सोळाव्या अध्यायात असुरी संपत्तीचे सहा प्रकार वर्णन करताना श्री भगवंत म्हणतात कि हि आसुरी संपत्ती त्याज्य असल्याने निरुपयोगी आहे ,पण तिचा त्याग करण्याकरिता ती आधी जाणली पाहिजे .
दंभ ,दर्प ,अभिमान ,क्रोध ,पारुष्य व अज्ञान हे सहा आसुरी गुण आहेत .यांच्यात जीवनाचा सर्वनाश करून त्याला हमखास नरकात पोहोचवण्याची शक्ती आहे .
आपण केलेला धर्म आपल्या तोंडाने सांगणे हा दंभ होय .विद्या ,पैसा अथवा मान यांची अल्पशी जरी प्राप्ती झाली तरी मस्त होणे हा दर्प ,ईश्वर व वेदाचे नाव काढले कि ज्यामुळे डोके फिरते तो अभिमान ,दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून मनात जळफळणे हा क्रोध ,दगडाप्रमाणे निर्दय अंतकरण हे पारुष्य ,विधिनिषेध व पापपुण्य यातील फरक न कळणे हे अज्ञान .
या दोषांच्या आहारी गेलेली मनुष्ये धर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती व अधर्माच्या ठिकाणी निवृत्ती हे तत्व जाणत नाहीत .त्यांच्यामध्ये पावित्र्य ,सदाचार ,सत्य हे काही नसते .काही एक न करताही ते स्वभावतःच वाईट असतात .हे जग ईश्वर रहित व धर्म व्यवस्थेरहित आहे असे ते मानतात .हे कामी पुरुष क्षणिक शरीराच्या खोड्यात सापडून विषयरूपी चिखलात बुडतात. या कामाग्निचे कधीच समाधान होऊ शकत नसल्याने ते नेहमी हपापलेले असतात व कामाबरोबर दंभ व अभिमान यांचा समुदाय जमवतात .त्यांची कर्मप्रवृत्ती कामोप्भोग हेच अंतिम सत्य आहे असा निश्चय केलेली असते -त्याकरिता ते अन्यायाने द्रव्य संचय करतात .दुसर्याच्या प्राणाचा घात करून द्रव्यप्राप्त करून त्यांना संतोष होतो ही हाव संपत नाही .असे हे काम ,क्रोध ,लोभ या त्रिदोशानी युक्त पुरुष शेवटी नरकाच्या ठिकाणी पतन पावतात ,हे त्रिदोष हे नरकाचे द्वार ,आत्म्याच्या नाशाचे कारण आहेत ,सर्व दुख्खाकडे नेणाऱ्या वाटेचे हे तीन वाटाडे आहेत ,त्याने यज्ञ करावयाचे ठरवले तरी त्यासही तो दुसर्यांना लुबाडण्याचे साधन बनवितो .त्यांचा नरकातून तामसयोनीत पुनर्जन्म होतो .
श्री ज्ञानेश्वरांची दृष्टी आत्मोध्धार साधण्याच्या प्रवृत्तीवर व माणसाच्या चांगुलपणावर आहे ,म्हणून ते यासही मार्गदर्शन करतात
या कारणे पै बापा ।जया आथी अपुली कृपा ।तेणे वेदान्ताचीया निरोपा ।आन न कीजे ।४५५ अ १७
दंभ ,दर्प ,अभिमान ,क्रोध ,पारुष्य व अज्ञान हे सहा आसुरी गुण आहेत .यांच्यात जीवनाचा सर्वनाश करून त्याला हमखास नरकात पोहोचवण्याची शक्ती आहे .
आपण केलेला धर्म आपल्या तोंडाने सांगणे हा दंभ होय .विद्या ,पैसा अथवा मान यांची अल्पशी जरी प्राप्ती झाली तरी मस्त होणे हा दर्प ,ईश्वर व वेदाचे नाव काढले कि ज्यामुळे डोके फिरते तो अभिमान ,दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून मनात जळफळणे हा क्रोध ,दगडाप्रमाणे निर्दय अंतकरण हे पारुष्य ,विधिनिषेध व पापपुण्य यातील फरक न कळणे हे अज्ञान .
या दोषांच्या आहारी गेलेली मनुष्ये धर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती व अधर्माच्या ठिकाणी निवृत्ती हे तत्व जाणत नाहीत .त्यांच्यामध्ये पावित्र्य ,सदाचार ,सत्य हे काही नसते .काही एक न करताही ते स्वभावतःच वाईट असतात .हे जग ईश्वर रहित व धर्म व्यवस्थेरहित आहे असे ते मानतात .हे कामी पुरुष क्षणिक शरीराच्या खोड्यात सापडून विषयरूपी चिखलात बुडतात. या कामाग्निचे कधीच समाधान होऊ शकत नसल्याने ते नेहमी हपापलेले असतात व कामाबरोबर दंभ व अभिमान यांचा समुदाय जमवतात .त्यांची कर्मप्रवृत्ती कामोप्भोग हेच अंतिम सत्य आहे असा निश्चय केलेली असते -त्याकरिता ते अन्यायाने द्रव्य संचय करतात .दुसर्याच्या प्राणाचा घात करून द्रव्यप्राप्त करून त्यांना संतोष होतो ही हाव संपत नाही .असे हे काम ,क्रोध ,लोभ या त्रिदोशानी युक्त पुरुष शेवटी नरकाच्या ठिकाणी पतन पावतात ,हे त्रिदोष हे नरकाचे द्वार ,आत्म्याच्या नाशाचे कारण आहेत ,सर्व दुख्खाकडे नेणाऱ्या वाटेचे हे तीन वाटाडे आहेत ,त्याने यज्ञ करावयाचे ठरवले तरी त्यासही तो दुसर्यांना लुबाडण्याचे साधन बनवितो .त्यांचा नरकातून तामसयोनीत पुनर्जन्म होतो .
श्री ज्ञानेश्वरांची दृष्टी आत्मोध्धार साधण्याच्या प्रवृत्तीवर व माणसाच्या चांगुलपणावर आहे ,म्हणून ते यासही मार्गदर्शन करतात
या कारणे पै बापा ।जया आथी अपुली कृपा ।तेणे वेदान्ताचीया निरोपा ।आन न कीजे ।४५५ अ १७
श्रीकृष्ण अर्जुनाला वारंवार बजावून सांगतात कि काम ,क्रोध ,लोभ ही त्रिपुटी सर्वस्वी निंद्य आहे ,म्हणून ती टाकावी .या तीन्हीपासून मुक्त झालेला मनुष्यच श्रेष्ठ गती पावण्यास योग्य होतो .यानंतर चारी पुरुषार्थ पैकी एकाची वाट चालू लागल्याने त्याचे अंतकरण आनंदी राहील व त्यास मोक्ष मार्गात सज्जनांचा संग लाभेल ,तो जन्म मृत्युच्या फेर्यातून सुटेल व अत्मानंदाचे गाव ती गुरुकृपा त्यास प्राप्त होईल .मग आत्मनुभावाचे वाटेने सुखाने चालता येईल .श्रुती माउली हि जीवाचे शिवाशी मिलन घडवते ,म्हणून वेदाज्ञा मानून संपूर्ण पुरुषार्थाचे वाटेने चालावे हा दोष्मुक्तीचा उपाय भगवंतानी सुस्पष्ट रीतीने सांगितला .
No comments:
Post a Comment