सत्व ,रज ,तम हे तीन गुण आहेत .प्रकृती यांची जन्म भूमी आहे .हे गुण देहामध्ये अविनाशी जो आत्मा त्याला बंधन करतात .एकाच अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी तीन गुणांचे अस्तित्व भासते .
सत्वगुण हा सुखरूपी व ज्ञानरूपी पाशात त्याला अडकवतो ,मग तो अष्ट सात्विक भावांनी गर्वाला चढतो ,विद्येने व मानाने संतुष्ट होतो ,विषय ज्ञानाने आपणास श्रेष्ठ मानतो .
रजोगुण हा अभिलाशारूप असतो .तृष्णा व आसक्ती यापासून निर्माण होतात .तो कर्मपाशाने प्राण्याला बांधतो -तो जीवाला विषयात रंजवतो ,त्याच्या इच्छा अतिशय वाढल्याने दुक्खासकट सर्व गोष्टी त्याला गोडच वाटतात . देहव्यापार करताना तो रात्र अथवा दिवस म्हणत नाही .स्वेच्छेने तो कर्मरूपी अग्नीत स्वतः प्रवेश करतो .
तमोगुण हा अज्ञानातून उत्पन्न होऊन सर्व प्राण्यांना मोह पडतो .प्रमाद ,आळस व निद्रा या पाशांनी तो प्राण्याला बांधतो .अविचार हा तमोगुणाचा महामंत्र आहे .जे काम करू नये ते करण्याची त्याला प्रबळ इच्छा असते .त्याच्या सर्व इंद्रियांच्या ठिकाणी जाड्य येते ,मन व इंद्रिये दोन्ही आळस व मूर्खपणाचा आश्रय करतात .अशारितीने सत्वगुण सुखाच्या ठिकाणी ,रजोगुण कर्माच्या ठिकाणी तर तमोगुण प्रमादाच्या ठिकाणी आसक्ती निर्माण करतो .
ज्यावेळी पुरुष गुणांना जाणून घेऊन हे गुणच सार्या कर्माचा कर्ता आहेत व गुणाहून वेगळा चिदवस्तुरूप आत्मा म्हणजे मी आहे हे जाणतो तेंव्हा तो गुणातीत होतो .
गुणातीताचे वर्णन करताना भगवंत म्हणतात
तैसे गुणागुण कार्य हे ।आघवेची आपण आहे ।म्हणोनी एकेका नोहे ।तडातोडी ।
गुण व गुणांचे कार्य हे सारे आपणच आहोत हे जाणूनही त्या गुणांच्या योगे त्याचे चित्त विचलित होत नाही .
साही ऋतू येता आकाशे ।लीम्पिजेची न तैसे ।तेंवी वैषम्य मानसे ।मानिचीना ।
आकाश ज्याप्रमाणे वेगवेगळ्या सहा ऋतुनी लिप्त होत नाही ,त्याप्रमाणे तो मनानेच सर्व भूतामध्ये भेदभाव जाणत नाही .
घरी आलेला पांतस्थ जसा घरासंबंधी उदास असतो ,तसा गुणातीत हा देहाच्या गुणकार्यावर उदास होऊन देहात वस्ती करतो ,गुणांच्या गजबजाटाने तो डोलत नाही ,अशा अभेद भक्तिभावाने जो गुणांच्या पलीकडे जाऊन माझी भक्ती करतो ,तो ब्रह्मत्व प्राप्त होण्याच्या योग्यतेचा होतो .
सत्वगुण हा सुखरूपी व ज्ञानरूपी पाशात त्याला अडकवतो ,मग तो अष्ट सात्विक भावांनी गर्वाला चढतो ,विद्येने व मानाने संतुष्ट होतो ,विषय ज्ञानाने आपणास श्रेष्ठ मानतो .
रजोगुण हा अभिलाशारूप असतो .तृष्णा व आसक्ती यापासून निर्माण होतात .तो कर्मपाशाने प्राण्याला बांधतो -तो जीवाला विषयात रंजवतो ,त्याच्या इच्छा अतिशय वाढल्याने दुक्खासकट सर्व गोष्टी त्याला गोडच वाटतात . देहव्यापार करताना तो रात्र अथवा दिवस म्हणत नाही .स्वेच्छेने तो कर्मरूपी अग्नीत स्वतः प्रवेश करतो .
तमोगुण हा अज्ञानातून उत्पन्न होऊन सर्व प्राण्यांना मोह पडतो .प्रमाद ,आळस व निद्रा या पाशांनी तो प्राण्याला बांधतो .अविचार हा तमोगुणाचा महामंत्र आहे .जे काम करू नये ते करण्याची त्याला प्रबळ इच्छा असते .त्याच्या सर्व इंद्रियांच्या ठिकाणी जाड्य येते ,मन व इंद्रिये दोन्ही आळस व मूर्खपणाचा आश्रय करतात .अशारितीने सत्वगुण सुखाच्या ठिकाणी ,रजोगुण कर्माच्या ठिकाणी तर तमोगुण प्रमादाच्या ठिकाणी आसक्ती निर्माण करतो .
ज्यावेळी पुरुष गुणांना जाणून घेऊन हे गुणच सार्या कर्माचा कर्ता आहेत व गुणाहून वेगळा चिदवस्तुरूप आत्मा म्हणजे मी आहे हे जाणतो तेंव्हा तो गुणातीत होतो .
गुणातीताचे वर्णन करताना भगवंत म्हणतात
तैसे गुणागुण कार्य हे ।आघवेची आपण आहे ।म्हणोनी एकेका नोहे ।तडातोडी ।
गुण व गुणांचे कार्य हे सारे आपणच आहोत हे जाणूनही त्या गुणांच्या योगे त्याचे चित्त विचलित होत नाही .
साही ऋतू येता आकाशे ।लीम्पिजेची न तैसे ।तेंवी वैषम्य मानसे ।मानिचीना ।
आकाश ज्याप्रमाणे वेगवेगळ्या सहा ऋतुनी लिप्त होत नाही ,त्याप्रमाणे तो मनानेच सर्व भूतामध्ये भेदभाव जाणत नाही .
घरी आलेला पांतस्थ जसा घरासंबंधी उदास असतो ,तसा गुणातीत हा देहाच्या गुणकार्यावर उदास होऊन देहात वस्ती करतो ,गुणांच्या गजबजाटाने तो डोलत नाही ,अशा अभेद भक्तिभावाने जो गुणांच्या पलीकडे जाऊन माझी भक्ती करतो ,तो ब्रह्मत्व प्राप्त होण्याच्या योग्यतेचा होतो .
No comments:
Post a Comment