ज्ञानेश्वरीतील प्रास्ताविके हा ज्ञानदेवांच्या स्वतंत्र प्रज्ञेचा आविष्कार आहेत ,म्हणून ती अनन्य साधारण आहेत .सतराव्या अध्यायात आपले गुरु निवृत्तीनाथ यांच्यावर गणेन्द्राचे रूपक रचून त्यांनी गुरुपूजा केली आहे हा अक्षर यज्ञ असल्याने येथे पूजाही अक्षर पूजा आहे .निवृत्तीनाथ व ज्ञानदेव या गुरुशिष्य जोडीचे भावनिक व अध्यात्मिक नाते या मंगलाचरणातून उलगडत जाते .
श्री ज्ञानेश्वर म्हणतात ,जीवरूपी गणांचा स्वामी असलेल्या सद्गुरुरूपी गजेंद्र तुला नमस्कार असो .शंकराने त्रिपुरासुराचा वध करण्या आधी गणपतीची स्तुती केली ,तसे सत्व ,रज व तम रुपी तीन शहरांनी वेढलेला व जीवभाव रुपी किल्ल्यात अडकलेला आत्मा ,तो शिवाने तू गुरुरूपी गणेशाची प्रार्थना करून सोडवला ,म्हणून तू शिवापेक्षा श्रेष्ठ आहेस .त्याचवेळी मुमुक्षुना तू मायाजालातून तरतोस ,म्हणून तू भोपळ्या सारखा हलका आहेस .
इथे त्रिगुण =त्रिपुरारी राक्षस ,जीवात्मा =आत्मरूप शंकर ,सद्गुरु =गजेंद्र असे रूपक रचले आहे .
श्री गजानना प्रमाणेच गुरूच्या ज्ञान दृष्टीच्या संकोच व विकासात जगाचे उत्पत्ती व प्रलय सहज घडतात .त्याच्या प्रकृतीरूपी कानाच्या हालचालीने व गंड स्थळातील मदाच्या सुवासाने जीवरूपी भ्रमर गोळा होतात व निवृत्ती रुपी कानाच्या हालचालीने हा खेळ उधळला जातो .
माया ही तुझी स्त्री ,तिची नृत्य क्रीडा हा जगताचा आभास ,तोम्हणजे आपल्या अस्तित्वावर दाखवतोस .
श्री गजाननाच्या मुखाप्रमाणेच जे तुझ्याविषयी अज्ञानी आहेत ,त्यांच्या पासून तू आपले मुख एकीकडे फिरवले आहेस ,पण ज्ञानवानाना तू नेहमीच सन्मुख आहेस .
कर्म ,ज्ञान ,योग व भक्ती ,कोणत्याही मार्गाने भगवंतापर्यंत पोहोचताना सात्विक वृत्तीचे महत्व श्री ज्ञानेश्वरांनी सर्वच अध्यायात मांडले आहे .हा विचार लक्षात घेता गणेंद्र म्हणजे इंद्रिये ताब्यात ठेवणारा गजानन ही प्रतिमा वापरण्याचे महत्व कळते .या गुरुरूपी गणेंद्र याने डोळे उघडले कि विश्वाची उत्पत्ती होते व त्याच्या योग निद्रेत विश्वाचा लय होतो म्हणून त्याचा"विश्व विकासिनी मुद्रा "असा उल्लेख केला आहे .
समुद्राची अथांगता व दिव्याची प्रकाश मयता ही गुरूंच्या ठिकाणी असून आपण रिकामी घागर अथवा दिव्याची वात आहोत असा विनम्र भाव ते शेवटी व्यक्त करतात व मीठ पाण्यात विरघळते त्याप्रमाणे या नमनाने गुरूशी एकरूपता साधण्याचा आपला हेतू व्यक्त करतात .
श्री ज्ञानेश्वर म्हणतात ,जीवरूपी गणांचा स्वामी असलेल्या सद्गुरुरूपी गजेंद्र तुला नमस्कार असो .शंकराने त्रिपुरासुराचा वध करण्या आधी गणपतीची स्तुती केली ,तसे सत्व ,रज व तम रुपी तीन शहरांनी वेढलेला व जीवभाव रुपी किल्ल्यात अडकलेला आत्मा ,तो शिवाने तू गुरुरूपी गणेशाची प्रार्थना करून सोडवला ,म्हणून तू शिवापेक्षा श्रेष्ठ आहेस .त्याचवेळी मुमुक्षुना तू मायाजालातून तरतोस ,म्हणून तू भोपळ्या सारखा हलका आहेस .
इथे त्रिगुण =त्रिपुरारी राक्षस ,जीवात्मा =आत्मरूप शंकर ,सद्गुरु =गजेंद्र असे रूपक रचले आहे .
श्री गजानना प्रमाणेच गुरूच्या ज्ञान दृष्टीच्या संकोच व विकासात जगाचे उत्पत्ती व प्रलय सहज घडतात .त्याच्या प्रकृतीरूपी कानाच्या हालचालीने व गंड स्थळातील मदाच्या सुवासाने जीवरूपी भ्रमर गोळा होतात व निवृत्ती रुपी कानाच्या हालचालीने हा खेळ उधळला जातो .
माया ही तुझी स्त्री ,तिची नृत्य क्रीडा हा जगताचा आभास ,तोम्हणजे आपल्या अस्तित्वावर दाखवतोस .
श्री गजाननाच्या मुखाप्रमाणेच जे तुझ्याविषयी अज्ञानी आहेत ,त्यांच्या पासून तू आपले मुख एकीकडे फिरवले आहेस ,पण ज्ञानवानाना तू नेहमीच सन्मुख आहेस .
कर्म ,ज्ञान ,योग व भक्ती ,कोणत्याही मार्गाने भगवंतापर्यंत पोहोचताना सात्विक वृत्तीचे महत्व श्री ज्ञानेश्वरांनी सर्वच अध्यायात मांडले आहे .हा विचार लक्षात घेता गणेंद्र म्हणजे इंद्रिये ताब्यात ठेवणारा गजानन ही प्रतिमा वापरण्याचे महत्व कळते .या गुरुरूपी गणेंद्र याने डोळे उघडले कि विश्वाची उत्पत्ती होते व त्याच्या योग निद्रेत विश्वाचा लय होतो म्हणून त्याचा"विश्व विकासिनी मुद्रा "असा उल्लेख केला आहे .
समुद्राची अथांगता व दिव्याची प्रकाश मयता ही गुरूंच्या ठिकाणी असून आपण रिकामी घागर अथवा दिव्याची वात आहोत असा विनम्र भाव ते शेवटी व्यक्त करतात व मीठ पाण्यात विरघळते त्याप्रमाणे या नमनाने गुरूशी एकरूपता साधण्याचा आपला हेतू व्यक्त करतात .
No comments:
Post a Comment