चौदाव्या अध्यायाच्या प्रारंभीच श्रीज्ञानेश्वर म्हणतात कि सर्व ज्ञानाहून श्रेष्ठ आत्मज्ञान ,त्याची प्राप्ती झाली कि परमेश्वराचे दर्शन घडते ..हे आत्मज्ञान काय सांगते ?तर नाशवंत मानवी शरीर म्हणजे मी नाही ,तर शरीर हे केवळ साधन आहे ,आपण आहोत आत्मतत्व -परमात्म्याचा एक अंश .या विश्वातील नाना पदार्थामध्ये एकच ईश्वरी तत्व आहे -हे सारे पदार्थ एकाच चिदवस्तूतून जन्म घेतात व तेथेच पुन्हा क्षय पावतात .ज्या साधकांना या ब्रम्ह ज्ञानाचा साक्षात्कार होतो ते भगवंतासारखेच आनंदमय व सत्यरूप होतात .
मी जैसा अनन्तानंदू ।जैसाची सत्यसिंधु ।तैसेची ते भेदु ।उरेचिना ।
हे जग पंचमहाभूतात्मक शरीर व आत्मतत्व यांच्या संबंधाने उत्पन्न होते .आत्मा हा खरा गुणातीत आहे ,पण प्रकृतीच्या स्वाधीन झाल्याने तो सत्व ,रज ,तम या गुणांच्या स्वाधीन झाला आहे।यामुळे संसारी झाल्याने त्यास सुख दुखाचा भोग मिळतो .मूळ आत्मा ज्ञानरूपच आहे ,पण त्याने संसार आवडून घेतल्याने त्याला आपलेच हे मुळरूप परके झाले आहे .
एरव्ही ज्ञान हे आपुले ।परि पर ऐसेची झाले ।जे आवडोनि घेतले ।भव स्वर्गादिक ।
माया हे ब्रम्हाचे सृष्टीचे बीज ठेवण्याचे ठिकाण आहे ,त्या बीजापासून ब्रम्हाच्या केवळ आधारे सर्व भूतांची उत्पत्ती होते .माया किंवा प्रकृती किंवा अव्यक्त हिचा पसारा हे केवळ अज्ञान आहे कारण ते विनाशी आहे .
आपला आपणपेया ।विसरू जो धनंजया ।तेंची रूप यया ।अज्ञानासी ।
आपल्या आत्मतत्त्वाचा आपल्यास जो विसर पडतो ते या अज्ञानाचे रूप आहे .नाशिवंत शरीरास क्षेत्र व अज्ञानाने गुंडाळलेल्या मूळ चितप्रकाशास क्षेत्रज्ञ असे नाव आहे .आत्मतत्वावरून दृष्टी घसरल्यावर जे जे दृश्य समोर येते त्याचे नाव सृष्टी आहे .
ब्रम्हाच्या व मायेच्या संगात प्रथम बुद्धी तत्व जन्माला आले .नंतर मन जन्मले .मनाने अहंकार तत्व तयार केले .त्याने पंचमहाभूताना आकारास आणले .अशा ८ विकारांनी जगतरुपी गर्भाची वाढ होते। असा हा गर्भ पिंड व्यक्त होतो तेंव्हा वासनेत सूक्ष्म रूपाने राहिलेला गर्भ त्यात प्रवेश करतो .हा पिंड सत्व ,रज ,तम या त्रिगुणांचा बनलेला असतो .हे गुण देहात वास करणाऱ्या अविनाशी आत्म्यास बंधन करतात .आत्मा जीव दशेत थोडासा प्रवेश करतो तोच त्रिगुणामुळे हा देह म्हणजे मी असे म्हणू लागतो .जन्म ते मरण देहाचे सारे धर्म ते माझे असा अभिमान घेतो .
ज्यावेळी पुरुष गुणांना जाणून घेऊन हे गुणच सार्या कर्माचा कर्ता आहेत व गुणाहून वेगळा चिदवस्तूरूप आत्मा म्हणजे मी आहे हे जाणतो तेंव्हा तो गुणातीत माझ्यापर्यंत पोहोचतो .
मी जैसा अनन्तानंदू ।जैसाची सत्यसिंधु ।तैसेची ते भेदु ।उरेचिना ।
हे जग पंचमहाभूतात्मक शरीर व आत्मतत्व यांच्या संबंधाने उत्पन्न होते .आत्मा हा खरा गुणातीत आहे ,पण प्रकृतीच्या स्वाधीन झाल्याने तो सत्व ,रज ,तम या गुणांच्या स्वाधीन झाला आहे।यामुळे संसारी झाल्याने त्यास सुख दुखाचा भोग मिळतो .मूळ आत्मा ज्ञानरूपच आहे ,पण त्याने संसार आवडून घेतल्याने त्याला आपलेच हे मुळरूप परके झाले आहे .
एरव्ही ज्ञान हे आपुले ।परि पर ऐसेची झाले ।जे आवडोनि घेतले ।भव स्वर्गादिक ।
माया हे ब्रम्हाचे सृष्टीचे बीज ठेवण्याचे ठिकाण आहे ,त्या बीजापासून ब्रम्हाच्या केवळ आधारे सर्व भूतांची उत्पत्ती होते .माया किंवा प्रकृती किंवा अव्यक्त हिचा पसारा हे केवळ अज्ञान आहे कारण ते विनाशी आहे .
आपला आपणपेया ।विसरू जो धनंजया ।तेंची रूप यया ।अज्ञानासी ।
आपल्या आत्मतत्त्वाचा आपल्यास जो विसर पडतो ते या अज्ञानाचे रूप आहे .नाशिवंत शरीरास क्षेत्र व अज्ञानाने गुंडाळलेल्या मूळ चितप्रकाशास क्षेत्रज्ञ असे नाव आहे .आत्मतत्वावरून दृष्टी घसरल्यावर जे जे दृश्य समोर येते त्याचे नाव सृष्टी आहे .
ब्रम्हाच्या व मायेच्या संगात प्रथम बुद्धी तत्व जन्माला आले .नंतर मन जन्मले .मनाने अहंकार तत्व तयार केले .त्याने पंचमहाभूताना आकारास आणले .अशा ८ विकारांनी जगतरुपी गर्भाची वाढ होते। असा हा गर्भ पिंड व्यक्त होतो तेंव्हा वासनेत सूक्ष्म रूपाने राहिलेला गर्भ त्यात प्रवेश करतो .हा पिंड सत्व ,रज ,तम या त्रिगुणांचा बनलेला असतो .हे गुण देहात वास करणाऱ्या अविनाशी आत्म्यास बंधन करतात .आत्मा जीव दशेत थोडासा प्रवेश करतो तोच त्रिगुणामुळे हा देह म्हणजे मी असे म्हणू लागतो .जन्म ते मरण देहाचे सारे धर्म ते माझे असा अभिमान घेतो .
ज्यावेळी पुरुष गुणांना जाणून घेऊन हे गुणच सार्या कर्माचा कर्ता आहेत व गुणाहून वेगळा चिदवस्तूरूप आत्मा म्हणजे मी आहे हे जाणतो तेंव्हा तो गुणातीत माझ्यापर्यंत पोहोचतो .
No comments:
Post a Comment