अर्जूनाने श्रीकृष्णास संन्यास व त्याग यातील भेद विचारला .खरे तर आत्म ज्ञानाविषयी आता त्याचा दृढ निश्चय झाला होता ,पण देव स्वस्थ बसलेले त्याला सहन होईना ,त्याच्या भगवंत विषयीच्या एकनिष्ठ प्रेमामुळे आपल्याशी त्याने काही कारण नसतानाही बोलावे ,हा संवाद थांबला तर या आनंददायी अनुभवात खंड पडेल म्हणून त्याने त्याग व संन्यास यातील भेद विचारण्याचे निमित्त करून भगवंतास गीतारूपी वस्त्र पुन्हा उलगडायला लावले .या संवादात भगवंत ही भावनेच्या भरात आले ,कारण त्यांचा स्वभाव आहे की भक्त ज्या भावनेने पाहिलं तसे तसे ते होत जातात .म्हणून अर्जुनाच्या पूर्ण स्वाधीन होऊन प्रेमभराने बोलत असताना देव भानावर राहिले नाहीत व अर्जुनाचेही देहभान नाहीसे होऊ लागले .भक्त व भगवंत हा द्वैत भाव मोडून सुखाचे एकरूप समोर उभे राहिले .या आनंदाच्या डोहात अर्जुन पूर्ण बुडू लागला तेंव्हा भगवंतानी त्याला भानावर आणले .
या विवेचनाचे शेवटी त्यांनी सांगितले कि सर्व अज्ञानाचा त्याग करून अद्वैत भावाने मला शरण ये ,म्हणजे मी तुला मुक्ती देईन .मग श्रीकृष्णाने आपला उजवा बाहु पसरून शरण आलेल्या अर्जुनास आलिंगन दिले ,जे वाचेस व बुद्धीस प्रवेश करण्यास कठीण ते अर्जुनाला देण्याकरता देवांनी आलिङ्ग्नाचे निमित्त केले .व आपल्या हृदयातील बोध अर्जुनाच्या हृदयात घातला .व देव व भक्त हे द्वैत न मोडताही अर्जुनास आपल्यासारखे केले .मग अर्जुनास जो सुखाचा पूर आला त्यात सर्व शक्तिमान देवही बुडू लागले ,समुद्राच्या भरती प्रमाणे नारायणाने हे विश्व कोंडून भरले .
अर्जुन हा या पूर्ण आनंदरूपी रसाने विरघळून जाईल ,पण त्याचे जीवित कार्य शिल्लक असल्याने भगवंत त्याला देह मर्यादा ओलांडू देईनात .त्यामुळे भगवंतानी तुझा मोह पूर्ण नष्ट झाला का ?असा प्रश्न विचारल्यावर अर्जुन मी ब्रम्ह या स्थितीतून मी अर्जुन या स्थितीत आला .मग थरथर कापणार्या हाताने सर्वांगावरील रोमांच दाबून ,प्राण क्षोभाने डोलणाऱ्या अंगाला आपल्याच आधारे स्तब्ध करून ,उभा राहिला .त्याच्या दोन्ही डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते ,नाना प्रकारच्या उत्कंठेने कंठ दाटला होता ,म्हणून वाचा विस्कळीत झाली होती ,प्राणपणाने श्वासो च्श्वास नियमित करून तो भगवंतास म्हणाला ,
नष्टो मोहः स्मृतीलब्धा त्वत्प्रसादन मयाच्युत ।स्थितोस्मि गतसंदेह करिष्ये वचनन तव ।७३
तुझ्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला ,मला आपल्या खर्या स्वरूपाचे ज्ञान झाले ,मी संशय रहित झालो ,आता तुझी जी आज्ञा असेल ती पाळीन .
या विवेचनाचे शेवटी त्यांनी सांगितले कि सर्व अज्ञानाचा त्याग करून अद्वैत भावाने मला शरण ये ,म्हणजे मी तुला मुक्ती देईन .मग श्रीकृष्णाने आपला उजवा बाहु पसरून शरण आलेल्या अर्जुनास आलिंगन दिले ,जे वाचेस व बुद्धीस प्रवेश करण्यास कठीण ते अर्जुनाला देण्याकरता देवांनी आलिङ्ग्नाचे निमित्त केले .व आपल्या हृदयातील बोध अर्जुनाच्या हृदयात घातला .व देव व भक्त हे द्वैत न मोडताही अर्जुनास आपल्यासारखे केले .मग अर्जुनास जो सुखाचा पूर आला त्यात सर्व शक्तिमान देवही बुडू लागले ,समुद्राच्या भरती प्रमाणे नारायणाने हे विश्व कोंडून भरले .
अर्जुन हा या पूर्ण आनंदरूपी रसाने विरघळून जाईल ,पण त्याचे जीवित कार्य शिल्लक असल्याने भगवंत त्याला देह मर्यादा ओलांडू देईनात .त्यामुळे भगवंतानी तुझा मोह पूर्ण नष्ट झाला का ?असा प्रश्न विचारल्यावर अर्जुन मी ब्रम्ह या स्थितीतून मी अर्जुन या स्थितीत आला .मग थरथर कापणार्या हाताने सर्वांगावरील रोमांच दाबून ,प्राण क्षोभाने डोलणाऱ्या अंगाला आपल्याच आधारे स्तब्ध करून ,उभा राहिला .त्याच्या दोन्ही डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते ,नाना प्रकारच्या उत्कंठेने कंठ दाटला होता ,म्हणून वाचा विस्कळीत झाली होती ,प्राणपणाने श्वासो च्श्वास नियमित करून तो भगवंतास म्हणाला ,
नष्टो मोहः स्मृतीलब्धा त्वत्प्रसादन मयाच्युत ।स्थितोस्मि गतसंदेह करिष्ये वचनन तव ।७३
तुझ्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला ,मला आपल्या खर्या स्वरूपाचे ज्ञान झाले ,मी संशय रहित झालो ,आता तुझी जी आज्ञा असेल ती पाळीन .