लेखक -श्री .पु .ल .देशपांडे -संदर्भ -गाठोडे -परचुरे प्रकाशन -मलपृष्ठ
हिंदू धर्मातल्या संगीताच्या स्थानाबद्दल काही बोलायला नको .साक्षात भगवंताच्या मुखातून महाकवी वदले आहेत नाहं वसामि वैकुंठे ।योगिना हृदये तथा ।मद भक्ता यत्र गायन्ति ।तत्र तिष्ठामि नारद ।
मी वैकुंठात राहत नाही ,तर योग्यांच्या हृदयात राहतो .माझे भक्त जिथे गात असतात नारदा ,तिथे मी उभा असतो .बसलेला असतो असे म्हटलेले नाही ,कारण गाणार्यापुढे साक्षात भगवंताला सुध्दा बसावेसे वाटत नाही ,उभे रहावेसे वाटते ,हा तिथे आदराने उभा असतो कारण स्वतःचा अहंकार विसरून गाणार्या भक्ताचे दर्शन हे खुद्द भगवंतालाही अत्यंत लोभसवाणे वाटत असणारच .संगीताची सोबत घेतल्याशिवाय ईश्वराशी संवाद साधताच येत नाही,अशी धारणा आमच्या देशात होती .मीरा काय ,कबीर काय ,सूरदास काय , पुरंदरदास काय ,त्यागराज काय ,किंवा ज्ञानेश्वर ,तुकाराम ,नामदेव ,एकनाथ ,चोखामेळा ,कान्होपात्रा काय ;सगळे जण आपल्या गाण्यातून देवाशी आणि देवत्व जपणाऱ्या लोकांशी संवाद साधून गेले आहेत .तुकोबा तर "वेडे वाकुडे गाईन ।परि तुझा म्हणवीन ।"असे म्हणतात ,"मी गातो नाचतो आनंदे "म्हणतात .समर्थ सुध्दा "धन्य ते गायनी कळा।"असे म्हणून गेले आहेत .संगीत हा भारतीयांचाच नव्हे ,तर मानवी संस्कृतीचाच प्राण आहे .हिंदू धर्मात तर आपले जेष्ठ तत्वज्ञानसुध्दा गायले आहे .आपल्या तत्व ज्ञानावर ग्रंथ गीता आहे ,जे गायले गेलेले गीत आहे .मनुष्यांना एकत्र आणण्याचे फार मोठे सामर्थ्य सुरांमध्ये असते .
हिंदू धर्मातल्या संगीताच्या स्थानाबद्दल काही बोलायला नको .साक्षात भगवंताच्या मुखातून महाकवी वदले आहेत नाहं वसामि वैकुंठे ।योगिना हृदये तथा ।मद भक्ता यत्र गायन्ति ।तत्र तिष्ठामि नारद ।
मी वैकुंठात राहत नाही ,तर योग्यांच्या हृदयात राहतो .माझे भक्त जिथे गात असतात नारदा ,तिथे मी उभा असतो .बसलेला असतो असे म्हटलेले नाही ,कारण गाणार्यापुढे साक्षात भगवंताला सुध्दा बसावेसे वाटत नाही ,उभे रहावेसे वाटते ,हा तिथे आदराने उभा असतो कारण स्वतःचा अहंकार विसरून गाणार्या भक्ताचे दर्शन हे खुद्द भगवंतालाही अत्यंत लोभसवाणे वाटत असणारच .संगीताची सोबत घेतल्याशिवाय ईश्वराशी संवाद साधताच येत नाही,अशी धारणा आमच्या देशात होती .मीरा काय ,कबीर काय ,सूरदास काय , पुरंदरदास काय ,त्यागराज काय ,किंवा ज्ञानेश्वर ,तुकाराम ,नामदेव ,एकनाथ ,चोखामेळा ,कान्होपात्रा काय ;सगळे जण आपल्या गाण्यातून देवाशी आणि देवत्व जपणाऱ्या लोकांशी संवाद साधून गेले आहेत .तुकोबा तर "वेडे वाकुडे गाईन ।परि तुझा म्हणवीन ।"असे म्हणतात ,"मी गातो नाचतो आनंदे "म्हणतात .समर्थ सुध्दा "धन्य ते गायनी कळा।"असे म्हणून गेले आहेत .संगीत हा भारतीयांचाच नव्हे ,तर मानवी संस्कृतीचाच प्राण आहे .हिंदू धर्मात तर आपले जेष्ठ तत्वज्ञानसुध्दा गायले आहे .आपल्या तत्व ज्ञानावर ग्रंथ गीता आहे ,जे गायले गेलेले गीत आहे .मनुष्यांना एकत्र आणण्याचे फार मोठे सामर्थ्य सुरांमध्ये असते .
No comments:
Post a Comment