पण .केले गीता हे संसार जिंकणारे शास्त्र आहे .तिची अक्षरे हे आत्म्याला प्रकट करणारे मंत्र आहेत .भगवंत म्हणजे चैतन्य रुपी शंकर ,त्यांच्या मस्तकात जो गीतारूपी ठेवा होता ,तो बाहेर काढणारा ,श्रद्धेचे भांडार जो अर्जुन ,तो भगीरथ झाला .व म्हणून अर्जुन स्वतःच गीतेसह भगवंताचे राहण्याचे ठिकाण झाला .भगवंत म्हणतात कि ही ज्ञानाची वेळ गीता ,हिला जो जाणेल त्याचा मोह नाहीसा होईल ,त्याला आत्मज्ञान होईल ,आत्मस्वरूपी एकरूप होता येईल .
No comments:
Post a Comment